Raj Thackeray : रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र; नेमकी काय मागणी केली?
राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात लहान मुलांच्या बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढल्याबद्दल मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, 2021 ते 2024 दरम्यान यात 30% वाढ झाली असून, कठोर कारवाईची मागणी केली आहे.
महाराष्ट्रामध्ये लहान मुलांच्या बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढल्याचा दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात महाराष्ट्रात लहान मुले पळवणे आणि बेपत्ता होण्याचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचल्याचे म्हटले आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, 2021 ते 2024 या काळात हे प्रमाण 30 टक्क्यांनी वाढले आहे. लहान मुलांना पळवून नंतर त्यांना कामाला जुंपणाऱ्या किंवा भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्य टोळ्या सर्रासपणे कार्यरत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले आहे. यावर सरकारकडून ठोस आणि प्रभावी कारवाईची मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. केवळ बेपत्ता झालेल्या मुलांपैकी किती मुलांना परत शोधले जाते, अशा प्रकारच्या सरकारी उत्तरावर महाराष्ट्राला समाधान नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मुले जरी परत मिळाली तरी त्यांच्या मनावर होणारा आघात आणि मूळतः अशा टोळ्या कार्यरतच कशा होतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सरकारने यावर कठोर पावले उचलण्याची गरज आहे, अशी त्यांची अपेक्षा आहे.
अपघातात अजित पवार यांचा मृत्यू, रूपाली ठोंबरेंना अश्रु अनावर
अजित पवारांच्या मृत्यूनंतर राज ठाकरेंची भावनिक पोस्ट!
अजित पवारांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी शारदा प्रांगणात ठेवण्यात येणार
अजित पवार अकाली निधन; शरद पवार, प्रतिभा पवार बारामतीत

