Chiplun rain | घरातील पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू, चिपळूणमध्ये पावसाचा कहर
रत्नागिरीत मुसळधार पावसाचा पहिला बळी गेला आहे. दुर्दैव म्हणजे घरातील पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू झाला आहे. कुमार चव्हाण असं या दुर्दैवी तरुणाचं नाव आहे.
रत्नागिरी : राज्यभर पावसाने हाहा:कार माजवला असताना, कोकणात तर पाऊस जीवघेणा ठरत आहे. मुसळधार पडणाऱ्या पावसाने राज्यभरात पाणी पाणी केलं असताना, कोकणातील परिस्थिती भीषण झाली आहे. रत्नागिरीत मुसळधार पावसाचा पहिला बळी गेला आहे.
दुर्दैव म्हणजे घरातील पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू झाला आहे. कुमार चव्हाण असं या दुर्दैवी तरुणाचं नाव आहे. चिपळूणमधील बहादूरशेख नाका (bahadur shaikh naka chiplun) परिसरात ही धक्कादायक घटना घडली.
पावसामुळे बहादूरशेख नाका परिसराला तलावाचं रुप आलं आहे. घरात पाणी शिरल्यामुळे, घरातील प्रापंचिक साहित्य वाचवण्यासाठी आणि ते सुरक्षित बाहेर काढण्यासाठी कुमार चव्हाण घरात गेला. मात्र घरात आधीच पाणी भरलं होतं. त्या पाण्याचा अंदाज न आल्याने कुमार चव्हाण घरातील पाण्यातच बुडाला.
बहादूरशेख नाका हा चिपळूणमधील वाशिष्ठी नदीच्या बाजूलाच आहे. या नदीला पूर आल्याने या नाक्यावर पाणी भरलं. गेल्या आठवड्यात रविवारीच इथे पाणी भरलं होतं. आजही इथे पाच फुटापेक्षा जास्त पाणी भरलं आहे. त्यामुळे सर्वांच्याच घरात पाणी गेलं आहे.घरं पाण्यात गेल्यानंतर, साहित्य तरी वाचवावं म्हणून कुमार घरात गेला होता. मात्र त्याच्यावर काळाने घाला घातला.