AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सियाचिनची थंडी, सैनिकांवर अंडी हातोड्याने फोडण्याची वेळ

टोमॅटोपासून ते अंडी फोडण्यासाठीही सैनिकांना हातोड्याचा वापर करावा लागत असल्याचं या व्हिडीओत दिसतंय.

सियाचिनची थंडी, सैनिकांवर अंडी हातोड्याने फोडण्याची वेळ
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jun 08, 2019 | 7:51 PM
Share

नवी दिल्ली : जगातील सर्वात थंड युद्धक्षेत्र सियाचिन ग्लेशियरवर सध्या रक्त गोठवणारी थंडी आहे. यात भारतीय सैनिकांनी अन्न खाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. समुद्रसपाटीपासून 20 हजार फूट उंचीवर असलेल्या सियाचिनमधील जवानांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. टोमॅटोपासून ते अंडी फोडण्यासाठीही सैनिकांना हातोड्याचा वापर करावा लागत असल्याचं या व्हिडीओत दिसतंय.

ज्युसची बॉटल दगडासारखी होत आहे. ज्युस पिण्यासाठी अगोदर तर गरम करावं लागतं आणि नंतरच पिता येतं. खाण्यासाठी अंडी पाठवली जातात, पण ही अंडी दगडासारखी कडक होतात. आलू किंवा टोमॅटो फोडण्यासाठीही हातोड्याचा वापर करावा लागतोय. सर्वच पदार्थ गोठल्यामुळे अन्न बनवायचं कसं असा प्रश्न जवानांसमोर आहे. यातून मार्ग काढत हे सैनिक कर्तव्य बजावत आहेत.

या जवानांच्या माहितीनुसार, सियाचिनमध्ये कर्तव्य निभावणं हा कठीण काम आहे. इथे तापमान उणे 40 ते 70 डिग्रीपर्यंत जातं. सर्वसामान्य व्यक्ती सियाचिनमध्ये राहूच शकत नाही. कारण, सियाचिनमध्ये बाराही महिने बर्फाची चादर असते. हे जगातील सर्वात उंच आणि थंड युद्धक्षेत्र आहे. काही दिवसांपूर्वी नवे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सियाचिनमधील बेसकॅम्पचा दौरा केला होता आणि जवानांशी संवाद साधला होता.

सियाचिनमध्ये आंघोळ करण्यासाठी जवानांना 90 दिवसांची वाट पाहावी लागते. ही समस्या सोडवण्यासाठी एक बॉडी वॉश बनवण्यात आलाय. पाणीरहित बॉडी वॉशचा वापर करुन आंघोळीचा अनुभव घेता येतो. आता आठवड्यातून दोन वेळा आंघोळ केली जात आहे. या ग्लेशियरच्या एका बाजूला चीन आहे, तर दुसरीकडे पाकव्याप्त काश्मीर आहे. यामुळे धोरणात्मकदृष्ट्या हे ठिकाण अत्यंत महत्त्वाचं आहे.

काही वृत्तांनुसार, सियाचिन ग्लेशियरची सुरक्षा करण्यासाठी प्रति दिन सात कोटी रुपये खर्च होतात. सियाचिनच्या 80 टक्क्यांपेक्षा जास्त सैनिक चौक्या 16 हजार फुटांपेक्षा जास्त अंतरावर आहेत. जवानांसाठी स्वयंपाक बनवणे आणि गरमीसाठी केरोसिनचा वापर केला जातो. बर्फापासून तयार केलेलं पाणी पिण्यासाठी वापरलं जातं. शिवाय स्वयंपाकासाठीही हेच पाणी वापरलं जातं. Video :

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली