AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशभरात 1992 रुग्णांची कोरोनावर मात, बाधितांची संख्या 14,378 वर, 29.8 टक्के रुग्ण तब्लिगींशी संबंधित

देशात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 14,378 वर पोहोचली आहे. यापैकी 29.8 टक्के रुग्ण तब्लिगींशी संबंधित आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली (Corona patient in India).

देशभरात 1992 रुग्णांची कोरोनावर मात, बाधितांची संख्या 14,378 वर, 29.8 टक्के रुग्ण तब्लिगींशी संबंधित
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Apr 18, 2020 | 6:42 PM
Share

नवी दिल्ली : देशभरात आतापर्यंत 1,992 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे (Corona patient in India). कोरोना विरोधात लढण्यासाठी सरकार आणि प्रशासन सर्वोतोपरी मेहनत घेत आहे. देशात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 14,378 वर पोहोचली आहे. यापैकी 29.8 टक्के रुग्ण तब्लिगींशी संबंधित आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली. केंद्रीय आरोग्य आणि गृह मंत्रालयाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते (Corona patient in India).

देशभरातील 14,378 रुग्णांपैकी 4,291 रुग्णांचा संबंध तब्लिगी जमातशी आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी 29.8 टक्के रुग्ण हे तब्लिगी जमातशी संबंधित आहेत, असं लव अग्रवाल यांनी सांगितलं. त्याचबरोबर गेल्या 14 दिवसात देशातील 45 जिल्ह्यांमध्ये एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही, असंदेखील लव अग्रवाल यांनी सांगितलं.

देशभरात 17 एप्रिल रोजी 991 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 14,378 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे गेल्या 24 तासात 43 रुग्णांचा मृत्यू झाला. तर देशभरात आतापर्यंत 480 लोकांचा बळी गेला आहे. देशातील कोरोनाचा मृत्यूदर सध्या 3.3 टक्के आहे, अशी माहिती लव अग्रवाल यांनी दिली.

कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांमधील 14.4 टक्के रुग्ण हे 0 ते 45 वयोगटातील आहेत. तर 10.3 टक्के रुग्ण हे 45 ते 60 वयोगटातील आहेत. याशिवाय 33.1 टक्के रुग्ण हे 60 ते 75 तर 42.2 टक्के रुग्ण हे 75 वर्षांपेक्षा जास्त वयाची आहेत, असं अग्रवाल म्हणाले.

दरम्यान, गृह मंत्रालयाच्या सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी लॉकडाऊनमुळे भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांबाबत एक महत्त्वपूर्ण माहिती दिली. लॉकडाऊनमुळे जे विदेशी नागरिक भारतात अडकले आहेत आणि त्यांचा व्हिजा संपला असेल तर 3 पेर्यंत त्यांच्या व्हिजाचा कालावधी निशुल्कपणे वाढवण्यात आला आहे, असं पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

धाकधूक वाढली, मुंबईतील सात अतिगंभीर वार्डमध्ये 110 पेक्षाही जास्त रुग्ण

Follow Us
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी...
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी....
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न...
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न....
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा...
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा....
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक...
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक....
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून.
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात...
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात....
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात.
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ...
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ....
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला...
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध.....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध......