AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ दोन मंदिरांचे दरवाजे भक्तांसाठी आजही बंद, जाणून घ्या कारण

आज अनेक मंदिरं भक्तांसाठी उघडण्यात आली. पण अशात काही मंदिरं अजूनही न उघडण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.

'या' दोन मंदिरांचे दरवाजे भक्तांसाठी आजही बंद, जाणून घ्या कारण
| Edited By: | Updated on: Nov 16, 2020 | 9:05 AM
Share

कोल्हापूर : कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गामुळे तब्बल 9 महिन्यांनी आज महाराष्ट्रातील प्रत्येक मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले झाले आहेत. राज्यातील सर्वधर्मीय मंदिरे, प्रार्थनास्थळं आजपासून खुली करण्यास राज्यसरकारने परवानगी दिली आहे. यामुळे आज अनेक मंदिरं भक्तांसाठी उघडण्यात आली. पण अशात काही मंदिरं अजूनही न उघडण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. कोरोना काळात भक्तांना दर्शन देण्यासाठी योग्य व्यवस्था करण्यासाठी या मंदिरांनी आणखी एक दिवस वेळ घेतला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

करवीर निवासिनी अंबाबाईचं मंदिर आजपासून उघडण्यात येणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार, अंबाबाईचं मंदिर हे उद्यापासून म्हणजेच 17 नोव्हेंबरपासून भक्तांसाठी खुलं करण्यात येणार आहे. यासाठी सकाळी नऊ ते दुपारी बारापर्यंत आणि सायंकाळी चार ते सात वाजेपर्यंत रांगेतून दर्शन घेता येणार आहे. मंदिराच्या पूर्व दरवाजातून आत जाण्याची आणि दक्षिण दरवाज्यातून बाहेर पडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

तर देवीच्या दर्शनासाठी भक्तांना ऑनलाइन बुकिंगचीदेखील सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हळदी-कुंकू, खण, नारळ, ओटी, फुल आदी देवीला वाहण्यावर बंदी आहे. त्यामुळे कुणीही या वस्तू आणू नयेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

बुलढाण्यातील शेगांवचं गजानन महाराज मंदिरदेखील आज उघडणार नाही आहे. श्री संत गजानन महाराजांचे मंदिर भाविकांसाठी उद्या 17 नोव्हेंबरला मंगळवारी उघडण्यात येणार आहे. यासंबंधिचा निर्णय आज मंदिर प्रशासनाकडून देण्यात आला आहे तर दर्शनासाठी ई-पास घ्यावी लागणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.

चर्चही बंद दरम्यान, राज्यातील सर्वधर्मीय मंदिरे, प्रार्थनास्थळं आजपासून खुली करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असली तरी वसई-विरारमधील चर्च मात्र आजपासून खुली होणार नाहीत. स्थानिक प्रशासनाचा लेखी आदेश जोपर्यंत प्राप्त होतं नाही तोपर्यंत चर्च सर्वसामन्यायासाठी खुली होणार नाहीत असं चर्चकड़ून स्पष्ट करण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या – 

महाराष्ट्रातील प्रत्येक मंदिराचे दरवाजे 9 महिन्यांनी उघडले, भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण

राज्यातील मंदिरं सोमवारपासून सुरु होणार, पण सप्तश्रृंगी, काळाराम आणि त्र्यंबकेश्वर मंदिबाबात अद्यापही संभ्रम!

(Ambabai temple and Gajanan Maharaj temple in Shegaon will not opene from today)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.