AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन कोणते? Delhi, Mumbai नाही, तर 172 वर्षांचा जुना इतिहास

Largest railway station in India: भारतीय रेल्वे ही जगातील जुन्या रेल्वेपैकी एक आहे. तिचे जाळे पूर्वेकडून पश्चिमकडे आणि दक्षिणेकडून उत्तरकडे दाट विणलेले आहे. रोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, देशातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन कोणते आहे?

देशातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन कोणते? Delhi, Mumbai नाही, तर 172 वर्षांचा जुना इतिहास
| Updated on: Apr 19, 2026 | 4:15 PM
Share

Biggest Railway Station in India: भारतीय रेल्वे ही देशातील दळणवळणातील सर्वात मोठी कडी आहे. लाखो प्रवासी रोज रेल्वेने प्रवास करतात. पण देशातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन कोणते आहे हे तुम्हाला माहिती आहे का? मुंबई आणि दिल्ली असं जर तुमचं उत्तर असेल तर थांबा. कारण हे उत्तर चुकीचं आहे. भारतातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन हे विशाल क्षेत्र, प्लॅटफॉर्मची संख्या आणि 172 वर्षे जुने आणि तितकेच ऐतिहासिक आहे. इंडियन रेल्वेनुसार, भारतातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन मुंबई अथवा दिल्ली नाही तर पश्चिम बंगालमधील हावडा हे आहे. देशातील सर्वात मोठ्या रेल्वे स्टेशनला हावडा असे म्हटले जाते. हे देशातील सर्वात जुने आणि मोठे रेल्वे स्टेशन आहे. हावडा रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्मची संख्या 23 इतकी आहे. तर नवीन दिल्ली येथील रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्मची संख्या जवळपास 16 तर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस(CSMT) ची संख्या जवळपास 18 प्लेटफॉर्म इतकी आहे.

रेल्वेचे पूर्वेतील सर्वात मोठे जंक्शन

हावड़ा जंक्शनमधील (Howrah Junction) प्लॅटफॉर्मची संख्या, प्रवाशांची क्षमता, येथील रेल्वेची ये-जा ही सर्वाधिक असल्याचे मानले जाते. अनेक वर्षांपासून हे जंक्शन कार्यरत आहे. हे देशातील सर्वात व्यग्र रेल्वे स्टेशनपैकी एक मानल्या जाते. हे पूर्वेतील रेल्वेचे मुख्य केंद्र आहे. देशाला कोलकत्त्याशी जोडण्याचे काम हे रेल्वे स्टेशन करते.

1854 मध्ये स्थापना,172 वर्षांचा मोठा इतिहास

हावडा जंक्शन केवळ एक रेल्वे स्टेशन नाही तर एक ऐतिहासिक वारसा आहे. या रेल्वे स्टेशनची निर्मिती ही ब्रिटिश काळात झाली होती. या रेल्वे स्टेशनचा इतिहास हा 172 वर्षांचा आहे. 1854 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने या रेल्वे स्टेशनची स्थापना केली होती. 15 ऑगस्ट 1854 रोजी हावाडा ते हुगळी या रेल्वे लाईनवर पहिली रेल्वे धावली होती. मुंबई ते ठाणे ही पहिली रेल्वे देशात धावली होती. या रेल्वेमुळे देशात रेल्वेचे युग सुरू झाल्याचे म्हटले जाते.

हावडा जंक्शनचे वैशिष्ट्ये

हावडा जंक्शन भारताच्या पश्चिम बंगाल स्थित देशातील सर्वात जुने रेल्वे स्टेशन आहे.

हावडा स्टेशनमधून 15 ऑगस्ट 1854 रोजी हावाडा ते हुगळी ही रेल्वे पहिल्यांदा धावली

हे देशातील सर्वात व्यग्र रेल्वे स्टेशन आहे. येथे 10 लाख प्रवासी ये-जा करतात

या रेल्वे स्टेशनवर एकूण 23 प्लेटफॉर्म आहेत. हे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे स्टेशनपैकी एक आहे

1905 मध्ये हावड़ा स्टेशनमध्ये 6 नवीन प्लॅटफॉर्म जोडल्या गेला

2009 मध्ये या रेल्वे स्टेशनचा विस्तार करण्यात आला. या हावडा रेल्वे स्टेशनवर 23 प्लेटफॉर्म आहेत

दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरूसह अनेक शहरांना हे रेल्वे स्टेशन जोडते

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...