AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताने पाकिस्तानातील उच्चायुक्तांना बोलावलं!

मुंबई: पुलावामा दहशतवादी हल्ल्याप्रकरणी (Pulwama Attack) पाकिस्तानी उच्चायुक्तांना समन्स बजावल्यानंतर, भारताने पाकिस्तानाविरुद्ध राजनैतिक पावलं उचलण्याचं ठरवलं आहे. त्याचाच भाग म्हणून भारताचे पाकिस्तानातील उच्चायुक्त अजय बिसरिया (Ajay Bisaria) यांना मोदी सरकारने बोलावणं धाडलं आहे. अजय बिसरिया यांच्याशी चर्चा करण्यासाठी त्यांना पाकिस्तानातून भारतात बोलावलं आहे. त्याआधी भारताने पाकिस्तान उच्चायुक्तांना समन्स बजावलं. सूत्रांच्या मते, परराष्ट्र सचिवांनी पाकिस्तानी उच्चायुक्तांना शुक्रवारी […]

भारताने पाकिस्तानातील उच्चायुक्तांना बोलावलं!
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:26 PM
Share

मुंबई: पुलावामा दहशतवादी हल्ल्याप्रकरणी (Pulwama Attack) पाकिस्तानी उच्चायुक्तांना समन्स बजावल्यानंतर, भारताने पाकिस्तानाविरुद्ध राजनैतिक पावलं उचलण्याचं ठरवलं आहे. त्याचाच भाग म्हणून भारताचे पाकिस्तानातील उच्चायुक्त अजय बिसरिया (Ajay Bisaria) यांना मोदी सरकारने बोलावणं धाडलं आहे. अजय बिसरिया यांच्याशी चर्चा करण्यासाठी त्यांना पाकिस्तानातून भारतात बोलावलं आहे.

त्याआधी भारताने पाकिस्तान उच्चायुक्तांना समन्स बजावलं. सूत्रांच्या मते, परराष्ट्र सचिवांनी पाकिस्तानी उच्चायुक्तांना शुक्रवारी दुपारी 2 वा समन्स बजावलं. पुलवामा दहशतवादी हल्ल्याप्रकरणी तीव्र शब्दात सुनावण्यात आलं. पाकिस्तानने जैश ए मोहम्मदविरोधात कडक कारवाई करावी असं भारताच्या परराष्ट्र सचिवांनी पाकिस्तानी उच्चायुक्तांना सुनावलं.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा (Pulwama Attack) जिल्ह्यात गुरुवारी (14 फेब्रुवारी) मोठा दहशतवादी हल्ला झाला.  या हल्ल्यात CRPF चे जवळपास 40 जवान शहीद झाले आहेत. यानंतर भारतात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यानंतर भारताने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पाकिस्तानला या हल्ल्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. तर भारताच्या परराष्ट्र खात्याने पाकिस्तानी उच्चायुक्तांना नोटीस बजावली आहे. त्याचवेळी देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंह हे जम्मू काश्मीरमधील पुलवामात दाखल झाले.

राजनाथ सिंह यांनी जवानांच्या पार्थिवाला स्वत: खांदा दिला. एखाद्या गृहमंत्र्याने शहीद जवानांच्या पार्थिवाला खांदा देण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी. राजनाथ सिंह यांनी श्रीनगरमध्ये शहीद जवानांना श्रद्धांजली दिली. त्यानंतर जवानांचं पार्थिव तिरंग्यात लपेटून त्यांच्या त्यांच्या मूळगावी पाठवण्यात आलं. मात्र त्याआधी जवानांसह राजनाथ सिंह यांनी शहिदांना अखेरचा सलाम करत, त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला. यावेळी वीर जवान तुझे सलाम, भारत माता की जय अशा घोषणांनी आसमंत दुमदुमला.

संबंधित बातम्या 

जवानांच्या पार्थिवाला गृहमंत्री राजनाथ सिंहांचा खांदा   

घरात दीड वर्षांचा अपंग मुलगा, म्हातारा बाप… 26 वर्षीय रमेश यादव शहीद!  

गंभीरचा संताप, सेहवागची हळहळ, सलमान,आमीर, शाहरुखची श्रद्धांजली 

पाकड्या कलाकारांना रोखा, मनसेचा अटीतटीचा इशारा

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप