AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंदिरा गांधी यांनी सैन्याला रोखले नसते तर आज आज लाहौर भारतात असते

पाकिस्तानचे दोन तुकडे करून स्वतंत्र बांगलादेश निर्माण करण्याचे श्रेय इंदिरा गांधी यांना जाते. १९७१ च्या युद्धातील विजयादरम्यान इंदिरा गांधी यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ आणि तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांना भारताने लाहौर काबीज करावे अशी इच्छा होती, परंतु इंदिरा गांधी यांनी तसे करण्यापासून सैनिकांना रोखले होते.

इंदिरा गांधी यांनी सैन्याला रोखले नसते तर आज आज लाहौर भारतात असते
| Updated on: Nov 01, 2024 | 6:50 PM
Share

बांगलादेशमध्ये राजकीय अस्थिरतेमुळे काही महिन्यांपूर्वीच शेख हसीना यांचं सरकार पाडलं. त्यानंतर हिंदू आणि अल्पसंख्याकांवर अत्याचार सुरु झाले आहेत. बांगलादेश हा स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आणण्यात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची मोठी भूमिका राहिली आहे. 1972 मध्ये पाकिस्तानचे दोन तुकडे झाले. तेव्हा लाहोरचे भारतात विलीनीकरण होणार होते. पण यापासून इंदिरा गांधी यांना माघार घेतली होती. कारण भारतीय सैन्याने लाहोर काबीज करण्यापर्यंत मजल मारली होती. इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळातील नेत्यांचे आणि तिन्ही सैन्याच्या प्रमुखांनाही असे वाटत होते की आपण लाहोर ताब्यात घ्यावे. पण पण इंदिरा गांधी यांनी त्याला विरोध केला. त्यांनी युद्धविराम जाहीर करुन टाकला. इंदिरा गांधी यांचे सहाय्यक आणि काँग्रेस नेते यांनी याबाबत माहिती दिली.

31 ऑक्टोबर 1984 रोजी इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती. डॉ. रफिक झकेरिया यांनी त्यांच्याबाबत एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली होती. झकेरिया हे प्रसिद्ध लेखक, शिक्षणतज्ज्ञ आणि काँग्रेसचे खासदार होते. पाकिस्तानचे तत्कालीन लष्कर प्रमुख याह्या खान यांनी झुल्फिकार अली भुट्टो यांच्यासोबत पूर्व पाकिस्तानमध्ये कसे अत्याचार केले याबाबत माहिती दिली. या घटनेनंतर लाखो लोकं आपला जीव वाचवण्यासाठी भारतात आले होते. झकेरिया यांनी सांगितले की, ‘देशांतर्गत अनेक समस्या असताना देखील इंदिरा गांधी यांच्यापुढे मोठं आव्हान तयार झाले होते. कारण पूर्व पाकिस्तानमधील 10 दशलक्षाहून अधिक निर्वासितांना भारतात यायचे होते. ज्यात बहुतेक लोकं हे हिंदू होते. याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर ही मोठा परिणाम झाला असता.

इंदिरा गांधी यांना पश्चिम पाकिस्तानला खाली पडू द्यायचे नव्हते. इंदिरा गांधी यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ, लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या प्रमुखांना विजयी भारतीय सैन्याने लाहोर ताब्यात घेण्याची इच्छा होती. पण तरी देखील त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि युद्धबंदीचे घोषणा केली.

रफिक झकारिया पुढे लिहितात की, ‘लष्करी हुकूमशहा याह्या खान याने भुट्टोच्या मदतीने पूर्व पाकिस्तानमध्ये दहशतीचे राज्य स्थापन केले. ज्याच्या विरोधात शेख मुजीबुर रहमान यांच्या नेतृत्वाखाली बंड झाले. हे बंड दडपण्यासाठी याह्याने बंगाली लोकांविरुद्ध नरसंहार केला. तसेच भारतावर देखील हल्ले केले. त्यानंतर मग पूर्व पाकिस्तान मुक्त होऊन त्यातून बांगलादेशची निर्मिती झाली.

झकेरिया यांनी लेखात पुढे लिहिले की, इंदिरा ‘गांधी यांना पश्चिम पाकिस्तानचा पराभव करू द्यायचा नव्हता आणि त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ, लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या प्रमुखांना लाहोर काबीज करण्याची इच्छा होती पण इंदिरा गांधी यांनी यासाठी परवानगी नाही दिली.

1971 च्या भारत-पाक युद्धात अमेरिका आणि चीनने भारताला धमकावण्याचा प्रयत्न केला. पण इंदिरा गांधी या डगमगल्या नाहीत. त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. झकारिया यांनी सांगितले की, ‘युद्धादरम्यान अमेरिका आणि चीन या दोघांनीही भारताला बदला घेण्याची धमकी दिली होती.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.