AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजय देवगणच्या ‘तानाजी’मध्ये काजोलची एंट्री

मुंबई : बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण सध्या त्याच्या आगामी ‘तानाजी : द अनसंग वॉरीअर’ या सिनेमासाठी चर्चेत आहे. या सिनेमात तो एका मराठा योद्ध्याची भूमिका निभावतो आहे. तो मराठी योद्धा दुसरा कुणी नसून शिवरायांचा सिंह सुबेदार तानाजी मालुसरे आहे. अजय देवगण तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. पण या सिनेमात आणखी एक सप्राईज […]

अजय देवगणच्या ‘तानाजी’मध्ये काजोलची एंट्री
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM
Share

मुंबई : बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण सध्या त्याच्या आगामी ‘तानाजी : द अनसंग वॉरीअर’ या सिनेमासाठी चर्चेत आहे. या सिनेमात तो एका मराठा योद्ध्याची भूमिका निभावतो आहे. तो मराठी योद्धा दुसरा कुणी नसून शिवरायांचा सिंह सुबेदार तानाजी मालुसरे आहे. अजय देवगण तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. पण या सिनेमात आणखी एक सप्राईज प्रेक्षकांना मिळणार आहे. या सिनेमात काजोलही अजय देवगण सोबत दिसणार आहे, तेही तानाजी यांच्या पत्नीच्या भूमिकेत.

या सिनेमात अजय देवगण हा शिवाजी महाराजांचे बालपणीचे मित्र आणि सुबेदार तानाजी मालुसरे यांची भूमिका निभावतो आहे. माहितीनुसार, या सिनेमात काजोल अजय देवगणच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. यासाठी काजोलने एक गाणं शूट केल्याचीही माहिती आहे.

काजोल आणि अजय देवगण यांची जोडी नेहमी हिट ठरली आहे. ते मग सिनेमांमध्ये असो किंवा खऱ्या आयुष्यात. या दोघांनी आजवर ‘राजू चाचा’, ‘प्यार तो होना ही था’, ‘यू मी और हम’ यांसारख्या अनेक सिनेमांत काम केले आहे. तसेच या सिनेमाच्या निमित्ताने 12 वर्षांनंतर अजय देवगण आणि सैफ अली खान पुन्हा एकदा एका सिनेमात दिसणार आहेत. याआधी त्यांनी ओमकारा या सिनेमात सोबत काम केले होते. अजय देवगणने ‘तानाजी : द अनसंग वॉरीअर’ या सिनेमाचं पोस्टर नवीन वर्षाच्या पहिल्याचं दिवशी शेअर केलं होतं. हा सिनेमा 22 नोव्हेंबर 2019 ला रिलीज होण्याची शक्याता आहे.

तानाजी मालुसरे कोण होते ?

तानाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणी मित्र होते, तसेच ते मराठा साम्राज्याचे वीर सुबेदार होते. स्वराज्य स्थापनेपासून प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत त्यांचा सहभाग होता. ते 4 फेब्रुवारी 1970 रोजी झालेल्या कोंढाण्याच्या लढाईसाठी ओळखले जातात.

कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेंना दिली होती. तेव्हा आपल्या मुलाचं लग्न अर्धवट सोडून त्यांनी “आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे” म्हणत कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा उचलला. किल्ल्यावर ताबा मिळवण्यासाठी त्यांना आपल्या प्राणांची आहूती द्यावी लागली. शिवाजी महाराजांनी “गड आला पण सिंह गेला”, या शब्दांत तानाजीच्या मृत्यूचे दु:ख व्यक्त केले होते.

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.