दत्तात्रय भरणे पालकमंत्रिपदाला वैतागले ? जबाबदारीतून मुक्त करण्यासाठी घेतली शरद पवारांची भेट

| Updated on: Jun 27, 2021 | 11:43 PM

सोबतच उजनीच्या पाण्यावरून सोलापूरकरांचा गैरसमज झाला होता. मात्र पदापेक्षा माझ्या इंदापूर तालुक्याच्या पाण्याचा विषय महत्वाचा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दत्तात्रय भरणे पालकमंत्रिपदाला वैतागले ? जबाबदारीतून मुक्त करण्यासाठी घेतली शरद पवारांची भेट
दत्ता भरणे
Follow us on

पुणे : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूरच्या पालकमंत्रिपदाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी एका महिन्यापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन सोलापूरच्या पालकमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावं अशी विनंती केली होती. तशी माहिती त्यांनी स्वत: दिली आहे. सोबतच उजनीच्या पाण्यावरून सोलापूरकरांचा गैरसमज झाला होता. मात्र पदापेक्षा माझ्या इंदापूर तालुक्याच्या पाण्याचा विषय महत्वाचा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. इंदापूर शहराचे नगरसेवक अमर गाडे यांच्या खडी क्रेशरच्या प्लॅटच्या उद्घाटनाच्या वेळी दत्तात्रेय भरणे बोलत होते. (Dattatray Bharane was ready to resign from Solapur guardian minister visited sharad pawar)

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे पालकमंत्रिपदाला वैतागले होते?

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी इंदापूरचे आमदार व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना देण्यात आली. या नंतरच्या काळात उजनी धरणातून इंदापूर तालुक्यातील बावीस दुष्काळी गावांना पाच टीएमसी पाणी देण्याच्या निर्णय झाला. याचा राज्य सरकारने सर्वेक्षणाचा आदेश काढ़ल्यानंतर सोलापूरमधील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात उघड नाराजी व्यक्त केली होती.

शरद पवार आणि दत्तात्रय भरणो यांची भेट

त्यामुळे सहाजिकच दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी नाराज असल्याचे जाणवत होते. याच कारणामुळे दत्तात्रय भरणे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची एका महिन्यापूर्वी भेट घेतली होती. तसेच या भेटीत मला सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदातून मुक्त करा अशी विनंती त्यांनी केली होती.

माझ्या पदापेक्षा माझ्या इंदापूर तालुक्याच्या पाण्याचा विषय महत्वाचा..

उजनीच्या पाण्यावरून सोलापूरकरांचे पाणी नसतानाही सोलापूरकरांचा गैरसमज झाला होता. मात्र पदापेक्षा माझ्या इंदापूर तालुक्याच्या पाण्याचा विषयही महत्वाचा असल्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सरळमार्गी स्वभावामुळे व हसतमुख चेहऱ्याने कार्यकर्त्यांचे स्वागत करण्याच्या त्यांच्या सवयीमुळे मंत्रिमंडळात व राज्यभरात त्यांची एक वेगळी छाप आहे परंतु सोलापूरकरांना भरणे अजून रुचलेच नाहीत का ? असा प्रश्नही निर्माण होत आहे.

इतर बातम्या :

VIDEO: “मी भुजबळ यांच्या विरोधात नाही, कुणाला वाईट वाटले असेल तर माफी मागतो”

DATTA BHARNE