Lockdown | अन्नदान करुन परतणाऱ्या मित्रांवर काळाचा घाला, रिक्षा उलटून दोघांचा जागीच मृत्यू

जळगावच्या अमळनेर तालुक्यातील 6 ते 7 मित्र भुकेल्या नागरिकांना अन्नदान करण्यासाठी गेले होते, त्यांच्या रिक्षाला परत येताना अपघात झाला (Jalgaon Lockdown Rickshaw Accident)

Lockdown | अन्नदान करुन परतणाऱ्या मित्रांवर काळाचा घाला, रिक्षा उलटून दोघांचा जागीच मृत्यू
Follow us
| Updated on: Apr 09, 2020 | 9:32 AM

जळगाव : कोरोनामुळे जाहीर केलेल्या ‘लॉकडाऊन’च्या काळात अन्नदान करुन परतणाऱ्या मित्रांवर काळाने आघात केला. रिक्षा उलटून झालेल्या भीषण अपघातात जळगावात दोघा तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. (Jalgaon Lockdown Rickshaw Accident) 20 वर्षीय ऋषिकेश उमेश शेटे आणि 18 वर्षीय विशाल दिनेश पाटकरी या दोघांना अपघातात प्राण गमवावे लागले आहेत. अमळनेर शहरातील वडचौक येथील रहिवासी होते.

‘कोरोना’च्या प्रतिबंधासाठी देशात सर्वत्र लॉकडाऊन जाहीर केल्याने हातावर पोट असलेल्या गोरगरिबांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हातावर पोट असलेल्या नागरिकांना आनंदर करा, असं आवाहन पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळेच करत आहेत. जळगावच्या अमळनेर तालुक्यातील मुडी, मांडळ परिसरात गोरगरीब, भुकेल्या नागरिकांना अन्नदान करण्यासाठी जळगावातील 6 ते 7 मित्र गेले होते.

हेही वाचा : जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीसप्रमुख दोघेही MBBS, धडाकेबाज प्लॅनिंग, चंद्रपुरात एकही कोरोना रुग्ण नाही!

अन्न वाटप केल्यानंतर घरी परतत असणाऱ्या मित्रांवर नियतीने क्रूर घाला घातला. झाडी गाव ओलांडल्यावर त्यांची रिक्षा उलटली. या अपघातात ऋषिकेश आणि विशाल यांना जबर मार बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर तरुण गंभीर जखमी झाले आहेत.

ही दुर्दैवी घटना काल रात्री 8 वाजताच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील गलवाडे गावाजवळ घडली. तरुण मुलांचा  अचानक मृत्यू झाल्याने शेटे आणि पाटकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

पाहा सकाळच्या हेडलाईन्स :

(Jalgaon Lockdown Rickshaw Accident)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.