AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंदोरीकर महाराजांचा शिवजयंतीनिमित्त खास सल्ला, मोशीत जंगी मिरवणूक

मोशी ग्रामस्थांनी इंदोरीकर महाराजांची (Indurikar Maharaj Moshi Kirtan) गावाच्या वेशीपासून बैलगाडीतून वाजत-गाजत मिरवणूक काढली.

इंदोरीकर महाराजांचा शिवजयंतीनिमित्त खास सल्ला, मोशीत जंगी मिरवणूक
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Feb 17, 2020 | 3:10 PM
Share

पुणे : सम-विषम तिथीवरुन मुलगा-मुलगीबाबत भाष्य करुन वादात अडकलेल्या इंदोरीकर महाराजांच्या (Indurikar Maharaj Moshi Kirtan) किर्तनाचा कार्यक्रम आज पुण्यात झाला. शिवजयंती महोत्सवानिमित्त मोशी गावात निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन आलं होतं. यावेळी मोशी ग्रामस्थांनी इंदोरीकर महाराजांची (Indurikar Maharaj Moshi Kirtan) गावाच्या वेशीपासून बैलगाडीतून वाजत-गाजत मिरवणूक काढली.

यावेळी इंदोरीकर महाराजांनी शिवजयंतीनिमित्त खास सल्ला दिला. “शिवजयंतीला संकल्प करा की एखाद्या माणसाचा मृत्यू झाला, तर त्याची राख नदीत टाकू नका. ती राख शेतीतील मातीत टाका. किंवा त्या व्यक्तीच्या नावाने झाड लावून, त्या झाडाला ती राख टाका, झाडे वाढतील आणि नद्या निर्मळ राहतील”, असं इंदोरीकर महाराज म्हणाले.

“राख शेतात टाका. शेतात नसेल तर घरी घेऊन ती झाडाच्या कुंडीत टाका. गावातला माणूस गावात सुखाने जगेल हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं. नदी स्वच्छ होईल. शिवार झाडांनी भरुन जाईल, शिवरायांचं स्वप्न साकार होईल”, असं इंदोरीकर महाराजांनी सांगितलं.

“ज्ञानोबाराय पण झाडं लावण्याचा सल्ला देत होते. झाडाला एक वर्ष पाणी घातलं तर झाड माणसाला आयुष्यभर सेवा देईल. शाळेत जाणाऱ्यांनी शाळेत एक झाड लावावं, सासरी आलेल्या मुलीने बापाच्या आठवणीत एक झाड लावावं, माहेरी आलेल्या लेकीने आपली आठवण म्हणून झाड लावावं,  ग्राम पंचायत सदस्यांनी निवडून आलो म्हणून प्रत्येक वॉर्डमध्ये 2 झाडं लावावी”, असा सल्ला इंदोरीकर महाराजांनी दिला.

जी माणसं मोठ्याने हसतात, ती निर्मळ असतात. गालात हसतात ती गद्दार असतात. मोठ्याने बोलतात ती आतून बाहेरुन निर्मळ. हसत यावं, हसत जावं, असा सल्लाही यावेळी त्यांनी दिला.

मी महाराज होऊन 26 वर्ष झाली, पण 26  वर्षात झालं नाही ते आठवड्यात झालं. 26 वर्ष बोलतोय तेच बोललो, पण तेव्हा काही झालं नाही. आत्ता झालं. माझ्या बोलण्याचा विपर्यास केला. मी आधीच सांगतो माझं बोलणं तुमचा मुलगा म्हणून ऐका, तुमचा मित्र म्हणून ऐका, तरुणींनो बाहेर फिरता आलं पाहिजे, सौरक्षणाचे धडे घ्या आणि तरुणांनो मित्र तपासून घ्या, सोबत भावकी आणि नातेवाईकांपासून सावध रहा, असाही सल्ला इंदोरीकर महाराजांनी दिला.

संबंधित बातम्या

वादानंतर इंदोरीकर महाराजांचं समर्थकांना नम्र आवाहन

Follow Us
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
आदित्य ठाकरे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... एकीकडे कोर्टात सुनावणी सुरू दुसरीकडे शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
विनोद तावडे: विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
कंगना राणावत यांची टीका: गृह मंत्रालयाबाबत दुहेरी भूमिका
राहुल गांधींच्या भूमिकेवर कंगना राणावत यांची टीका: गृह मंत्रालयाबाबत दुहेरी भूमिका