AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठा आंदोलकांमुळे पंढरपुरात न गेलेले मुख्यमंत्री आज म्हणतात…..

पंढरपूर: आषाढी एकादशीची महापूजा करता न आलेल्या मुख्यमंत्र्यानी आज पंढरपुरात येऊन श्री विठ्ठल रूक्मिणीचे दर्शन घेतले. राज्यात मोठा दुष्काळ असल्याने बळीराजाला आशिर्वाद देण्याचे साकडे मुख्यमंत्र्यानी विठूरायास घातले. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीने 85 कोटी रूपये खर्च करून बांधलेल्या अद्ययावत भक्तनिवासाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. […]

मराठा आंदोलकांमुळे पंढरपुरात न गेलेले मुख्यमंत्री आज म्हणतात.....
| Updated on: Jul 05, 2019 | 4:49 PM
Share

पंढरपूर: आषाढी एकादशीची महापूजा करता न आलेल्या मुख्यमंत्र्यानी आज पंढरपुरात येऊन श्री विठ्ठल रूक्मिणीचे दर्शन घेतले. राज्यात मोठा दुष्काळ असल्याने बळीराजाला आशिर्वाद देण्याचे साकडे मुख्यमंत्र्यानी विठूरायास घातले. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीने 85 कोटी रूपये खर्च करून बांधलेल्या अद्ययावत भक्तनिवासाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले उपस्थित होते.

आषाढी एकादशीला मराठा आरक्षण आंदोलनामुळे  विठूरायाची महापूजा करता आली नव्हती. विठूरायाचे दर्शन घेण्याची इच्छा होती ती संधी आज आपणास मिळाली आहे. आज आपण विठूरायाचे दर्शन घेतलं आहे, असं मुख्यंत्री म्हणाले.

विठ्ठलाचा आशिर्वाद माझ्यामागे आहे. राज्यात मोठा दुष्काळ आहे. दुष्काळात बळीराजा आणि त्याचे पशूधन या दोघांनाही दिलासा देण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. ही जबाबदारी पूर्ण ताकदीने आम्ही पार पाडू असा आशिर्वाद विठ्ठलाने द्यावा असं साकडं मुख्यमंत्र्यानी घातले.

मुख्यमंत्र्यांना शासकीय पूजेपासून रोखलं होतं

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा आंदोलकांनी पंढरपुरात न येण्याचा इशारा दिला होता. आषाढी एकादशीची पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होते. मात्र मराठा आरक्षणासाठी पंढरपुरात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी यंदा जुलै महिन्यात मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात येऊ दिलं नव्हतं. मुख्यमंत्र्यांनीही समाजभावना लक्षात घेऊन आषाढीच्या पूजेला न जाण्याचा निर्णय घेतला होता.

संबंधित बातमी –  पंढरपुरात ठरलं, पृथ्वीबाबांना कराडमध्ये पाडायचं, अतुल भोसलेंना निवडायचं!

संबंधित बातम्या 

पहिलं मराठा जात प्रमाणपत्र वितरित 

मराठा आरक्षणविरोधी याचिकाकर्ते वकील गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला  

मराठा आरक्षण कोर्टात टिकण्यासाठी आठवलेंच्या टिप्स 

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.