
मुंबईतील जागा वाटपासाठी भाजप आणि शिवसेनेच्या चर्चेची फेरी सुरू आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिंदेसेनेतील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. तर नाशिकमध्ये ठाकरे सेनेतील माजी महापौर हे भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे निष्ठावंत नाराज झाले आहेत. तर पुण्यामध्ये काका-पुतण्यामधील जागा वाटपाचा पेच अद्याप सुटलेला नाही. तर सूत्रांच्या माहितीनुसार दोन्ही राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनिकरणाची चर्चा सुद्धा सुरू आहे. मनपा निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र हे दोन्ही भाषेत इंग्रजी आणि मराठीत देता येणार आहे. प्रकाश महाजन हे शिंदे सेनेत जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात नोटांचे मोठे घबाड सापडल्याने खळबळ उडाली आहे. तर रेल्वे प्रवास महागला आहे. एससी पासून ते सर्वसाधारण कोचच्या तिकीटाचे दर वाढले आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून मशाल रॅलीचं आयोजन
या रॅलीला युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची उपस्थिती
रॅली संपल्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या हस्ते संस्थान गणपतीला नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ
शिवसेना ठाकरे गटाकडून महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात
काही वेळातच अजित पवारांची पिंपरी- चिंचवडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत बैठक होणार आहे. अजित पवार हे पुण्यातून निघले आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची हालचालींना वेग आला आहे. जागावाटप आणि युतीवर शिक्का मोर्तब होण्याची शक्यता आहे.
राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे, आज जालन्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. दरम्यान जालना महानगरपालिका निवडणूक महायुती म्हणून लढू, महायुती झाली नाही तर आमच्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत, असं यावेळी माजी आमदार अरविंद चव्हाण यांनी म्हटलं आहे.
कल्याण–डोंबिवली महापालिका निवडणुकीची रणधुमाळी
कल्याण–डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी तिसऱ्या दिवशी 711 उमेदवारी अर्जांची विक्री
पालिकेच्या 9 प्रभागांत तीन दिवसात एकूण 2325 दिवशी उमेदवारी अर्जांची विक्री
तर एकूण तीन जणांनी अपक्ष उमेदवारी अर्ज केले दाखला
जालना शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. जालना शहरातील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पक्ष कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. मुलाखतीसाठी जवळपास 125 इच्छुक उमेदवारांनी अर्ज दिल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांनी दिली आहे
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा करमाळा पोलीस स्टेशनच्या आवारात दोन गटात हाणामारी झाली आहे. या घटनेमुळे करमाळ्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. दोन्ही गटांनी पोलिसांसमोरच एकमेकांना काठीने मारहाण करत शिवीगाळ केली.
पुण्यातल्या मुळशी धरणात मुळशी ते वाघवाडी दरम्यान स्थानिकांसाठी प्रवासी बोट सेवा सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते बोटं सेवेच लोकार्पण झाले आहे. या प्रवासी बोट सेवेच्या माध्यमातून मौजे मुळशी – वाघवाडी या मार्गावरील ग्रामस्थांचे दळणवळण अधिक सुलभ होणार आहे.
बीड जिल्ह्यात रेशन दुकानाच्या माध्यमातून दिली जाणारी ज्वारी आणि इतर धान्य हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे येत असल्याच्या अनेक तक्रारी होत आहेत. सामाजिक कार्यकर्ते ललित अबड हे आज रेशन दुकानातून मिळालेली ज्वारी घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले. अत्यंत निकृष्ट दर्जाची ज्वारी असल्याची सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करू असे आश्वासन दिले आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली आहे.
कल्याण डोंबिवलीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. डोंबिवलीमध्ये सभेआधी शिवसेनेची जय्यत तयारी सुरु आहे. डोंबिवलीच्या सम्राट चौकात मोठा स्टेज उभारला जात आहे. या स्टेजवर हजारो कार्यकर्त्यांची बैठकीची व्यवस्था केली जात आहे.
पूर्ण परिसर भगवामय करत जागोजागी एलईडी स्क्रीन ,स्पीकर झेंडे लावत शिवसेनेचा शक्ती प्रदर्शन केलं जात आहे. डोंबिवलीमध्ये उपमुख्यमंत्री आजच्या सभेत काय बोलतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सोलापूर महापालिका निवडणुकीदरम्यान भाजपच्या 2 आमदारांनी नाराजी उघड केली आहे. भाजप आमदार सुभाष देशमुख तसेच आमदार विजयकुमार देशमुख पक्षाच्या धोरणावर नाराज आहेत. भाजपच्या निष्ठावंतांना तिकीट न मिळाल्यास ते ज्या पक्षात जातील त्यांचा प्रचार आम्ही करणार , असं विधान भाजप आमदार सुभाष देशमुखांनंतर आमदार विजयकुमार देशमुख यांनी केलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यात औरंगजेबाचा आत्मा जाऊन बसला आहे, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. तसेच जल्लाद फडणवीस यांनी लोकशाहीला फाशी दिली, असंही सपकाळ म्हणाले.
मुंबई पालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भाजप 140 आणि शिंदे शिवसेना 87 जागांवर लढणार असल्याचं म्हटलं जात आहे. तर रिपाईला भाजपच्या कोट्यातून जागा देण्यात येणार असल्याचं सूत्रांद्वारे म्हटलं जात आहे.
नांदेड महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने चंद्रशेखर बावनकुळे, नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थित संभाजीनगरमध्ये मध्ये बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीला खासदार अशोकराव चव्हाण, खासदार डॉक्टर अजित गोपछडे, माजी मंत्री डी पी सावंत, माजी आमदार अमर राजूरकर आणि जिल्हाध्यक्ष संतोष हंबर्डे उपस्थित आहेत. नांदेड महानगरपालिका शिवसेना आणि भाजपा युती संदर्भात या बैठकीत चर्चा होणार असल्याचं समजतंय.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जवळ येत आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. दुसरीकडे, बंडखोरी टाळण्यासाठी भाजपाने सावध भूमिका घेतली आहे. मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपाकडून सोमवारी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
पुण्यात भाजप शिवसेना युतीच्या जागा वाटपाचा तिढा कायम आहे. पुण्यात भाजपाकडून 125 जागांचा निर्धार करण्यात आला आहे. भाजपाकडून अवघ्या 15 जागांचा शिवसेनेला प्रस्ताव देण्यात आल्याचं बोललं जात आहे.
मुंबई महापालिकेसंदर्भात आमची उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली, असं जयंत पाटील म्हणाले. विद्यमान नगरसेवकांच्या जागा मिळाव्यात अशी मागणी आम्ही केली. मुंबईत महाविकास आघाडी एकत्र यावी अशी इच्छा आहे. ठाकरेंसोबत बरीच चर्चा झाली, पण निष्कर्षापर्यंत पोहोचलो नाही, असंही त्यांनी सांगितलं नाही.
मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने असा निर्णय दिला आहे की केंद्र सरकार ऑस्ट्रेलियामध्ये लागू केलेल्या कायद्याप्रमाणेच मुलांच्या इंटरनेट वापराचे नियमन करण्यासाठी कायदा करण्याचा विचार करू शकते. न्यायालयाने म्हटले आहे की जोपर्यंत असा कायदा लागू होत नाही, तोपर्यंत राज्य आणि राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग बाल हक्क आणि सुरक्षित इंटरनेट वापराबद्दल मुलांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कृती योजना विकसित करू शकते.
