अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा, बबनराव लोणीकरांची मागणी

| Updated on: Aug 20, 2020 | 5:25 PM

अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी बबनराव लोणीकर यांनी केली (Babanrao lonikar demand to give 25 Thousand Per Hectare to  farmer)  आहे.

अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा, बबनराव लोणीकरांची मागणी
Follow us on

जालना : अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केली आहे. विभागीय आयुक्तांसह मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांना लोणीकरांनी या मागणीचे पत्र पाठवलं आहे. विभागीय आयुक्त आणि सर्वच जिल्हाधिकारी यांनी आपापल्या जिल्ह्यात तात्काळ पंचनामे करण्याबाबत आदेश द्यावे. तसेच या नुकसानीचा पंचनामा राज्य सरकारकडे तात्काळ पाठवून शेतकऱ्याला मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करावा, असेही बबनराव लोणीकर यांनी पत्रात म्हटलं आहे. (Babanrao lonikar demand to give 25 Thousand Per Hectare to  farmer)

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्षात असताना बांधावर जाऊन 25 हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती. आता खरं तर ते सत्तेत आहेत आणि त्यांनी शेतकऱ्यांना मदत करावी, असा सल्ला बबनराव लोणीकरांनी शरद पवारांना दिला.

हेक्टरी 25 हजार रुपयांची मदत देणे आवश्यक असल्याचे मत देखील लोणीकरांनी व्यक्त केलं आहे. शेतकरी उध्वस्त झालेला असून कोरोनामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. अशा परिस्थितीत त्यांना मदतीची गरज आणि आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.

त्यामुळे येत्या अधिवेशनात 25 हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची मागणी सरकारकडे करणार आहे. तसेच ही मागणी पूर्ण होईपर्यंत सभागृहाचे काम चालू देणार नसल्याचा थेट इशारा लोणीकरांनी दिला आहे. (Babanrao lonikar demand to give 25 Thousand Per Hectare to  farmer)

संबंधित बातम्या : 

विहिरीत पडलेला उंदीर काढणे जीवावर, तिघा मजुरांचा विषारी वायूने गुदमरुन मृत्यू

पवारांनी साताऱ्याला दिलेली रेमडीसिव्हीर इंजेक्शन गहाळ प्रकरण, गृहराज्यमंत्र्यांचा कारवाईचा इशारा

शेतकरी मोर्चाला कोणत्या हिरोईनला आणायचं सांगा, नाही तर तहसिलदार मॅडम आहेच : बबनराव लोणीकर