AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाराणसीपासून फक्त 100 किमी अंतरावर असलेल्या ‘या’ 4 सुंदर धबधब्यांना एकदा नक्की द्या भेट

गंगा नदीच्या काठावर वसलेले वाराणसी हे शहर त्यांच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वासाठी ओळखले जाते. येथे असलेले काशी विश्वनाथ 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. तुम्ही देखील दर्शनासाठी येथे येत असाल तर येथील हे चार अतिशय सुंदर धबधबे पाहण्याचा आंनद नक्की घ्या.

वाराणसीपासून फक्त 100 किमी अंतरावर असलेल्या 'या' 4 सुंदर धबधब्यांना एकदा नक्की द्या भेट
Beautiful waterfalls near Varanasi Within 100 kilometres Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 25, 2025 | 2:09 PM
Share

वाराणसी शहर ज्याला कोणी बनारसी किंवा काशी असेही म्हणतात. हे एक प्राचीन शहर असल्याने याला इतिहास आहे. तसेच हे एक महादेवाच्या श्रद्धेचे शहर आहे. येथे काशी विश्वनाथ मंदिर, संकटमोचन मंदिर अशी अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत. वाराणसीला आल्यावर येथील गंगा नदीच्या काठावर बसल्यावर तुम्हाला मनःशांती मिळते. याशिवाय तुम्हाला गंगा आरती पाहण्याची संधी मिळते. तर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या या शहरात भगवान शंकराचे हे शहर इतके खास आहे की ते शब्दात वर्णन करता येत नाही. वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराव्यतिरिक्त, तुम्ही इतर अनेक मंदिरांना भेट देऊ शकता. याशिवाय, दशाश्वमेध घाट, अस्सी घाट, रामनगर किल्ला आणि मणिकर्णिका घाट आहेत. याशिवाय तुम्ही येथील निसर्गाच्या सानिध्यात जाऊ इच्छित असाल तर वाराणसीपासून 100 किमी अंतरावर असलेल्या या सुंदर ठिकाणांना भेट देऊ शकता. येथील निसर्गाचे सौंदर्य वाढवणाऱ्या धबधब्यांना नक्की भेट द्या. चला तर मग आजच्या या लेखात आपण वाराणसी मधील काही खास सुंदर धबधब्यांबद्दल जाणून घेऊयात…

लखनिया हिल्स आणि धबधबा, मिर्झापूर

वाराणसीपासून लखानिया हिल्स आणि धबधब्याचे अंतर सुमारे 50 ते 55 किमी आहे. हे एक खूप सुंदर ठिकाण आहे. लखानिया दारी हा उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील अहरौरा जवळ असलेला धबधबा आहे. वाराणसीजवळ भेट देण्यासाठी हे सर्वात प्रसिद्ध ठिकाण आहे. सुमारे 150 मीटर उंचीवरून तलावात कोसळणारा हा धबधबा खुप सुंदर दिसतो. पडते. या ठिकाणी येणे तुमच्यासाठी खूप रोमांचक असू शकते. तसेच पिकनिक आणि ट्रेकिंगसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. धबधब्यातून पडणारे पाणी आणि आजूबाजूची हिरवळ मनाला शांत करते आणि फोटोग्राफीसाठी देखील हे एक उत्तम ठिकाण आहे.

View this post on Instagram

A post shared by Anuj Sharma (@animator_anuj)

देवदरी धबधबा

वाराणसीपासून 70 ते 75 किलोमीटर अंतरावर असलेल्या देवदरी धबधब्याला तुम्ही भेट देऊ शकता. राजदरी आणि देवदरी धबधबे चंद्रप्रभा वन्यजीव अभयारण्याचा एक भाग आहेत. जिथे तुम्हाला अनेक प्रजातींचे प्राणी आणि पक्षी पाहायला मिळतील. याशिवाय, नाश्ता आणि जेवणासाठी येथे अनेक दुकाने आहेत. येथे तुम्हाला निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्याची संधी मिळू शकते.

वाराणसीहून राज राणी धबधबा

वाराणसीपासून सुमारे 60 किमी अंतरावर चंदौली जिल्ह्यात असलेल्या राज राणी धबधब्याला तुम्ही भेट देऊ शकता. हे एक उत्तम पिकनिक स्पॉट आहे. जर तुम्हाला कुटुंबासह पिकनिकला जायचे असेल तर तुम्ही इथे जाऊ शकता. हा धबधबा गर्दीपासून दूर शांत ठिकाणी आहे. तसेच आजूबाजूला हिरवळ आहे.

तांडा धबधबा, मिर्झापूर

तांडा धबधबा मिर्झापूरच्या तांडा गावात आहे. तो वाराणसीपासून सुमारे 75 किमी अंतरावर आहे. हा धबधबा घाघरा नदीची उपनदी असलेल्या तांडा नदीवर आहे. हे वाराणसीजवळील सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक आहे. तसेच हे एक लोकप्रिय पिकनिक स्पॉट आहे. तुम्ही येथे फिरायला देखील जाऊ शकता. शहराच्या गर्दीपासून दूर, तुम्हाला येथे एक ताजेतवाने वातावरण मिळेल.

दादांच्या उत्तराधिकारी सुनेत्रा पवारच?उपमुख्यमंत्रीपदासाठी नाव आघाडीवर
दादांच्या उत्तराधिकारी सुनेत्रा पवारच?उपमुख्यमंत्रीपदासाठी नाव आघाडीवर.
अवकाळी पावसाचा थयथयाट... वारा एवढा सुटला की पपईची गाडीच उलटली
अवकाळी पावसाचा थयथयाट... वारा एवढा सुटला की पपईची गाडीच उलटली.
विलीनीकरण करुन अजित पवार यांची इच्छा पूर्ण करणार?
विलीनीकरण करुन अजित पवार यांची इच्छा पूर्ण करणार?.
विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद मिळू नये म्हणून सरकारचा डाव?
विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद मिळू नये म्हणून सरकारचा डाव?.
शेवटच्याक्षणी पायलटने प्रतिसाद का दिला नाही? विमानात नेमकं काय घडलं?
शेवटच्याक्षणी पायलटने प्रतिसाद का दिला नाही? विमानात नेमकं काय घडलं?.
पवार घराण्यातून नेतृत्व कुणाकडे? राजकीय वारसा कोण चालवणार?
पवार घराण्यातून नेतृत्व कुणाकडे? राजकीय वारसा कोण चालवणार?.
जीवश्य कंठश्य मित्र...; फडणवीसांनी लिहिला भावनिक लेख!
जीवश्य कंठश्य मित्र...; फडणवीसांनी लिहिला भावनिक लेख!.
आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला! रोहित पवारांचं भावनिक ट्विट
आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला! रोहित पवारांचं भावनिक ट्विट.
अजित पवारांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार?
अजित पवारांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार?.
यंदाच्या वर्षात सोन अडीच लाखांच्या घरात जाणार? काय आहेत सध्याचे दर?
यंदाच्या वर्षात सोन अडीच लाखांच्या घरात जाणार? काय आहेत सध्याचे दर?.