AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नव्या नोकऱ्या जाऊ द्या , मंजूर 25 लाख रिक्त पदेही भरली नाहीत : RTI

मुंबई : वर्षाला दोन कोटी नोकऱ्या देण्याचा दावा करणाऱ्या भाजपने आपलं आश्वासन पाळलं  नसल्याचा आरोप विरोधक करतात. मात्र आता भाजपला आणखी एक धक्का देणारं वृत्त आहे. भाजपच्या काळात नोकरीचा टक्का घसरल्याची माहिती आरटीआयमध्ये समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी तसा दावा केला आहे. तब्बल 33 लाख 4 हजार 305 अधिसूचित झालेल्या रिक्तपदांपैकी […]

नव्या नोकऱ्या जाऊ द्या , मंजूर 25 लाख रिक्त पदेही भरली नाहीत : RTI
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM
Share

मुंबई : वर्षाला दोन कोटी नोकऱ्या देण्याचा दावा करणाऱ्या भाजपने आपलं आश्वासन पाळलं  नसल्याचा आरोप विरोधक करतात. मात्र आता भाजपला आणखी एक धक्का देणारं वृत्त आहे. भाजपच्या काळात नोकरीचा टक्का घसरल्याची माहिती आरटीआयमध्ये समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी तसा दावा केला आहे.

तब्बल 33 लाख 4 हजार 305 अधिसूचित झालेल्या रिक्तपदांपैकी केवळ 8 लाख 23 हजार 107 पदं भरली आहेत, अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील शेख यांना देण्यात आली आहे. म्हणजेच जवळपास 25 लाख पदे भरली नाहीत.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी महाराष्ट्र राज्य शासनाकडे  2013 पासून उत्तर देण्यापर्यंत (मार्च 2019), राज्यात किती नोकऱ्या कोणत्या विभागात दिल्या, तसेच राज्यात किती बेरोजगारी वाढली आहे आणि राज्यात रोजगार वाढविण्यासाठी शासने केलेल्या उपाययोजनेबाबत माहिती विचारली होती.

या माहितीप्रमाणे राज्यात  जानेवरी 2013 पासून 2019 मार्चपर्यंत एकूण 34 लाख 23 हजार  243 अधिसूचित झालेल्या रिक्तपदांऐवजी, केवळ 9 लाख 37 हजार 765 उमेदवारांस नोकरी मिळाली.  म्हणजे जवळपास 24 लाख 85 हजार 478 पदे भरलेली नाहीत.

भाजपने 2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान, दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याची घोषणा केली होती, तरी भाजप जिंकल्यानंतर नोकऱ्या दिल्या नाहीत, असा आरोप सध्या विरोधकांकडून मोदी सरकारवर केला जातो. भाजप सरकारने नव्या नोकऱ्या राहूदे  उलट अधिसूचित झालेली रिक्तपदे सुद्धा भरली नाहीत. याबाबतची माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजक्ता संचालनालय विभागांने दिली आहे.

तब्बल 25 लाख पदं मंजूर असूनही न भरल्याची माहिती शकील अहमद यांना आरटीआयमधून मिळाली आहे. खुद्द सरकारी खात्याकडूनच ही माहिती दिल्याने, मोदी सरकारने नव्या नोकऱ्या दिल्या नाहीतच, पण ज्या उपलब्ध आहेत, त्या जागाही भरल्या नाहीत, असं शकील अहमद यांचं म्हणणं आहे.

वर्षनिहाय अधिसूचित झालेली रिक्तपदे आणि नोकरीस लागलेल्या उमेदवारांची आकडेवारी

वर्ष 2013  

  • अधिसूचित झालेली रिक्तपदे – 1 लाख 18 हजार 938
  • भरलेली पदे – 1 लाख 14 हजार 658
  • न भरलेली पदे – 4 हजार 280

वर्ष 2014

  • अधिसूचित झालेली रिक्तपदे – 8 लाख 41 हजार 164
  • भरलेली पदे – 84 हजार 707
  • न भरलेली पदे – 7 लाख 56 हजार 457

वर्ष 2015

  • अधिसूचित झालेली रिक्त पदे 5 लाख 71 हजार 418
  • भरलेली पदे – 1 लाख 25 हजार 457
  • न भरलेली पदे – 4 लाख 45 हजार 961

वर्ष 2016

  • अधिसूचित झालेली रिक्तपदे – 5 लाख 76 हजार 857
  • भरलेली पदे – 1 लाख 44 हजार 034
  • न भरलेली पदे – 4 लाख 32 हजार 823

वर्ष 2017

  • अधिसूचित झालेली रिक्तपदे – 4 लाख 13 हजार 195
  • भरलेली पदे – 2 लाख 22 हजार 639
  • न भरलेली पदे – 1 लाख 90 हजार 556

वर्ष 2018

  • अधिसूचित झालेली रिक्तपदे   7 लाख 85 हजार 390
  • भरलेली पदे – 1 लाख 97 हजार 978
  • न भरलेली पदे – 5 लाख 87 हजार 403

वर्ष 2019

  • अधिसूचित झालेली रिक्तपदे (मार्च अखेर)-  1 लाख 16 हजार 281
  • भरलेली पदे – 48 हजार 292
  • न भरलेली पदे – 67 हजार 989

रोजगार वाढीसाठी काय?

राज्यात्त रोजगार वाढविण्यासाठी शासनामार्फत  पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम, बेरोजगार सेवा सहकारी संस्थांना विविध सवलती देऊन आर्थिकदृष्ट्या बळकट करणे, आदिवासी उमेदवारांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम या सारखे उपाययोजना केले आहेत, अशी माहिती आरटीआय अंतर्गत देण्यात आली.

35 लाख बेरोजगार नोंदणी, 25 लाख रिक्त पदे

2013 पासून 2019 मार्च अखेरपर्यंत तब्बल 35 लाख 23 हजार 272 बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली आहे. दुसरीकडे जवळपास 25 लाख जागा रिकाम्या आहेत. म्हणजे सरकार बेरोजगार तरुणांना नोकरी देत नाही, उलट रिक्त झालेल्या पदावर भरतीही करत नाही, असं चित्र आहे.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांच्या मते, “जर भाजप स्वयंरोजगाराला सरकारने दिलेले रोजगार मानतो, तर पकोडे विकणे, पंचर काढणे, पान टपरी लावणे असे स्वयंरोजगार भाजपच्या कार्यकर्त्यांना द्यावे. देशाच्या सुशिक्षीत बेरोजगार तरुणांनी अशी कामं करण्यासाठी डिग्री घेतलेली नाही”.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?.

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Ayesha Khan Detained : प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा खान पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनस्थळी आल्याने तातडीने कारवाई!.

Ayesha Khan Detained : प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा खान पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनस्थळी आल्याने तातडीने कारवाई!