जळगावच्या भुसावळ नगरपालिकेच्या नवनियुक्त नगराध्यक्ष यांच्या जात प्रमाणपत्राविरोधात भाजपातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नवनियुक्त नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांच्या जात प्रमाणपत्राविरोधात आक्षेप घेतला आहे. प्रांतअधिकाऱ्यांनी कोणतेही कागदपत्र न तपासता जात प्रमाणपत्र दिल्याची भाजपचे मंत्री संजय सावकारे यांचा आरोप आहे. मी वैयक्तिक तक्रार दाखल केलेली नाही, परंतु अस घडलं असेल तर लक्ष घालणार, असं मंत्री संजय सावकारे म्हणाले.
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत अजितदादा यांची राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष अभिजीत देशमुख यांनी दिली आहे. अजित दादांची राष्ट्रवादी काँग्रेस महापालिकेत 100 जागा स्वबळावर लढवणार आहे. आम्ही भाजपासोबत बोलणी करताना 35 जागेची मागणी केली होती. परंतु, त्यांना त्यांच्या घरातील नातेवाईकांनाच निवडणुकीला उभे करायचे असल्यामुळे कदाचित त्यांना जागा कमी पडत असाव्या असा आरोप अभिजीत देशमुख यांनी केला.
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. सोन्याच्या दारात 900 रुपयांनी तर चांदीच्या दरात तब्बल 8 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 41 हजार 728 रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 36 हजार 900 रुपयांवर पोहोचले आहेत.
प्रकाश महाजन जूने बाळासाहेब याचे शिव सैनिक आहेत. कधीही मोठे पना दाखवला नाही. चांगले प्रवक्ते आहेत. राजकीय क्षेत्रामध्ये संयम ठेवायचा असतो. काही जण सनसनाटी पसरवत असतात. ते नेहमी साधे पाणाने राहिले. प्रकाश महाजन आल्यामुळे आणखी मजबूत शिवसेना होणार असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
परभणी महानगरपालिकेसाठी आम्ही 65 पैकी 35 पेक्षा अधिक जागा मिळवण्याचा प्रयत्न करू असे मेघना बोर्डीकर म्हणाल्या. परभणी महानगरपालिका जागा वाटपाच्या अनुषंगाने मंत्री मेघना बोर्डीकर याचं वक्तव्य
बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात येवल्यात हिंदू जनजागृती समिती आक्रमक झाली आहे. येवला तहसील कार्यालयावर मोर्चा काढत समितीने हल्ल्याचा निषेध केला. बांगलादेशी नागरिकांनी भारतातून बाहेर जा, अशी जोरदार घोषणाबाजी केली.
मालेगाव महापालिका निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. भाजपाकडून हिंदूबहुल 50% फॉर्मुलाचा आग्रह आहे. तर शिवसेनेला पूर्व भागात 13 जागांची मागणी करण्यात आली. निवडणूक जाहीर होऊन 10 दिवस होत आले तरी अद्याप कोणतीही ठोस युती नाही. एमआयएमकडून 50 उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू आहे. मंत्री दादा भुसे आणि गिरीश महाजन यांच्यात युतीसाठी चर्चा सुरू आहे.
सोलापूर महापालिकेत प्रहार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाची युती होण्याची शक्यता आहे. प्रहार आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या युतीची बोलणी अंतिम टप्प्यात आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीसोबत युती न झाल्यास तिसरी आघाडी बनवणार आहे. प्रहार, एमआयएम आणि समाजवादी पार्टी मिळून तिसरी आघाडी बनवणार आहेत.
पिंपरी चिंचवडमध्ये दोन राष्ट्रवादीच्या जागा वाटपाचा तिढा दोन जागांवर येऊन अडलाय. उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत झालेल्या गुप्त बैठकीत अमोल कोल्हे आणि रोहित पवारांनी या दोन जागांचा आग्रह धरलाय. पिंपरी विधानसभेची निवडणूक शरद पवारांच्या तिकिटावर लढलेल्या सुलक्षणा शिलवंत आणि युवाध्यक्ष इम्रान शेख यांच्यासाठी ही चढाओढ सुरुये. शरद पवारांनी सुद्धा दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीत आपल्याला या दोन्ही जागा घ्यायच्याच,असा मेसेज कोल्हे आणि रोहित पवारांकडे दिल्याचं बोललं जातंय.
धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अलर्ट आहे. कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून शहरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल असलेल्या 70 हिस्टरी सीटर्सला समज देण्यात आला आहे. खून, दरोडे, मारामाऱ्या, चोरी या इतर गुन्ह्यात संशयित असलेल्यांना पोलिसांकडून समज देण्यात आला.
मनसे उद्यापासून उमेदवारांना एबी फॉर्म देणार असल्याची माहिती आहे. तर नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर शीवतीर्थवर दाखल झाले आहेत. बंद लिफाफे घेऊन हे दोघं राज ठाकरेंच्या भेटीला गेले आहेत.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी जेष्ठ नेते अंकुश काकडे, आमदार बापूसाहेब पठारे अजित पवार यांच्या भेटीसाठी दाखलं. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका एकत्र लढवण्याचा विचार.
नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून पहिला उमेदवार अर्ज दाखल. 21 वर्षाच्या महिला उमेदवाराकडून करण्यात आला उमेदवारी अर्ज दाखल. ठाकरेंच्या सेनेत काल मोठे फूट पडल्यानंतर आज पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास नाशिकमध्ये सुरुवात. ठाकरेंच्या शिवसेनेकडून तरुणांना नाशिक मध्ये दिली जाणार संधी. आज 21 वर्षाच्या महिला उमेदवाराकडून आपला पहिला उमेदवारी अर्ज ठाकरे गटाकडून दाखल.
२ जानेवारी २०२६ पर्यंत VIP दर्शन व्यवस्था बंद असणार आहे. नाताळ आणि वर्षअखेर निमित्ताने लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे त्रंबकेश्वर मध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. एका भाविकाला दर्शनासाठी 3 ते 4 तासाचा वेळ लागतोय. सामान्य भाविकांना VIP दर्शनामुळे होणारा विलंब टाळण्यासाठी देवस्थान कडून व्हीआयपी दर्शन सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शरद पवार गटाची साथ सोडून प्रशांत जगताप यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पुण्यातील काँग्रेस कार्यालयात पार पडला.
“प्रशांत जगताप यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होतोय. प्रशांत जगताप यांना सर्वांनी ऑफर दिली. प्रशांत जगतापांनी आपली विचारधारा सोडली नाही. जातीयवादी पक्षांनीही जगताप यांना ऑफर दिली” असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
“हा दोन पक्षांचा स्वतंत्र विषय आहे.शरद पवार यांनी आमच्याशीही चर्चा केली, येणाऱ्या काळात काय होईल माहिती नाही. मात्र, अजित पवार व शरद पवार एकत्र आले तर शिवसेना त्यांच्यात नसेल असं अंबादास दानवे म्हणाले. पुणे, पिंपरी चिंचवड पालिकेत महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत, त्या पार्श्वभूमीवर दानवेंनी हे वक्तव्य केलं.
महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने छत्रपती संभाजी नगर मध्ये बावनकुळे यांच्या उपस्थित बैठक पार पडणार आहे. महानगरपालिकेच्या जागा वाटपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न होणार आहे. मंत्री अतुल सावे यांच्यासह भाजप नेत्यांची बैठकीला उपस्थित राहणार.
शिवसेनेला मोठा धक्का कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आज संध्याकाळी राष्ट्रवादी कार्यालयात प्रवेश… अनेक शिवसैनिकही करणारा आज राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश… कालच माजी नगरसेवक अशोक हरणावळ यांनी केला होता राष्ट्रवादी प्रवेश…
देशविरोधी आणि धर्मविरोधी लोकांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश दिला आहे. त्यांचं चरित्र आणि दिशा स्पष्ट होत आहे, त्यांना लांगूलचालन करायचं आहे, विशिष्ट लोकांचे जोडे चाटून मत मिळवायची आहेत. पण जनता हे बघत आहे. त्यांना (ठाकरे) याचं नुकसान सहन करावचं लागेल – देवेंद्र फडणवीस.
सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील बलगवडे येथे सौर उर्जाच्या नावाखाली निसर्गाची कत्तल करण्यात आली आहे. तब्बल 12 हजार हून अधिक झाडं बलगवडे येथे सौरऊर्जा प्रकल्पासाठी नेस्तनाबूत करण्यात आली आहेत. ग्रामस्थांचा विरोध झुगारून आणि प्रशासनाला अंधारात ठेवून हा सर्व प्रकार करण्यात आला असून त्यामुळे संतापाचं वातावरण आहे.
पुण्यात काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. दादांची राष्ट्रवादी सोडून काँग्रेस सोबत येण्याचं सुप्रिया सुळेंना आवाहन करण्यात आलं आहे. मविआ म्हणून निवडणुकीला सामोरं जाऊ असं अरविंद शिंदे यांनी म्हटलं आहे.
ठाणे महापालिकेचा महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याचे चित्र आहे. महायुतीत भाजपकडून 40-45 जागांची मागणी आहे, मात्र शिवसेनेकडून इतक्या जागा सोडण्यास नकार देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या भेटीला गेले. तिन्ही नेत्यांमध्ये ठाण्यासंदर्भात बैठक पार पडणार आहेत.
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनी एकत्र लढण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चाही पार पडली आहे. विशेष म्हणजे, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने अजित पवार यांची साथ सोडून महाविकास आघाडीसोबत येण्याचा निर्णय घेतल्यास, त्यांनाही या आघाडीत सामावून घेण्याची तयारी काँग्रेस आणि ठाकरे गटाने दर्शवली आहे. अजित पवार गटाला सोबत घेण्यास काँग्रेसने स्पष्ट विरोध केल्याने, आता शरद पवार गट काय भूमिका घेणार आणि पुण्यात महाविकास आघाडीचे नेमके स्वरूप काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अमरावती : महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना आणि रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षातील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. नागपूरमधील चर्चेची फेरी निष्फळ ठरल्यानंतर आता सर्वांचे लक्ष आज अमरावतीत होणाऱ्या भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या बैठकीकडे लागले आहे. शिवसेनेने ४५ जागांचा प्रस्ताव मांडून आक्रमक पवित्रा घेतला असला, तरी भाजप किती जागा सोडण्यास तयार आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मित्रपक्षांच्या वाढत्या अपेक्षा आणि विद्यमान जागांचे समीकरण यामुळे जागावाटपाचा हा पेच अधिकच गडद झाला असून, आजच्या बैठकीत तोडगा निघणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
वर्धा जिल्ह्यातील आर्वीमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. विधान परिषदेचे आमदार दादाराव केचे यांना पराभूत महिला उमेदवारांनी भररस्त्यात घेरत संताप व्यक्त केला. नगरपरिषद निवडणुकीत केचे यांनी पक्षाच्या विरोधात काम केल्याचा गंभीर आरोप या महिलांनी केला आहे. या प्रकारानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून आमदार केचे यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. हे मला राजकीय जीवनातून नेस्तनाबूत करण्यासाठी रचलेले मोठे षडयंत्र असून यामागे काही बड्या नेत्यांचा हात आहे, असा खळबळजनक आरोप दादाराव केचे यांनी केला आहे. मी पूर्ण ताकतीने भाजपचे उमेदवार निवडून आणण्यासाठी काम केले असताना केवळ बदनामी करण्यासाठी हा प्रकार घडवून आणल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले असून, संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी शरद पवार गट-अजित पवार गट यांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला असला, तरी जागावाटपावरून पेच निर्माण झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवार गटाने ४० ते ४५ जागांची मागणी केली आहे. मात्र अजित पवार गट त्यांना ३० जागा देण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. काल झालेल्या दीर्घ बैठकीनंतरही दोन्ही बाजूंनी आपापली भूमिका लावून धरल्याने हा तिढा अद्याप सुटू शकलेला नाही. शहरात एकेकाळी राष्ट्रवादीची मोठी ताकद राहिली असून, दोन्ही गट एकत्र आल्यास भाजपला कडवे आव्हान देता येईल, असे मानले जात आहे. मात्र, जागांच्या आकड्यावरून सुरू असलेली ही खेचाखेची लवकर न मिटल्यास इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरण्याची शक्यता आहे.
अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपने बंडखोरी रोखण्यासाठी एक मोठी रणनीती आखली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एका जागेसाठी अनेक इच्छुक उमेदवार असल्याने पक्षांतर्गत वाद टाळण्यासाठी भाजप शेवटच्या दिवशी म्हणजेच ३० डिसेंबर रोजी आपले एबी फॉर्म थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करणार आहे. सध्या एका जागेसाठी चार-चार उमेदवारांनी अर्ज भरल्याने पक्षात मोठी चुरस निर्माण झाली आहे. मात्र, तांत्रिकदृष्ट्या ज्या उमेदवाराच्या अर्जासोबत पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म जोडलेला असेल, त्याचाच अर्ज वैध ठरवला जातो आणि उर्वरित अर्ज बाद होतात. पक्षाच्या या खेळीमुळे शेवटच्या क्षणी अनेकांचा पत्ता कट होण्याची शक्यता असून, इच्छुकांमध्ये मोठी धाकधूक वाढली आहे.
स्वतंत्र नगरपालिका मागणी फेटाळल्याने सर्वपक्षीय संघर्ष समिती आक्रमक. सर्व राजकीय पक्ष व इच्छुक उमेदवारांना निवडणुकीपासून दूर राहण्याचे आवाहन. बहिष्कार झुगारल्यास निवडणुकीत सक्रिय हस्तक्षेप करून चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा. संघर्ष समितीच्या निर्णयामुळे पालिकेच्या निवडणुकीत पॅनल क्रमांक 13, 16, 17, 19, 30 व 31 वर मोठा राजकीय परिणाम संभव
अमरावती महानगरपालिका निवडणुकीत भाजप उमेदवाराचा एबी फॉर्म थेट निवडणूक अधिकाऱ्याकडे देणार- सूत्रांची माहिती बंडखोरी रोखण्यासाठी भाजपची शेवटच्या दिवशी रणनीती 30 डिसेंबर रोजी एबी फॉर्म देण्याची तयारी. इच्छुक उमेदवारांना बसू शकतो मोठा फटका एका जागेसाठी चार उमेदवारांचे अर्ज.
भाजपचे 7 तर शिवसेनेचे 6 सदस्य समितीत सहभागी…आतापर्यंत दोन महत्त्वाच्या बैठका संपन्न. मात्र जागावाटपावर तणाव कायम.बदलापूर-अंबरनाथ विजयानंतर भाजपचा आत्मविश्वास वाढला; कल्याण-डोंबिवलीत 5 वर्षांचे महापौर आणि ८३ जागांची केली मागणी. आमच्या मागण्या मान्य केल्या तर युती करू अन्यथा भाजप कार्यकर्त्यांमध्ये युतीबाबत नाराजी सूर स्वतंत्र लढण्याची मानसिकता भाजप माजी आमदार नरेंद्र पवार
पुणे महानगरपालिका निवडणुकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अजित पवारांकडे ४० ते ४५ जागांची मागणी. अजित पवारांकडून साधारण ३० जागा देण्याची भूमिका. कालच्या बैठकीनंतर ही जागा वाटपाचा तिढा अद्याप ही कायम
आज पुन्हा गिरीश महाजन आणि दादा भुसे यांच्यात चर्चा होण्याची शक्यता. 45 जागांवर शिवसेना ठाम सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यास स्वतंत्रपणे लढण्याची देखील शिवसेनेची तयारी. गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू आहे युती करण्यासंदर्भात भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी मध्ये चर्चा. आज सकारात्मक चर्चा न झाल्यास स्वतंत्रपणे लढण्याचा होऊ शकतो निर्णय
प्रभागात ज्या पक्षाकडे स्ट्रॉंग उमेदवार असेल ति जागा त्या पक्षाला सुटणार. काल रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत जागावाटपाबाबत सकारात्मक चर्चा. ठाकरे बंधू एकत्र येताच नाशिकमध्ये मनसे आणि महाविकास आघाडी एकत्र महापालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय
महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष यांच्यात जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. आज राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक होणार आहे.त्यामध्ये जागा वाटपावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष निवडणुकीसाठी एकत्र येण्यासंदर्भातील घोषणा आज होणार होती मात्र आता रविवारी होण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना भाजपा युतीचा पेच अजून काही सुटलेला नाही.युती संदर्भात दोन्ही पक्षाच्या पाच बैठका निष्फळ ठरत आहेत. आज पुन्हा भाजपा आणि शिवसेनेची युती आणि जागा वाटप संदर्भात बैठक होणार आहे. आजच्या बैठकीत शिवसेनेचे आमदार मंत्री संजय शिरसाट आणि भाजपचे आमदार मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. युती आणि जागा वाटपाचा तिढा अंतिम टप्प्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची आज संध्याकाळी 6 वाजता मशाल रॅली काढण्यात येणार आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काढण्यात येणाऱ्या या मशाल रॅलीला युवा सेना नेते आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत. मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी या मशाल रॅलीमध्ये उपस्थित राहण्याचे माजी विरोधी पक्षनेते आंबादास दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आवाहन केले आहे. क्रांती चौक ते गुलमंडी मशाल रॅली काढण्यात येणार आहे.
ऐन पर्यटन हंगामात छत्रपती संभाजीनगरला हवाई नकाशावरून ‘डिसकनेक्ट’ करण्याचा उद्योग इंडिगो एअरलाइन्सने सुरूच ठेवला आहे. सुरुवातीला केवळ १५ ते ३१ डिसेंबरपर्यंत स्थगित केलेली हैदराबाद-छत्रपती संभाजीनगर दुपारची हवाई सेवा आता संपूर्ण हिवाळी सत्रासाठी (मार्चपर्यंत) रद्द करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.विमानांची कमतरता आणि केंद्र सरकारच्या उडान योजनेतील अनुदानाचा फायदा घेण्यासाठी इंडिगोने प्रवाशांना वाऱ्यावर सोडले आहे. हैदराबादहून दुपारी १०:५५ वाजता निघून १२:२५ वाजता शहरात येणारे आणि दुपारी १२:५५ वाजता परतीसाठी झेपावणारे विमान अत्यंत लोकप्रिय होते.या नियमित सेवेला आधी आठवड्यातून तीन दिवस केले. त्यानंतर ३१ डिसेंबरपर्यंत स्थगितीचे नाटक केले आहे.
सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून एकत्रित इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. सांगलीतल्या आमराई क्लब या ठिकाणी आमदार जयंत पाटील,आमदार कदम आणि खासदार विशाल पाटलांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दोन्ही पक्षातल्या इच्छुक उमेदवारांच्या एकत्रित मुलाखती घेण्यात येत आहेत.महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून एकत्रित करून लढण्याचा निर्धार करण्यात आला आहे.त्या दृष्टीने आता इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती देखील एकत्रित पार पडत असून ज्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षातल्या इच्छुक उमेदवारांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
बांगलादेशमध्ये हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात अमरावतीमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचे आंदोलन सुरु आहे.राजकमल चौकात हिंदुत्ववादी संघटनांचे आंदोलन सुरु आहे.बांगलादेश सरकार विरोधात हिंदुत्ववादी संघटनांची मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करण्यात आली आहे.