AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हा संकटाचा काळ आहे कुणीही राजकारण करु नये, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं

हा संकाटाचा काळ आहे कुणीही राजकारण करु नये, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना आवाहन (CM Uddhav Thackeray Criticism on BJP) केले.

हा संकटाचा काळ आहे कुणीही राजकारण करु नये, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: May 24, 2020 | 3:19 PM
Share

मुंबई : हा संकाटाचा काळ आहे कुणीही राजकारण करु नये, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना आवाहन (CM Uddhav Thackeray Criticism on BJP) केले. मुख्यमंत्र्यांनी आज (24 मे) सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं (CM Uddhav Thackeray Criticism on BJP).

उद्धव ठाकरे म्हणाले, “हा संकटाचा काळ आहे कुणीही राजकारण करु नये. तुम्ही राजकारण केलं तरी आम्ही राजकारण करणार नाही. कारण आमच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी आहे. याशिवाय आमच्यावर महाराष्ट्राचा विश्वास आहे. या विश्वासाला मी कधी तडा जाऊ देणार नाही. तुम्ही काहीही बोला. मी प्रामाणिकपणे काम करतोय. माझे सहकारी, माझे मंत्रीमंडळ प्रामाणिकपणे काम करत आहे. महाराष्ट्र सरकार प्रामाणिकपणे काम करत आहे. कृपा करुन कुणीही यामध्ये राजकारण करु नये”, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केलं.

“केंद्र सरकार आम्हाला मदत करत आहे. काही ठिकाणी आम्हाला उणिवा भासत आहेत, जसे की, जीएसटीचा पैसे अजूनही यायचे आहेत. इतर काही पैसे अडकले आहेत. सुरुवातीला पीपीई किट्स येत नव्हते. औषधांचा तुटवडा जाणवयचा. रेल्वेचे पैसे अजून आले नाहीत. अशा गोष्टी मी जर का बोलायला लागलो तर ही माणुसकी नाही. आता माणुसकी हाच मोठा धर्म आहे”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

पॅकेजवरुन मुख्यमंत्र्यांची केंद्र सरकारवर टीका

“काहीजण असं विचारतात की, तुम्ही पॅकेज का नाही दिलं? अहो सगळं काही देतो. सर्वात अगोदर जे संकट आपल्या डोक्यावर घोंगावत आहे, ते आरोग्याचं संकंट आहे. आरोग्यविषयक जोपर्यंत आपण उपाययोजना करत नाही तोपर्यंत उपयोग नाही. आजपर्यंत खूप पॅकेज वाटलं गेलं. किती पॅकेजेस आली? लाखो कोटींची पॅकेज आली. वरती सगळं फार छान पॅकेज असतं. उघडल्यावर कळतं रिकामा खोका आहे. हे असं पोकळ घोषणा करणारं आपलं महाविकास आघाडीचं सरकार नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

संबंधित बातम्या :

पॅकेज घोषित कशाला करत बसायचं? थेट मदत करायची : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

…तर मुख्यमंत्र्यांवर ‘मंत्रीकपात’ करण्याची वेळ येईल : संजय राऊत

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.