…तर एकाही मंत्र्याला जिल्ह्यात पाय ठेऊ देणार नाही, बोंडअळीच्या प्रश्नावरुन भाजप आक्रमक

त्यामुळे बोंडअळीच्या मुद्द्यावर राजकारण तापत असल्याचे चित्र दिसत आहे. (BJP demand to Give Help to Farmer at Nandurbar District)

...तर एकाही मंत्र्याला जिल्ह्यात पाय ठेऊ देणार नाही, बोंडअळीच्या प्रश्नावरुन भाजप आक्रमक
फोटो प्रातिनिधीक
Follow us
| Updated on: Nov 21, 2020 | 4:49 PM

नंदूरबार : नंदूरबार जिल्ह्यात बोंड अळीमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकार जोपर्यंत बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करत नाही. तसेच याबाबत कोणतीही नुकसान भरपाई देत नाही. तोपर्यंत नंदूरबारमध्ये एकाही मंत्र्याला पाय ठेऊ देणार नाही, अशी भूमिका भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्याने घेतली आहे. त्यामुळे बोंडअळीच्या मुद्द्यावर राजकारण तापत असल्याचे चित्र दिसत आहे. (BJP demand to Give Help to Farmer at Nandurbar District)

नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली जात असते. मात्र यावर्षी कापूस लागवडीपासूनच कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. अतिवृष्टीमुळे कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर आता पुन्हा कापसावर बोंड अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने कापूस उत्पादनावर परिणाम झाला आहे.

बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांनी कापसाचे पीक काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही आहे. त्यामुळे सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई जाहीर करा, अशी मागणी वारंवार भाजपकडून केली जात आहे.

जर ही मागणी मान्य केली नाही, तर नंदूरबार जिल्ह्यात एकाही मंत्र्यांला फिरकू देणार नाही, असा इशारा भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांकडून सातत्याने याबाबतची मागणी केली जात आहे. मात्र सरकार शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेत नसल्याने भाजपने हा पावित्रा घेतला आहे. त्यामुळे एकूणच जिल्ह्यात बोंडअळीच्या प्रश्नावरून राजकारण तापत असल्याचे चित्र दिसून येत आहे(BJP demand to Give Help to Farmer at Nandurbar District)

संबंधित बातम्या : 

सोलापूर एसटीला मोठा दिलासा, प्रवासी उत्पन्नात राज्यात चौथा क्रमांक, तर कार्तिक यात्रेतील खिलार जनावरांचा बाजार रद्द

कृषी पंपधारकांचे 15 हजार कोटींचे वीजबिल माफ करणार; राज्य सरकारची मोठी घोषणा

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.