AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकरी आणि केंद्र सरकारमधील चर्चा फोल, सातव्या दिवशीही आंदोलन सुरुच, दिल्लीतील आंदोलनाचा नाशिक जिल्ह्याला फटका

दिल्लीच्या सीमेवर गेल्या 7 दिवसांपासून हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. याचा फटका नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना बसतोय. कारण पंजाबवरुन येणारा गहू आणि तांदूळ अडकून पडल्यानं रेशन दुकानावरील व्यवस्था कोलमडून पडली आहे.

शेतकरी आणि केंद्र सरकारमधील चर्चा फोल, सातव्या दिवशीही आंदोलन सुरुच, दिल्लीतील आंदोलनाचा नाशिक जिल्ह्याला फटका
sagar joshi
sagar joshi | Updated on: Dec 02, 2020 | 8:48 AM
Share

नाशिक: दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन आज सातव्या दिवशीही सुरुच आहे. मंगळवारी केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांमधील चर्चेतून तोडगा निघू शकला नाही. त्यांमुळे शेतकरी आंदोलनावर ठाम आहेत. महत्वाची बाब म्हणजे दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा फटका नाशिक जिल्ह्याला बसताना पाहायला मिळतोय.(Impact of farmers’ agitation in Delhi on Nashik district)

दिल्लीच्या सीमेवर गेल्या 7 दिवसांपासून हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. याचा फटका नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना बसतोय. कारण पंजाबवरुन येणारा गहू आणि तांदूळ अडकून पडल्यानं रेशन दुकानावरील व्यवस्था कोलमडून पडली आहे. रेशनचे धान्य अडकल्यानं नाशिक जिल्ह्यातील 6 तालुके प्रभावित झाले आहेत. जिल्ह्यातील सिन्नर, दिंडोरी, इगतपुरी, पेठ यासह अन्य तालुक्यांमध्ये रेशन दुकानांवर धान्य उपलब्ध नाही. तर नाशिक शहरातही रेशन दुकानांवर गहू आणि तांदुळाला तुटवडा जाणवत आहे. आंदोलन लांबल्यास गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे.

मंगळवारच्या बैठकीत काय झालं?

देशभरातील जवळपास 35 शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारची मंगळवारी बैठक पार पडली. या बैठकीत केंद्र सरकारकडून कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर, रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्यासह अन्य नेते सहभागी झाले होते. यावेळी शेतकऱ्यांना MSPवर प्रेझेंटेशन देण्यात आलं. सोबतच बाजाराच्या स्थितीबाबत माहिती देण्यात आली. यावेळी MSPला कायद्याचा भाग बनवलं जाणार का? हा एकच प्रश्न शेतकरी संघटनांनी विचारला. तीन तास चाललेल्या बैठकीत ठोस निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय शेतकरी संघटनांनी घेतला आहे. दुसरीकडे बैठक सकारात्मक झाली, 3 डिसेंबरला पुन्हा चर्चा होईल, असं सरकारकडून सांगण्यात आलं.

पुढे आंदोलनाची दिशा काय?

आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोवर आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय शेतकरी संघटनांनी केला आहे. त्यामुळे सिंधू बॉर्डर, टिकरी बॉर्डर आणि गाजीपूर बॉर्डरसह अन्य जागांवर सुरु असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन सुरुच असेल. इतकच नाही तर पंजाब आणि हरियाणातून अनेक शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केले आहे. त्यामुळे आंदोलनात शेतकऱ्यांची संख्या अजून वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संबंधित बातम्या:

केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमधील बैठक निष्फळ; आंदोलन सुरुच ठेवण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार

‘अहंकाराची खुर्ची सोडा आणि शेतकऱ्यांना त्यांचा हक्क द्या’, कृषी कायद्यांवरुन राहुल गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

Impact of farmers’ agitation in Delhi on Nashik district

Follow Us
हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले, तापी नदीपात्रात मोठा विसर्ग सुरू, काळजी
हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले, तापी नदीपात्रात मोठा विसर्ग सुरू, काळजी घेण्याचे आवाहन!
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर; औरंगाबादमध्ये नवं समीकरण
एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती
एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती समोर
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट खोल मॅनहोलमध्ये...
आता ऑपरेशन तुतारी! कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट
Sanjay Shirsat On Amol Kolhe | ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी! अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट, म्हणाले...
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक सियाच्या घरी पोहोचलं, पुढे काय घडलं?
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन अहिर असं काय म्हणाले?
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा; ऑपरेशन टायगर पुन्हा अॅक्टिव्ह!
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना अटक
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण...
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण... अमोल कोल्हेंचं मोठं विधान; चर्चांना मिळाला पूर्णविराम!