AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बुर्ज खलिफाच्या आत काय ? पर्यटकांद्वारे रोजची कमाई किती होते ? ऐकाल तर चाट पडाल

दुबईतील बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत इराण आणि अमेरिका-इस्राईल युद्धाने पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या ८२८ मीटर उंच इमारतीच्या आत नेमके काय आहे ? तिला का बांधण्यात आले होते. सर्व जाणा...

बुर्ज खलिफाच्या आत काय ? पर्यटकांद्वारे रोजची कमाई किती होते ? ऐकाल तर चाट पडाल
Burj Khalifa Dubai
| Updated on: Mar 01, 2026 | 10:52 PM
Share

इराण आणि अमेरिका-इस्राईल युद्धामुळे दुबई देखील चर्चेत आली आहे. दुबई म्हटले की जगातील सर्वात उच्च इमारत ‘बुर्ज खलीफा’ चे नाव येते. ८२८ मीटर उंचीची ही इमारत केवळ एक पर्यटन स्थळी नाही तर दुबईचा अभिमान, वेग आणि यशाची जीवंत प्रतिक आहे. प्रत्येक व्यक्तीला या इमारतीला एकदा तरी पाहावे असे जरूर वाटते. साल २०१० मध्ये या इमारतीला सर्वसामान्यासाठी सुरु करण्यात आले. तेव्हापासून ती जगभरातील पर्यटकांची पहिली पसंत बनली आहे. परंतू या इमारतीला का आणि कसे तयार केले हे फारसे कोणाला माहिती नाही. चला तर वाचूयात या इमारतीच्या निर्मितीची कहाणी आणि तिच्या आत काय आहे नेमके ?

कशी कल्पना सुचली ?

या इमारतीच्या निर्मिती मागे कमाई करणे हा उद्देश्य होता. दुबईचे सरकार केवळ इंधनावर अवलंबून राहू इच्छीत नव्हते त्यांना असे काही बांधायचे होते जे संपूर्ण जगभरातील गुंतवणूकदार आणि पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरेल.

याच हेतूने व्हर्टिकल सिटी तयार करण्याचे स्वप्न पाहिले गेले. एक व्हर्टीकल म्हणजे उभे शहर बांधायचे. जेथे एकाच छताखाली घर, ऑफीस, आलीशान हॉटेल आणि फिरण्याची जागा असे सर्व काही उपलब्ध असेल.

कसे बांधले हे आश्चर्य ?

बुर्ज खलिफा बांधण्याचे काम साल २००४ साली सुरु झाले आणि इतकी उंच इमारत बांधून पाच वर्षात साल २००९ रोजी तयारही झाली. प्रसिद्ध आर्किटेक्चर कंपनी ‘SOM’ चे एड्रीयन स्मिथ आणि बिल बेकर यांनी या इमारतीचे डिझाईन केले. या इमारतीला असे बांधले की वेगवान हवा आणि हवामानाचा कोणताही परिणाम हिच्यावर व्हायला नको.

बुर्ज खलिफाची खासियत

या इमारतीला बाहेरुन २६ हजार वजनी काचांचे पॅनल लावण्यात आले आहेत. यास लावण्यासाठी चीनवरुन ३०० हून अधिक खास कारागिर बोलावण्यात आले होते. याचे शिखर ४ हजार टन स्टील पासून बनलेले आहे.विशेष म्हणजे यास बाहेरुन नाही तर इमारतीच्या आतून बनवून फिट केले आहे.

या इमारतील सुविधांचा विचार केला तर रोज येथे सुमारे ९.४ लाख लीटर पाण्याचा पुरवठा होतो. यात ५७ लिफ्ट्स आहेत. ज्यात जगातील सर्वात उंच सर्व्हीस लिफ्ट देखील असून ती ५ हजार किलोपर्यंत वजन उचलू शकते.

किती कमाई करते ?

या इमारतीला बांधण्यासाठी सुमारे १.४ अब्ज डॉलरचा खर्च आला होता. हीचे नाव अबूधाबीचे शासक खलीफा बिन जायद अल नाहयान यांच्या सन्मानार्थ ठेवण्यात आले होते. या प्रकल्पासाठी त्यांनी मोठी आर्थिक मदत केली होती. पर्यटकांच्या तिकीट विक्रीतून या इमारतीला दर वर्षी सुमारे ६२१ दशलक्ष डॉलर ( सुमारे ५,१५४ कोटी रुपये ) कमाई होते. या इमारतीतील अपार्टमेंट्सची किंमती कोट्यवधी रुपये आहे., ज्यामुळे दुबईच्या रिअल इस्टेट बाजाराला अब्जो डॉलरचा फायदा झाला आहे.

बुर्ज खलिफाच्या आत काय ?

या इमारतीच्या सुरुवातीच्या मजल्यावर प्रसिद्ध ब्रँडचे शानदार हॉटेल आहे.याच्या वरच्या मजल्यांवर प्रायव्हेट अपार्टमेंट्स आहेत. त्यांना जिओर्जियो अरमानी यांनी डिझाईन केले आहे. १२२ व्या मजल्यावर पॉश रेस्टोरंट आहे. येथे तुम्ही ढगात बसून जेवणाचा अनोखा आनंद घेता येतो. १२४ व्या, १२५ व्या आणि १४८ व्या मजल्यावर ‘ऑब्जर्वेशन डेक’तयार केलेले आहेत. जेथून दुबईचा ३६० डिग्री नजारा पाहायला मिळतो. याशिवाय यात मोठे कॉर्पोरेट ऑफीस, स्पा, जिम आणि स्विमिंग पुल देखील आहेत. जे पाहून तुम्हाला तुम्ही स्वर्गात आलात असे वाटेल.

Follow Us
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा.

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर.

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?.

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?