AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मजुरांना घेऊन जाणारी बोलेरो उलटली, 33 जण जखमी

भिवंडी येथून स्थलांतरित मजुरांना घेऊन अलाहाबादला निघालेल्या बोलेरो गाडीचा (Bolero accident in Wardha) वर्ध्यात भीषण अपघात झाला.

मजुरांना घेऊन जाणारी बोलेरो उलटली, 33 जण जखमी
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: May 12, 2020 | 3:24 PM
Share

वर्धा : भिवंडी येथून स्थलांतरित मजुरांना घेऊन अलाहाबादला निघालेल्या बोलेरो गाडीचा (Bolero accident in Wardha) वर्ध्यात भीषण अपघात झाला. या अपघातात 33 मजूर जखमी झाले असून यातील 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींमध्ये तीन महिलांसह तीन लहान मुलांचाही समावेश आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याशिवाय 4 जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने वर्धाच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आलं आहे (Bolero accident in Wardha).

केंद्र सरकारने स्थलांतरित मजुरांना आपापल्या गावी जाण्यासाठी परवानगी दिली आहे. यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारसाठी नियमावलीदेखील जारी केली आहे. याशिवाय सरकार हळूहळू रेल्वे किंवा बसमार्फत मजुरांना आपापल्या गावी पोहोचवण्याचं नियोजन करत आहे. मात्र, कोरोनाच्या भीतीमुळे मजूर मिळेल त्या वाहनाने आपल्या गावी जाण्याचा प्रयत्न करत आहेत.

काही मजूर भिवंडी येथून बोलेरोने अलाहाबादच्या दिशेने निघाले होते. ही गाडी भरधाव वेगात होती. नागपूर-अमरावती मार्गावरील ठाणेगाव शिवारात गाडी आली असता चालकाचा गाडीवरील ताबा सूटला. त्यामुळे बोलेरो गाडी जागेवरच पल्टी झाली. या दुर्घटनेत तब्बल 33 मजूर जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केलं.

लॉकडाऊनदरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता सर्व उद्योगधंदे बंद पडले. त्यामुळे स्थलांतरित मजुरांच्या हातातील कामं गेली. कोरोनाचे दररोज नवे रुग्ण आढळत असल्यामुळे मजुरांच्या मनात कोरोनाबाबत भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांना आपल्या गावाची ओढ लागली आहे. आपल्या गावी गेल्यावर आपण सुरक्षित राहू, असं त्यांना वाटतं. त्यामुळे ते मिळेल्या त्या गाडीने किंवा पायी आपल्या राज्याच्या दिशेला निघाले आहेत.

संबंधित बातमी :

नाशिकच्या देवळाली कॅम्प भागात गोळीबार प्रकरण, 5 पोलिस निलंबित, नांगरे-पाटलांची कारवाई

Railway IRCTC | मुंबई-पुण्यातून रेल्वे कुठे आणि कधी सुटणार?

Follow Us
पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची पुन्हा भारताला धमकी
‘सिंधूचं पाणी आमची रेड लाईन’; पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'-दिपके
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'- अभिजीत दिपके
जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन
Chandrashekhar Bawankule | जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन; चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली घोषणा, म्हणाले...
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीक नको’
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; प्रसाद लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीका नको’
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल : "शिंदेंच्या जीवावर खासदार
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल :
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: सामंतांवर हल्लाबोल
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: रोहित पवारांचा उद्योगमंत्री सामंतांवर हल्लाबोल
संजय राऊत यांचा अमित शाह, निवडणूक आयोगावर घणाघात; म्हणाले...
Sanjay Raut | संजय राऊत यांचा अमित शाह, निवडणूक आयोगावर घणाघात; म्हणाले, बाळासाहेबांचा पक्ष-चिन्ह....
मनीषा कायंदे यांचा संजय राऊतांवर घणाघात; शिंदेंची बाजू घेत सुनावलं...
Manisha Kayande On Sanjay Raut | संजय राऊतांसारखा बोगस माणूस भारतात दिसला नाही! मनीषा कायंदेंचा घणाघात; शिंदेंची बाजू घेत राऊतांना सुनावलं
अमरावती आश्रमशाळा वसतीगृहात 48 ऐवजी 110 मुली एका खोलीत
अमरावती आश्रमशाळा वसतीगृह: क्षमतेपेक्षा दुप्पट विद्यार्थिनी, जीवाशी खेळ सुरु
सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला,आरोपी जसपाल सिंगच्या पुण्यातील घरावर
नांदेडमध्ये सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला: एटीएसकडून तपास सुरु, आरोपी जसपाल सिंगच्या पुण्यातील घरावर छापा