AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फडणवीस सरकारच्या धनगर समाजासाठीच्या योजना आघाडी सरकारकडून बंद : गोपीचंद पडळकर

भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकासआघाडी सरकारवर धनगरविरोधी असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

फडणवीस सरकारच्या धनगर समाजासाठीच्या योजना आघाडी सरकारकडून बंद : गोपीचंद पडळकर
| Updated on: Dec 11, 2020 | 6:29 PM
Share

मुंबई : भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकासआघाडी सरकारवर धनगरविरोधी असल्याचा गंभीर आरोप केला आहे. आघाडी सरकारने देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने धनगर समाजासाठी सुरु केलेली योजना बंद केल्याचाही आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला. तसेच सरकारने जे आदिवासींसाठी ते धनगरांसाठी या न्यायाने तात्काळ धनगर समाजाला निधी उपलब्ध करुन देत योजना पुन्हा सुरु करावी, अशी मागणी केली (BJP leader Gopichand Padalkar criticize Thackeray Government over Dhangar Schemes and Fund issue).

गोपीचंद पडळकर म्हणाले, “धनगर समाजातील मेंढपाळ बांधवांसाठी फडणवीस सरकारने 2018 मध्ये महाराजा यशवंतराव होळकर महामेष योजना सुरु केली होती. या योजनेत प्रत्येक तालुक्यातील 15-20 युवकांना मेंढ्या दिल्या जायच्या. यासाठी लाभार्थीने 47 हजार रुपये भरल्यानंतर 3 लाख रुपयांपर्यंतच्या शेळ्या आणि मेंढ्या या योजनेतून दिल्या जायच्या. मात्र, आघाडी सरकारच्या काळात मागील वर्षीच्या मागणीधारकांना देखील हा निधी देण्यात आला नाही. या वर्षी देखील या योजनासाठी काहीही तरतूद नाही.”

“या योजनेतून बेरोजगारांना पर्याय मिळाला होता. यामुळे अनेकांना या योजनेचा लाभ झाला. परंतू राज्यात हे महाविकासआघाडीचं सरकार आल्यापासून एकही योजना पुढे कार्यन्वित केली नाही. हे सरकार धनगर समाजाच्या विरोधात भूमिका घेतंय. फडणवीस सरकारने जी 1 हजार कोटी रुपयांची घोषणा केली, त्यावरही पुढे कार्यवाही झाली नाही. त्यावरुन हे सरकार धनगर समाजाच्या विरोधात असल्याचं दिसतंय. यावर सरकारने त्वरित निर्णय घ्यावा आणि महाराजा यशवंतराव होळकर महामेष योजना पुन्हा सुरु करावी,” असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

“ज्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केले आहेत त्यांना निधी उपलब्ध करुन द्यावा. 2019-20 चे 1 कोटी आणि 2020-21 चे 1 कोटी निधी द्यावा. जे आदिवासींना ते धनगरांना या प्रमाणे निर्णय घ्यावा. यावर्षी आदिवासींना 8 हजार 853 कोटी रुपये निधी दिला आहे. त्यापटीत धनगरांनाही निधी द्यावा,” अशी मागणीही पडळकरांनी ठाकरे सरकारकडे केली.

हेही वाचा :

शेळ्या-मेंढ्या चारल्या म्हणून गुन्हे दाखल करणं थांबवा : असीम सरोदे

…तर माळी, धनगर, वंजाऱ्यांचं आरक्षण काढून टाका : सराटे

जानकर ते पडळकर… लोकसभेसाठी सर्व धनगर नेते एकवटले!

BJP leader Gopichand Padalkar criticize Thackeray Government over Dhangar Schemes and Fund issue

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.