AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान, उभ्या पिकाला कोंब

राज्यात परतीच्या पावसाने अनेक जिल्ह्यात थैमान (Farmers lost crop due to rain) घताले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान, उभ्या पिकाला कोंब
| Edited By: | Updated on: Oct 29, 2019 | 4:32 PM
Share

अकोला : राज्यात परतीच्या पावसाने अनेक जिल्ह्यात थैमान (Farmers lost crop due to rain) घातले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अकोला जिल्ह्यात परतीच्याने पावसामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान (Farmers lost crop due to rain) झाले. तर कोकणात भात शेतींसह नाचणी आणि वरी कुजून गेली. शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिसकावून घेतला आहे.

शेतकऱ्यांनी शेतात सोयाबीन आणि कापूस पिकवला होता. पण पावसामुळे या पिकांचं नुकसान झालं आहे. सोयाबीनच्या पिकाला जागेवर परतीच्या पावसामुळे कोंब फुटले आहे. तर कोकणातील नाचणीच्या पिकांना पुन्हा अंकुर फुटले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

यवतमाळमध्येही कपाशी, सोयाबीन आणि तुरीच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. परतीचा पाऊस गेले 10 ते 15 दिवस सलग कोसळत असल्याने पाणी साचून पिकांचे नुकसान झाले आहे. सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी आता केली जात आहे.

राज्यातील शेतकरी हा नेहमीच संकटात सापडतो. कधी कोरडा दुष्काळ तर कधीओला दुष्काळ, पण यावेळी शेतकऱ्यांना वेगळ्याच संकटाचा सामना करावा लागत आहे. ऐन दिवाळीच्या दिवसात शेतकरी कपाशी काढण्याच्या व सोयाबीन सोंगण्याच्या तयारीत असताना अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्याची धांदल उडाली. परतीचा पाऊस एक दिवस नव्हे तर चक्क 15 दिवसांची हजेरी लावल्याने उभ्या सोयाबीनला कोंब फुटले.

दरम्यान, शेतकऱ्याचे नुकसान झाल्यामुळे सरकार काही मदत करेल का या प्रतीक्षेत शेतकरी बसला आहे. परतीच्या पावसांमुळे राज्यातील अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालं आहे.

Follow Us
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू....
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल.
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान.
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;.
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा....
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला.
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका...
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका....
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?.
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं...
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं....
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर..
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर...