AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एअर स्ट्राईकमध्ये 170 दहशतवाद्यांचा खात्मा, इटलीच्या पत्रकाराचा ग्राऊंड रिपोर्ट

नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानमध्ये घुसून एअर स्ट्राईक केल्याची माहिती सर्वात अगोदर पाकिस्ताननेच दिली होती. पण या कारवाईत काहीही नुकसान झालं नाही, असं पाकिस्तानने आतापर्यंत छातीठोकपणे सांगितलं. पाकिस्तानच्या या खोटेपणाचा बुरखा इटलीच्या पत्रकार फ्रान्सिसा मरीनो यांनी फाडलाय. भारतीय वायूसेनेच्या एअर स्ट्राईकमध्ये जैश ए मोहम्मदचं प्रशिक्षण तळ उद्ध्वस्त करण्यात आलंच, शिवाय पाकिस्तान सैन्याचे काही जवानही यात […]

एअर स्ट्राईकमध्ये 170 दहशतवाद्यांचा खात्मा, इटलीच्या पत्रकाराचा ग्राऊंड रिपोर्ट
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:47 PM
Share

नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानमध्ये घुसून एअर स्ट्राईक केल्याची माहिती सर्वात अगोदर पाकिस्ताननेच दिली होती. पण या कारवाईत काहीही नुकसान झालं नाही, असं पाकिस्तानने आतापर्यंत छातीठोकपणे सांगितलं. पाकिस्तानच्या या खोटेपणाचा बुरखा इटलीच्या पत्रकार फ्रान्सिसा मरीनो यांनी फाडलाय. भारतीय वायूसेनेच्या एअर स्ट्राईकमध्ये जैश ए मोहम्मदचं प्रशिक्षण तळ उद्ध्वस्त करण्यात आलंच, शिवाय पाकिस्तान सैन्याचे काही जवानही यात मारले गेल्याचा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आलाय.

मरीनो यांच्या रिपोर्टनुसार, बालाकोट एअर स्ट्राईक आणि तेथील नुकसानीबाबत जाणून घेण्यासाठी विविध ठिकाणाहून माहिती जमा करण्यात आली. यामध्ये समोर आलं की भारताच्या कारवाईत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला, तर काही जण जखमी झाले. 26 फेब्रुवारी रोजी पहाटे 3.30 वाजता ही कारवाई झाली. यानंतर बालाकोटजवळील पाकिस्तानी सैन्याच्या शिंकीअरी कॅम्पचे जवान सकाळी सहा वाजता घटनास्थळावर पोहोचले. डोंगर चढून जाण्यासाठी या जवानांना जवळपास 35 ते 40 मिनिटांचा वेळ लागला.

पाकिस्तानी सैन्याकडून तातडीने मदतकार्य सुरु करण्यात आलं आणि जखमींना हरकत-उल-मुजाहिद्दीन कॅम्पवर नेण्यात आलं. पाकिस्तानी लष्कराच्या डॉक्टरांनी तिथे दहशतवाद्यांवर उपचार केला. स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, हरकत-उल-मुजाहिद्दीनमध्ये 45 जणांवर अजूनही उपचार सुरु आहे. तर उपचार सुरु असतानाच 20 जणांचा जीव गेलाय. जे नीट झाले आहेत, त्यांना पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतलंय.

एअर स्ट्राईकमध्ये जैश ए मोहम्मदचे 130 ते 170 दहशतवादी मारले गेल्याचा दावा मरीनो यांनी केलाय. तर उपचारादरम्यान काहींचा मृत्यू झाला. मरणाऱ्यांमध्येय 11 प्रशिक्षक, बॉम्ब बनवणारे आणि शस्त्र चालवणाऱ्या दहशतवाद्यांचाही समावेश आहे. याशिवाय दोन प्रशिक्षक अफगाणिस्तानचे असल्याचं सांगण्यात आलंय. ही घटना बाहेर येऊ नये यासाठी पाकिस्तानी सैन्याचे जवान आणि जैशचे सदस्य मृतांच्या कुटुंबीयांकडे गेले आणि तोंड न उघडण्यासाठी त्यांना पैसे देण्यात आले.

Follow Us
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?.
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!.
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन.