AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्यांना बळीचा बकरा बनवलं’, उच्च न्यायालयाकडून तब्लिगी प्रकरणातील गुन्हे मागे घेण्याचे आदेश

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने तब्लिगी जमातवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत (Aurangabad High Court on FIR against Tablighi Jamaat).

'त्यांना बळीचा बकरा बनवलं', उच्च न्यायालयाकडून तब्लिगी प्रकरणातील गुन्हे मागे घेण्याचे आदेश
| Updated on: Aug 22, 2020 | 11:17 PM
Share

औरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने देशभरात गाजलेल्या तब्लिगी प्रकरणात महत्त्वाचा निर्णय दिला आहे (Aurangabad High Court on FIR against Tablighi Jamaat). न्यायालयाने या प्रकरणातील 29 परदेशी तब्लिगी जमातींवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी न्यायालयाने त्यांना बळीचा बकरी बनवण्यात आल्याचंही निरिक्षण नोंदवलं आहे. तसेच त्यांना या प्रकरणात चुकीची वागणूक देणं योग्य नसल्याचं स्पष्ट केलं.

उच्च न्यायालयाच्या या निर्णयाने तब्लिगी प्रकरणातील परदेशी नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 29 तब्लिगी जमातच्या अनुयायांवर वेगवेगळ्या कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. साथरोग कायदा, महाराष्ट्र पोलीस कायदा आणि परदेशी नागरिक कायद्यान्वये या प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले होते. न्यायमूर्ती टी. व्ही. नलवडे आणि न्यायमूर्ती एम. जी. शेवळीकर यांच्या खंडपीठाने आज (22 ऑगस्ट) तीन वेगवेगळ्या याचिकांवर सुनावणी करताना हा निर्णय दिला. यानुसार आता हे सर्व गुन्हे रद्द करण्यात येणार आहेत.

न्यायालयाने म्हटलं, “भारतात केवळ परदेशी नागरिकांमुळेच कोरोनाचा संसर्ग होत आहे, असं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणात त्यांना केवळ ‘बळीचा बकरा’ बनवण्यात आलं. त्यांना मदत करण्याऐवजी आपण त्यांच्यावर आरोप केले आणि त्यांना तुरुंगात टाकलं. त्यांना विषाणूचा संसर्ग होण्यासाठी जबाबदार धरलं.”

ज्या व्यक्तींवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत ते सर्व दिल्लीतील निजामुद्दीनच्या तब्लिगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यानंतर त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्या होत्या. गुन्हे दाखल झाल्यानंतर या सर्वांनी न्यायालयात दाद मागितली. यावेळी त्यांनी आपली विमानतळावर नियमाप्रमाणे सर्व तपासणी झाली होती. तसेच कोरोनाची कोणतीही लक्षणं नसल्यानेच प्रवेश दिल्याचं न्यायालयाच्या लक्षात आणून दिलं. न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजून ऐकून घेतल्यानंतर आपला निर्णय दिला.

हेही वाचा :

तब्लिग कनेक्शन : अहमदनगरमध्ये 29 परदेशी नागरिक सापडले, धार्मिक स्थळांवर गुन्हा

उपचार काय करताय, मरकजवाल्यांना गोळ्या घाला : राज ठाकरे

भाज्यांना थुंकी लावणारे, नर्ससमोर नग्न फिरणाऱ्यांना फोडून काढा आणि व्हिडीओ व्हायरल करा : राज ठाकरे

Aurangabad High Court on FIR against Tablighi Jamaat

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.