AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चीनच्या मदतीने काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्याची आशा- फारुख अब्दुल्ला

संपूर्ण देशात 4जी आणि 5जी इंटरनेट असताना काश्मीरमध्ये अजूनही 2जी इंटरनेट आहे. मग येथील तरुणांची प्रगती कशी होणार?

चीनच्या मदतीने काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्याची आशा- फारुख अब्दुल्ला
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: Oct 11, 2020 | 6:27 PM
Share

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये चीनच्या मदतीने अनुच्छेद 370 पुन्हा लागू करण्याविषयी आम्ही आशावादी असल्याचे वक्तव्य नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. काश्मीरमधील अनुच्छेद 370 आणि अनुच्छेद 35 ए रद्द करण्यास फारुख अब्दुल्ला यांचा विरोध होता. केंद्र सरकारने अध्यादेश काढून अनुच्छेद 370 रद्द केल्यानंतर फारुख अब्दुल्ला यांना बराच काळ नजरकैदेत ठेवण्यात आले होते. (Farooq Abdullah on article 370 in Kashmir)

काही दिवसांपूर्वीच त्यांची नजरकैदेतून सुटका करण्यात आली होती. यानंतरही फारुख अब्दुल्ला यांनी अनुच्छेद 370 आणि अनुच्छेद 35 ए चे समर्थन करणे सुरुच ठेवले आहे. काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० आणि अनुच्छेद 35 ए पुन्हा लागू करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी म्हटले होते.

या पार्श्वभूमीवर संसदेच्या पावसाळी अधिवेशनात या प्रश्नावर चर्चा करण्याची मागणीही त्यांनी केली होती. मात्र, आम्हाला चर्चेसाठी वेळ देण्यातच आली नाही. देशातील लोकांना वास्तव समजले पाहिजे. काश्मीरमधील नागरिक कशाप्रकारे राहतात आणि येथील स्थिती काय आहे, हे त्यांना कळायला पाहिजे. देशाच्या इतर भागांप्रमाणे काश्मीरचा विकास होतोय की हा प्रदेश मागे पडलाय, याची माहिती लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे.

काश्मीरमधील परिस्थिती अजूनही सुधारलेली नाही. संपूर्ण देशात 4जी आणि 5जी इंटरनेट असताना काश्मीरमध्ये अजूनही 2जी इंटरनेट आहे. मग येथील तरुणांची प्रगती कशी होणार? देशात इतरत्र मिळणाऱ्या सुविधा येथील लोकांना का मिळत नाहीत? अशाने आम्ही लोक पुढे कसे जाणार? काळ बदलला आहे, असे फारुख अब्दुल्ला यांनी संसदेच्या अधिवेशनावेळी म्हटले होते.

तसेच भारत आणि पाकिस्तान यांनी सीमाप्रश्न सोडवण्यासाठी संवाद कायम ठेवावा, असा फारुख अब्दुल्लांचा आग्रह आहे. ज्याप्रकारे आपण चीनशी चर्चा करतो तशीच पाकिस्तानशीही करावी, असे अब्दुल्लांचे म्हणणे आहे. काश्मीरमध्ये मोठ्याप्रमाणावर गरिबी आहे. येथील लोकांकडे रोजगार नाही. कदाचित यामुळे भविष्यात असे वादळ येईल की, ते रोखणे अशक्य असेल, असा इशाराही मध्यंतरी फारुख अब्दुल्ला यांनी दिला होता.

संबंधित बातम्या: हिंमत असेल, तर कलम 370 पुन्हा लागू करण्याचं जाहीरनाम्यात सांगा, मोदींचं विरोधकांना आवाहन

भाजपचा महाराष्ट्रात कलम 370 च्या नावे मतांचा ‘जोगवा’, नेटकऱ्यांचा नेत्यांवर संताप

स्पेशल रिपोर्ट : शालेय अभ्यासक्रमातही कलम 370 चा समावेश होणार

(Farooq Abdullah on article 370 in Kashmir)

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.