AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत जगातील सर्वात विश्वसनीय देशांपैकी एक

दावोस : जगातील सर्वात विश्वसनीय देशांमध्ये भारताने आपलं स्थान प्रस्थापित केलं आहे. व्यवसाय, सरकार, स्वयंसेवी संस्था आणि माध्यमांमध्ये भारत हा जगातील सर्वात विश्वासू देशांपैकी एक ठरला आहे. परंतु, व्यवसायीक ब्रँड्सच्या विश्वसनीयतेच्या बाबतीत आपला देश मागे पडला आहे. एका अहवालात याचा दावा करण्यात आला आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक परिषद सुरु होण्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच सोमवारी एडलमन […]

भारत जगातील सर्वात विश्वसनीय देशांपैकी एक
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:35 PM
Share

दावोस : जगातील सर्वात विश्वसनीय देशांमध्ये भारताने आपलं स्थान प्रस्थापित केलं आहे. व्यवसाय, सरकार, स्वयंसेवी संस्था आणि माध्यमांमध्ये भारत हा जगातील सर्वात विश्वासू देशांपैकी एक ठरला आहे. परंतु, व्यवसायीक ब्रँड्सच्या विश्वसनीयतेच्या बाबतीत आपला देश मागे पडला आहे. एका अहवालात याचा दावा करण्यात आला आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक परिषद सुरु होण्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच सोमवारी एडलमन ट्रस्ट बॅरोमीटर-2019 चा अहवाल सादर करण्यात आला. यामध्ये, भारत जागतिक विश्वसनीयता निर्देशांक यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 3 गुणांच्या सुधारणेने 52 गूण मिळवण्यात यशस्वी ठरला.

जागरूक नागरीक आणि सामान्य जनतेचा विश्वास या निर्देशांकानुसार चीन अनुक्रमे 79 आणि 88 गुणांसह आघाडीवर आहे. या दोन श्रेणींमध्ये भारत दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहे. हे निर्देशांक एनजीओ, व्यवसाय, सरकार आणि माध्यमांमध्ये विश्वसनीयतेच्या  सरासरीवर आधारित आहेत. हे निष्कर्ष 27 बाजारपेठेतील ऑनलाईन सर्वेक्षणांवर आधारित आहेत. यात 33,000 पेक्षा जास्त लोकांनी आपली मतं नोदंवली आहेत.

ब्रँड विश्वासार्हतेनुसार, स्वित्झर्लंड, जर्मनी आणि कॅनडा हे आघाडीवर आहेत. त्यानंतर जपानचा क्रमांक लागतो. तर, विश्वासार्हतेच्या बाबतीत भारत, मेक्सिको, ब्राझील आणि बांग्लादेश या देशांतील कंपन्या खालच्या स्थानावर आहेत. त्यानंतर चीन आणि दक्षिण कोरिया यांचा क्रमांक लागतो.

Follow Us
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.