राजकारण्यांनी अन्य क्षेत्रात हस्तक्षेप करू नये : गडकरी

यवतमाळ : ‘राजकारण म्हणजे सत्ताकारण असं नाही, राजकारण याचा अर्थ समाजकारण आणि विकासकारण असा आहे. मात्र, दुर्देव असं की, आपल्याकडे सत्ताकारण म्हणजेच राजकारण झालंय’, असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. यवतमाळ येथे घेण्यात येत असलेल्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा निरोप समारंभ आज पार पडला. या कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. […]

राजकारण्यांनी अन्य क्षेत्रात हस्तक्षेप करू नये : गडकरी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

यवतमाळ : ‘राजकारण म्हणजे सत्ताकारण असं नाही, राजकारण याचा अर्थ समाजकारण आणि विकासकारण असा आहे. मात्र, दुर्देव असं की, आपल्याकडे सत्ताकारण म्हणजेच राजकारण झालंय’, असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. यवतमाळ येथे घेण्यात येत असलेल्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा निरोप समारंभ आज पार पडला. या कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. पुढे गडकरी म्हणाले की, ‘सगळ्याच पक्षात चांगली लोक आली तर चांगलच आहे, राजकारणाला काही मर्यादा आहेत, त्यामुळे राजकारणींनी इतर क्षेत्रात हस्तक्षेप करू नये.’

संमेलनाच्या उद्घाटनाला आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी वैशाली येडे यांना बोलावण्याचा निर्णय अतिशय उत्तम होता, असल्याचंही गडकरी म्हणाले.

‘भारतीय संस्कृती ही मुल्याधिष्टीत शिक्षणपद्धती आहे. साहित्याचे आपल्या आयुष्यातील स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. सत्ता, संपत्ती, मान, सन्मान हे सगळं खोट आहे. जेवढ जगायचं आहे त्यासाठी विचाराची प्रेरणा लागते, जीवन जगण्याची प्रेरणा नाटकाच्या माध्यमातून, कवितेच्या माध्यमातून समाज माणसापर्यंत पोहचत असते. आपल्याकडे साहित्यिकांनी दिलेला प्रगल्भ दृष्टीकोन आहे. जीवन उत्तम पद्धतीने जगायचे असेल तर साहित्य हे महत्त्वाचे आहे’, असेही गडकरी म्हणाले.

‘समाजासाठी राजकारणांची, साहित्याकांची, पत्रकारांची सर्वांची भूमिका महत्वाची आहे. आपल्या देशात भिन्नतेपेक्षा विचार शुन्यताच जास्त आहे, असं म्हणाव लागेल. प्रत्येक क्षेत्रात काळानुसार बदल करावा लागतो. जे चांगलं असेल ते-ते आम्ही स्विकारु आणि टाकाऊ गोष्टी नाकारु’, असे गडकरींनी स्पष्ट केले.

‘आज जगातील मोठ्या प्रमाणावर लोकं आपल्याकडे आशेनं बघत आहेत, 21 वे शतक भारतीय संस्कृतीचे असेल’, असे गडकरी या प्रसंगी म्हणाले.

‘हे संमेलन सर्वांच्या सहभागातून अतिशय यशस्वी झालं. त्यासाठी सर्वांचे मनापासून अभिनंदन. एखादी गोष्ट यशस्वी व्हायची असेल तर त्यात सर्वांचा सहभाग लागतो’, असे मत गडकरींनी व्यक्त केलं. ‘एवढे मोठे साहित्यिक इथे आहेत. मला तुमच्याकडून शिकता येईल, म्हणून मी या ठिकाणी आलो. मतभिन्नता असली तरी हरकत नाही पण मनभेद नको’, असेही गडकरी म्हणाले.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.