AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | औरंगाबाद महापालिका प्रभाग आराखड्यावर 29 आक्षेप, 16 जूनपर्यंत हरकतींसाठी मुदत, आत्तापर्यंतचे आक्षेप काय?

प्रभाग रचनेच्या आराखड्यावर नागरिकांना सूचना आणि हरकती नोंदवण्यासाठी 16 जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. येत्या 17 जून रोजी नागरिकांकडून मिळालेल्या सूचना आणि हरकती निवडणूक आयोगकाकडे पाठवल्या जातील. 24 जून रोजी यावर सुनावणी होणार आहे.

Aurangabad | औरंगाबाद महापालिका प्रभाग आराखड्यावर 29 आक्षेप, 16 जूनपर्यंत हरकतींसाठी मुदत, आत्तापर्यंतचे आक्षेप काय?
औरंगाबाद महापालिका
| Edited By: | Updated on: Jun 15, 2022 | 10:54 AM
Share

औरंगाबादः शहरातील महापालिकेच्या निवडणुकांसाठी (Aurangabad municipal Corporation) प्रभाग प्रारुप आराखड्यावर (ward structure) आतापर्यंत 29 आक्षेप आणि सूचना प्राप्त झाल्या आहेत. मनपाच्या 42 प्रभागांचा प्रारुप आराखडा 2 जून रोजी प्रसिद्ध करण्यात आला. त्यानुसार, 14 जूनपर्यंत 29 जणांनी आक्षेप नोंदवले आहेत. आराखड्यावर नागरिकांना सूचना आणि हरकती नोंदवण्यासाठी 16 जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. येत्या 17 जून रोजी नागरिकांकडून मिळालेल्या सूचना आणि हरकती निवडणूक आयोगकाकडे (Election Commission) पाठवल्या जातील. 24 जून रोजी यावर सुनावणी होणार आहे. त्यानंतर आयोगाकडे शिफारशी केल्या जातील. नव्याने केलेल्या प्रभागरचनेत अनेक प्रस्थापित नेत्यांच्या वॉर्डांचे विविध प्रभागांत विभाजन झाले आहे. त्यामुळे या विभाजनावर नेत्यांनी आक्षेप घेतले आहेत. भाजपनेही यापूर्वी आराखड्यावर आक्षेप नोंदवला आहे.

आतापर्यंतचे आक्षेप काय?

  • प्रभाग क्रमांक 42 या कांचनवाडी नक्षत्रवाडी, राहुलनगर, सादातनगर, ईटखेडा या प्रभागात तिरुपती एन्क्लेव्ह, ऑरेंज सिटी, गिरिजा शंकर विहार, जालान नगर, अप्रतिम घरकुल या भागांचा समावेश करावा
  • चतुःसीमांप्रमाणे चुनाभट्टी हा भाग प्रभाग क्रमांक 22 मध्ये येतो. मात्र हा भाग आता प्रभाग 23 मध्ये टाकण्यात आला आहे. त्यामुळे हा भाग पुन्हा प्रभाग क्रमांक 22 मध्ये टाकण्यात यावा.
  • प्रभाग क्रमांक 7 मधून प्रगती कॉलनी वगळून बिस्मिल्ला कॉलनी हा भाग समाविष्ट करण्यात यावा
  • प्रभाग क्रमांक 5 मध्ये जयसिंगपुरा भागातील मतदारांचा समावेश करावा
  • विजयश्री कॉलनी प्रभाग क्रमांक 18 गुलमोहोर कॉलनीत समाविष्ट करावा
  • प्रभाग क्रमांक 22 राजाबाजर, नवाबपुरा, औरंगपुरा या प्रभागाची व्याप्ती आणि प्रभागाच्या सीमांमधील तफावती दूर कराव्यात
  • संजय नगर गल्ली क्रमांक 10 ही एकच गल्ली प्रभाग 34 आणि 35 मध्ये समावि्ट करण्यात आली आहे. याबद्दलही आक्षेप आहे.
  • प्रभाग रचनेवर राजकीय दबाव असून यातील फेरबदल जाणीवपूर्वक केले असल्याचाही आक्षेप घेण्यात आला आहे.

शिवसेना नेते खैरेंची तक्रार काय?

दरम्यान, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दोन दिवसांपूर्वी राज्य निवडणुकूक आयोगाकडे तक्रार केली आहे. औरंगाबाद महापालिकेचा प्रभाग रचना आराखडा जाहीर होण्यापूर्वीच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा गोपनीयतेचा भंग असल्याने आराखडा नव्याने करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच आराखडा सादर करताना तो पाहण्यास अधिक स्पष्ट आणि सोपा जावा, याकरिताही त्यांनी अनेक सूचना दिल्या आहेत.

प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.