Corona pandemic | राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत पुन्हा वाढ; संसर्ग रोखण्याचं आरोग्य यंत्रणेपुढे आव्हान

राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे. राज्यात दिवसभरात एकूण 5535 नवे कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तर कोरोनामुळे दिवसभरात एकूण 154 बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Corona pandemic | राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत पुन्हा वाढ; संसर्ग रोखण्याचं आरोग्य यंत्रणेपुढे आव्हान
Follow us
| Updated on: Nov 19, 2020 | 9:11 PM

मुंबई : राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे. राज्यात दिवसभरात एकूण 5535 नवे कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तर कोरोनामुळे दिवसभरात एकूण 154 बाधितांचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांमध्ये कोरोना काही प्रमाणात आटोक्यात आल्याचे सांगितले जात होते. मात्र, राज्य सरकारने निर्बंध शिथील केल्यानंतर गर्दी वाढल्याने पुन्हा एकदा सक्रिय कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे. (In Maharashtra corona patient increased, death ratio has also increased)

राज्यात आज दिवसभरात कोरोनाचे एकूण 5535 कोरोनाग्रस्त आढळले. तर दिवसभरात एकूण 154 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. कालच्या तुलनेत राज्यात आज दिवसभरात एकूण 500 रुग्ण जास्त आढळले आहेत. तर मृतांच्या आकड्यांतही लक्षणीय वाढ झाली आहे. आज दिवसभरात राज्यात एकूण 154 बाधितांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात राज्य़ात 5860 जण कोरोनामुक्त झाले आहेत. नवे कोरोनाग्रस्त आढळण्याचे प्रमाण रुग्ण कोरोनामुक्त होण्याच्या तुलणेत कमी असले तरी, कालच्या तुलनेत नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आज मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढतोय असे म्हटले जात आहे.

राज्यात मुंबई, पुणे, अशा प्रमुख शहरांत कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिवसभरात नागपूरमध्ये 443 नव्या बाधितांची नोंद झाली. तर एकूण 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. नाशिकमधील निफाडमध्येही कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. निफाड तालुक्यात दिवसभरात 11 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. निफाडमध्ये एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 4069 वर गेला आहे.

अनलॉक अंतर्गत राज्यात सर्व व्यवहार सुरळीत करण्यात येत आहेत. यामध्ये राज्य सरकारने आतापर्यंत जीम, नाट्यगृहे, सिनेमागृहे, शाळा सुरु केल्या आहेत. पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील सर्व धर्मियांचे प्रार्थनास्थळंदेखील सुरु करण्याचार मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला. या सर्व निर्णयांमुळे एकीकडे जनजीवन पूर्वपदावर येत आहे. तर दुसरीकडे सर्व व्यवहार सुरळीत होत असल्याने सार्वजनिक स्थळांवर गर्दी वाढत आहे. परिणामी राज्यात कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत असल्याचे दिसत आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण लक्षणीयरीत्या वाढू लागले आहेत.

…तर कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरू शकते: मुख्यमंत्री

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला सतर्कतेचा इशारा दिला आहे. जगभरात येत असलेली कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरू शकते, आपल्याकडे ती येऊ द्यायची नसेल तर गाफील राहून चालणार नाही, असा इशारा देतानाच मास्क लावणे, हात धुणे आणि शारीरिक अंतराचे पालन करणे या त्रिसुत्रीचा अवलंब प्रत्येकाला करावाच लागेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. दरम्यान, मुंबईसारख्या मोठ्या शहरात कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेशी सामना करण्यास आरोग्य प्रशासन तयारीला लागले आहे. सोलापूरसारख्या शहरात विनामास्क फिरल्यास दंड 100 रुपयांवरुन 500 रुपये करण्यात आला आहे. (In Maharashtra corona patient increased, death ratio has also increased)

संबंधित बातम्या :

दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता! मुंबई महापालिका प्रशासनाच्या तयारीचा आदित्य ठाकरेंकडून आढावा

दिलासादायक! मुंबईत कोरोना रुग्ण दुप्पटीचा कालावधी वाढला, अडीचशेचा टप्पा पार

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.