Astrology : या शुभ योगात जन्मलेले लोकं असतात सर्वाधीक बुद्धीमान, लक्ष्मीचा कायम असतो आशिर्वाद

| Updated on: Jun 03, 2023 | 7:29 PM

जर तुम्ही एखाद्याचा स्वभाव चांगला असेल. समाजात त्याला आदर्श व्यक्ती म्हणून ओळखले जात असेल तर निश्चीतच त्याचा जन्म एखाद्या शुभ योगात झालेला असतो.

Astrology : या शुभ योगात जन्मलेले लोकं असतात सर्वाधीक बुद्धीमान, लक्ष्मीचा कायम असतो आशिर्वाद
जोतिषशास्त्र
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार (Astro Tips), जन्मतारीख, वार, नक्षत्र, राशी आणि योग यांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव बनतो. आज आपण विशिष्ट योगात जन्मलेली व्याक्ती कशी असते याबद्दल जाणून घेऊया. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला फक्त त्याचे बाह्य व्यक्तिमत्व दिसते. किंबहुना व्यक्तिमत्व आणि निसर्गाच्या जडणघडणीत अनेक घटक हातभार लावतात. जर तुम्ही एखाद्याचा स्वभाव चांगला असेल. समाजात त्याला आदर्श व्यक्ती म्हणून ओळखले जात असेल तर निश्चीतच त्याचा जन्म एखाद्या शुभ योगात झालेला असतो. त्या शुभ योगाच्या प्रभावामुळे त्याच्या अंगी सकारात्मक गुण आलेले असतात. जाणून घेऊया काही विशिष्ट योगाबद्दल ज्यात जन्मलेले मुलं हे भाग्यवान मानले जाते.

प्रीती योग

प्रीति योग खूप शुभ मानला जातो. या योगात जन्मलेली व्यक्ती विषयांची जाणकार असते आणि उत्साहाने कोणतेही कार्य करते. प्रीति योगात जन्मलेले  लोकं सौंदर्य प्रेमी असतात आणि  आपल्या जोडीदारावर निस्सीम प्रेम करतात. ते हुशार असतात आणि कोणत्याही प्रकारे त्यांचा स्वार्थ कसा सिद्ध करायचा हे त्यांना ठाऊक असते.

आयुष्मान योग

आयुष्मान योगामध्ये जी व्यक्ती जन्म घेते, त्या व्यक्तीला दिर्घायू लाभते, म्हणजेच त्याला दीर्घकाळ भौतीक सुख प्राप्त होते. या योगाच्या लोकांना कविता आणि गाणी आवडतात. या योगाचे लोकं धनवान असतात. ते सामर्थ्यवान आणि संघर्षाच्या वेळी त्यांच्या शत्रूंचा पराभव करण्यास सक्षम असतात.

हे सुद्धा वाचा

सौभाग्य योग

या योगात जन्मलेल्या व्यक्तीवर या योगाच्या नावाचा पूर्ण प्रभाव पडतो. या योगाची व्यक्ती भाग्यवान असते. ते सर्व प्रकारच्या गुणांनी परिपूर्ण असतात. ते जिथे असतील तिथे त्यांच्या गुणांचे कौतूक होते. या योगाच्या व्यक्तींना आपल्या जोडीदारा विषयी विशेष आसक्ती असते, सुंदर महिला आणि पुरुष त्यांना मोहित करतात.

धृती योग

धृती योगामध्ये जन्मलेल्या व्यक्तीमध्ये खूप संयम असतो, ते कोणत्याही गोष्टीबद्दल लगेच उत्साहित होत नाही, परंतु विचार करून निर्णय घेतो. त्यांचे आरोग्य चांगले आहे, ते सहसा निरोगी राहतात. ते विद्वान आणि सद्गुणी असतात. ते समृद्ध आणि आनंदी जीवन जगतात आणि समाजात प्रतिष्ठा मिळवतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)