AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गेल्या 6 वर्षात पाकिस्तानमधून आलेल्या 2 हजार 838 लोकांना भारतीय नागरिकत्व : निर्मला सीतारमण

गेल्या सहा वर्षात पाकिस्तानमधून आलेल्या दोन हजार 838 लोकांना भारतीय नागरिकत्व देण्यात आलेलं आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री सीतारण (central minister Nirmala Sitaraman) यांनी दिली.

गेल्या 6 वर्षात पाकिस्तानमधून आलेल्या 2 हजार 838 लोकांना भारतीय नागरिकत्व : निर्मला सीतारमण
| Edited By: | Updated on: Jan 19, 2020 | 10:08 PM
Share

चेन्नई (तामिळनाडू) : “गेल्या सहा वर्षात पाकिस्तानमधून आलेल्या दोन हजार 838 लोकांना भारतीय नागरिकत्व देण्यात आलेलं आहे”, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री सीतारमण (central minister Nirmala Sitaraman) यांनी दिली. चेन्नई येथे सुरु असेलल्या नागरिकत्व सुधारणा कायद्यात सीतारमण यांनी ही माहिती दिली. देशात नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन सर्वत्र वाद सुरु आहे. अनेकांकडून या कायद्याला विरोध (central minister Nirmala Sitaraman) केला जात आहे. तसेच सीतारमण यांनी केलेलं वक्तव्य हे सध्या महत्त्वाचं ठरत आहे.

“गेल्या सहा वर्षात पाकिस्तानमधून आलेल्या दोन हजार 838, अफगाणीस्तामधून आलेल्या 914 आणि 172 बांगलादेशींना भारतीय नागरिकत्व देण्यात आलेलं आहे. ज्यामध्ये मुस्लिमांचाही समावेश आहे. 1964 पासून ते 2008 पर्यंत 4 लाखांपेक्षा अधिक तामिळ (श्रीलंकेचे) लोकांना भारतीय नागरिकत्न दिलं आहे”, असं सीतारमण यांनी सांगितले.

2014 पर्यंत पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणीस्तानमधून आलेल्या 566 पेक्षा अधिक मुस्लिमांना भारतीय नागरिकत्व दिलेलं आहे. 2016 ते 2018 दरम्यान मोदी सरकारच्या काळात जवळपास 1595 पाकिस्तानी प्रवाशांना आणि 391 अफगाणीस्तानच्या मुस्लिमांना भारताने नागरिकत्व दिलेलं आहे. 2016 मध्ये गायक अदनान सामीलाही भारतीय नागरिकत्व मिळालेले आहे”, असंही निर्मला सीतारमण यांनी सांगितले.

“यापूर्वी पाकिस्तानमधून आलेल्या लोकांना देशात वेगवेगळ्या कॅम्पमध्ये बसवण्यात आले. ते आताही तिथेच राहतात. त्यांना तिथे राहून 50 ते 60 वर्ष झाली आहेत. जर तुम्ही या कॅम्पमध्ये जाल तर तुम्ही रडाल. श्रीलंकन लोकांच्या कॅम्पमध्येही ही अवस्था आहे. ते आज अनेक सुविधांपासून वंचित आहेत”, असं सीतारमण यांनी सांगितले.

“सरकार कुणाचे नागरिकत्व काढून घेत नाही. हा कायदा प्रत्येकासाठी चांगला आहे. आम्ही फक्त काही लोकांना नागरिकत्व देणार आहे”, असं सीतारमण यांनी सांगितले.

“नॅशनल पॉपुलेशन रजिस्टर (NPR) दर दहावर्षांनी अपडेट केले जाईल. याचा नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिजंस (NRC) सोबत काही संबंध नसेल. काही लोक अफवा पसरवत आहेत”, असंही सीतारमण म्हणाल्या.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.