AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातला असा कोणता देश आहे जेथे एकही भारतीय व्यक्ती नाही?

General Knowledge: आज आम्ही तुम्हाला जगातील एका अशा देशाबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्हाला एकही भारतीय सापडणार नाही. इथली व्यवस्था आणि नियम इतर देशाताली लोकांसाठी खुपच कठोर आहेत. त्यामुळे कोणत्याही देशातील लोकं येथे काम करण्यासाठी किंवा व्यवसाय करण्यासाठी येऊ शकत नाहीत.

जगातला असा कोणता देश आहे जेथे एकही भारतीय व्यक्ती नाही?
shailesh musale
shailesh musale | Updated on: Nov 04, 2024 | 5:42 PM
Share

आज भारतीय लोकांनी फक्त आपल्याच देशात नाही तर इतर देशांमध्ये जाऊन देखील मोठी प्रगती केली आहे. या देशांमध्ये असलेल्या मोठ्या मोठ्या कंपन्यांचे सीईओ पासून ते इतर महत्त्वाच्या पदांवर भारतीय लोकांचा दबदबा दिसतो. भारतीय लोकं वेगवेगळ्या देशामध्ये आज राहत आहेत. कोणी व्यवसाय करायला गेले आहेत तर कोणी नोकरी, कोणी शिक्षणासाठी गेले आहेत तर कोणी फिरण्यासाठी. भारतीय वंशाचे लोकं किंवा स्थलांतरित भारतीय लोकं आज अनेक देशांमध्ये स्थायिक झाले आहेत. भारतीय समुदायाचे लोकं जगाच्या जवळजवळ प्रत्येक कोपऱ्यात पोहोचले आहेत.

पण तुम्हाला माहित आहे का की अनेक देशांमध्ये भारतीयांची उपस्थिती खूपच कमी आहे किंवा नाहीच आहे. यापैकी एक उदाहरण म्हणजे उत्तर कोरिया. उत्तर कोरियामध्ये भारतीयांची उपस्थिती जवळपास नगण्य आहे. उत्तर कोरियात कठोर नियम आहेत. हा एक हुकूमशाही शासन असलेला देश आहे. त्यामुळे येथे बाहेरील देशांतून येणाऱ्या लोकांवर कडक नजर ठेवली जाते. येथील सरकार परदेशी नागरिक आणि स्थलांतरितांसाठी खूप कठोर नियम बनवते, ज्यामुळे इतर देशांतील लोक येथे स्थायिक होण्यासाठी किंवा काम करण्यासाठी येऊ शकत नाहीत.

उत्तर कोरियामध्ये भारतीय समुदाय जवळपास नाहीच आहे. भारत आणि उत्तर कोरियाचे राजनैतिक संबंध असले. तरी त्यांच्यात सांस्कृतिक किंवा राजकीय संपर्क फारच कमी आहे. येथे भारतीयांना नोकरी किंवा इतर कारणांसाठी जाणे देखील अवघड आहे. कारण उत्तर कोरियामध्ये आर्थिक संधी खूप मर्यादित आहेत. महत्त्वाचे म्हणजे इथे कठोर व्यवस्था असल्यामुळे दुसऱ्या देशांतील लोकांना येथे स्थायिक होणे कठीण जाते.

उत्तर कोरियामध्ये इंटरनेट आणि सोशल मीडियावर देखील कठोर निर्बंध आहेत. ज्यामुळे बाहेरील देशांतील लोकांना तेथे राहणे आणखी कठीण झाले आहे. याचे आणखी एक कारण म्हणजे उत्तर कोरियाचे सरकार परदेशी नागरिकांच्या हालचालींवर कडक नियंत्रण ठेवते असते. पर्यटकांनाही नेहमी गाईडसोबतच राहावे लागते. पर्यटकांच्या प्रत्येक हालचालींवर येथील व्यवस्था बारीक लक्ष ठेवून असते. त्यामुळे भारतीयांसह इतर बहुतांश देशांतील नागरिकांना तेथे जाणे अवघड झाले आहे.

उत्तर कोरिया हा अशा काही देशांपैकी एक आहे जिथे भारतीय समुदायाची उपस्थिती नाहीये. कारण येथे कठोर राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती आहे. ज्यामुळे भारतीयांना तेथे राहणे जवळजवळ अशक्य आहे.

Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!