AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन कोणते? Delhi, Mumbai नाही, तर 172 वर्षांचा जुना इतिहास

Largest railway station in India: भारतीय रेल्वे ही जगातील जुन्या रेल्वेपैकी एक आहे. तिचे जाळे पूर्वेकडून पश्चिमकडे आणि दक्षिणेकडून उत्तरकडे दाट विणलेले आहे. रोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, देशातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन कोणते आहे?

देशातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन कोणते? Delhi, Mumbai नाही, तर 172 वर्षांचा जुना इतिहास
| Updated on: Apr 19, 2026 | 4:15 PM
Share

Biggest Railway Station in India: भारतीय रेल्वे ही देशातील दळणवळणातील सर्वात मोठी कडी आहे. लाखो प्रवासी रोज रेल्वेने प्रवास करतात. पण देशातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन कोणते आहे हे तुम्हाला माहिती आहे का? मुंबई आणि दिल्ली असं जर तुमचं उत्तर असेल तर थांबा. कारण हे उत्तर चुकीचं आहे. भारतातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन हे विशाल क्षेत्र, प्लॅटफॉर्मची संख्या आणि 172 वर्षे जुने आणि तितकेच ऐतिहासिक आहे. इंडियन रेल्वेनुसार, भारतातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन मुंबई अथवा दिल्ली नाही तर पश्चिम बंगालमधील हावडा हे आहे. देशातील सर्वात मोठ्या रेल्वे स्टेशनला हावडा असे म्हटले जाते. हे देशातील सर्वात जुने आणि मोठे रेल्वे स्टेशन आहे. हावडा रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्मची संख्या 23 इतकी आहे. तर नवीन दिल्ली येथील रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्मची संख्या जवळपास 16 तर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस(CSMT) ची संख्या जवळपास 18 प्लेटफॉर्म इतकी आहे.

रेल्वेचे पूर्वेतील सर्वात मोठे जंक्शन

हावड़ा जंक्शनमधील (Howrah Junction) प्लॅटफॉर्मची संख्या, प्रवाशांची क्षमता, येथील रेल्वेची ये-जा ही सर्वाधिक असल्याचे मानले जाते. अनेक वर्षांपासून हे जंक्शन कार्यरत आहे. हे देशातील सर्वात व्यग्र रेल्वे स्टेशनपैकी एक मानल्या जाते. हे पूर्वेतील रेल्वेचे मुख्य केंद्र आहे. देशाला कोलकत्त्याशी जोडण्याचे काम हे रेल्वे स्टेशन करते.

1854 मध्ये स्थापना,172 वर्षांचा मोठा इतिहास

हावडा जंक्शन केवळ एक रेल्वे स्टेशन नाही तर एक ऐतिहासिक वारसा आहे. या रेल्वे स्टेशनची निर्मिती ही ब्रिटिश काळात झाली होती. या रेल्वे स्टेशनचा इतिहास हा 172 वर्षांचा आहे. 1854 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने या रेल्वे स्टेशनची स्थापना केली होती. 15 ऑगस्ट 1854 रोजी हावाडा ते हुगळी या रेल्वे लाईनवर पहिली रेल्वे धावली होती. मुंबई ते ठाणे ही पहिली रेल्वे देशात धावली होती. या रेल्वेमुळे देशात रेल्वेचे युग सुरू झाल्याचे म्हटले जाते.

हावडा जंक्शनचे वैशिष्ट्ये

हावडा जंक्शन भारताच्या पश्चिम बंगाल स्थित देशातील सर्वात जुने रेल्वे स्टेशन आहे.

हावडा स्टेशनमधून 15 ऑगस्ट 1854 रोजी हावाडा ते हुगळी ही रेल्वे पहिल्यांदा धावली

हे देशातील सर्वात व्यग्र रेल्वे स्टेशन आहे. येथे 10 लाख प्रवासी ये-जा करतात

या रेल्वे स्टेशनवर एकूण 23 प्लेटफॉर्म आहेत. हे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे स्टेशनपैकी एक आहे

1905 मध्ये हावड़ा स्टेशनमध्ये 6 नवीन प्लॅटफॉर्म जोडल्या गेला

2009 मध्ये या रेल्वे स्टेशनचा विस्तार करण्यात आला. या हावडा रेल्वे स्टेशनवर 23 प्लेटफॉर्म आहेत

दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरूसह अनेक शहरांना हे रेल्वे स्टेशन जोडते

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत