अभ्यासक्रम कपातीच्या नावाखाली नेहरुंचे धडे गायब, आसाममधील प्रकार

| Updated on: Sep 25, 2020 | 6:24 PM

आसामने 12 वीच्या अभ्यासक्रमात 30 टक्क्यांनी कपात केलीअसून पंडित नेहरुंचे धडे गायब आहेत. (Assam reduce syllabus by 30 per cent. Nehru's lessons removed) 

अभ्यासक्रम कपातीच्या नावाखाली नेहरुंचे धडे गायब, आसाममधील प्रकार
भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त बालदिन का साजरा करतात?
Follow us on

दिसपूर : सीबीएससी, महाराष्ट्र बोर्डानंतर आता आसाम सरकारनेही अभ्यासक्रम कपातीचा निर्णय घेतला आहे. आसाम सरकारने बारावीच्या अभ्यासक्रमात 30 टक्क्यांनी कपात केली असून देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचे धडे वगळल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आसाम सरकार आणि आसाम शिक्षण (AHSEC) मंडळावर टीका होत आहे. (Assam government reduce syllabus lessons Jawaharlal Nehru omitted)

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आसामच्या उच्च व माध्यमिक शिक्षण मंडळाने (AHSEC) बारावीच्या अभ्यासक्रमात 30 टक्क्यांनी कपात केली. यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याविषयीचे धडे आणि मुद्दे वगळण्यात आले आहेत. (reduced syllabus Nehru’s lessons disappear) तसेच मंडल आयोगाचा अहवाल, जात आणि वर्गवाद या मुद्द्यांनाही अभ्यासक्रमातून वगळलं आहे.

अभ्यासक्रमातून वगळलेले मुद्दे

स्वातंत्र्योत्तर भारतातील राजकारण
पहिल्या तीन निवडणुका
राष्ट्र उभारणी आणि नेहरुंचा दृष्टीकोन
नेहरुंचे विदेशी धोरण
नेहरुनंतरचे राजकीय वारसदार
गरिबी हटाओचे राजकारण
गुजरातमधील नवनिर्माण आंदोलन
पंजाबवरील संकट आणि 1984 चे शीखविरोधी दंगे
यूएफ आणि एनडीए सरकार
अयोध्या विवाद
2004 ची निवडणूक आणि यूपीए सरकार

तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसारच अभ्यासक्रमात कपात: शिक्षण मंडळ

शिक्षक आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच अभ्यासक्रम कमी केल्याचं आसाम उच्च व माध्यमिक शिक्षण मंडळाने (AHSEC) म्हटलंय. तसेच याबाबत शंका आणि तक्रारी आल्यास पुन्हा बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेऊ असं म्हटलंय. दरम्यान, अभ्यासक्रम कपातीच्या नावाखाली नेहरुंशी संबंधित मुद्दे का वगळले? असे प्रश्न विचारले जात आहेत. आसाम शिक्षण मंडळाने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. आसाम उच्च व माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव मनोरंजन काकती यांनी म्हटलंय “विद्यर्थ्यांचा कोरोना महामारीत विद्यार्थ्यांचा खूप वेळ गेला. सीबीएससी बोर्डानेही अकरावी, बारावी इयत्तेच्या अभ्यासक्रमात कपात केली. आम्ही सुद्धा यावर विचार करत होतो.” तसेच अभ्यासक्रम कपातीमागे विद्यार्थ्यांचा ताण दूर व्हावा हा एकमेव उद्देश असून यामागे कुठलेही राजकारण करण्याचा उद्देश नासल्याचं काकती यांनी म्हटलंय

संबंधित बातम्या:

Varsha Gaikwad | पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

उस्मानाबाद | आयुर्वेद अभ्यासक्रमात बदल करणार : मंत्री अमित देशमुख

(Assam government reduce syllabus lessons Jawaharlal Nehru omitted)