AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lockdown | अन्नदान करुन परतणाऱ्या मित्रांवर काळाचा घाला, रिक्षा उलटून दोघांचा जागीच मृत्यू

जळगावच्या अमळनेर तालुक्यातील 6 ते 7 मित्र भुकेल्या नागरिकांना अन्नदान करण्यासाठी गेले होते, त्यांच्या रिक्षाला परत येताना अपघात झाला (Jalgaon Lockdown Rickshaw Accident)

Lockdown | अन्नदान करुन परतणाऱ्या मित्रांवर काळाचा घाला, रिक्षा उलटून दोघांचा जागीच मृत्यू
| Updated on: Apr 09, 2020 | 9:32 AM
Share

जळगाव : कोरोनामुळे जाहीर केलेल्या ‘लॉकडाऊन’च्या काळात अन्नदान करुन परतणाऱ्या मित्रांवर काळाने आघात केला. रिक्षा उलटून झालेल्या भीषण अपघातात जळगावात दोघा तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. (Jalgaon Lockdown Rickshaw Accident) 20 वर्षीय ऋषिकेश उमेश शेटे आणि 18 वर्षीय विशाल दिनेश पाटकरी या दोघांना अपघातात प्राण गमवावे लागले आहेत. अमळनेर शहरातील वडचौक येथील रहिवासी होते.

‘कोरोना’च्या प्रतिबंधासाठी देशात सर्वत्र लॉकडाऊन जाहीर केल्याने हातावर पोट असलेल्या गोरगरिबांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हातावर पोट असलेल्या नागरिकांना आनंदर करा, असं आवाहन पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळेच करत आहेत. जळगावच्या अमळनेर तालुक्यातील मुडी, मांडळ परिसरात गोरगरीब, भुकेल्या नागरिकांना अन्नदान करण्यासाठी जळगावातील 6 ते 7 मित्र गेले होते.

हेही वाचा : जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीसप्रमुख दोघेही MBBS, धडाकेबाज प्लॅनिंग, चंद्रपुरात एकही कोरोना रुग्ण नाही!

अन्न वाटप केल्यानंतर घरी परतत असणाऱ्या मित्रांवर नियतीने क्रूर घाला घातला. झाडी गाव ओलांडल्यावर त्यांची रिक्षा उलटली. या अपघातात ऋषिकेश आणि विशाल यांना जबर मार बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर तरुण गंभीर जखमी झाले आहेत.

ही दुर्दैवी घटना काल रात्री 8 वाजताच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील गलवाडे गावाजवळ घडली. तरुण मुलांचा  अचानक मृत्यू झाल्याने शेटे आणि पाटकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

पाहा सकाळच्या हेडलाईन्स :

(Jalgaon Lockdown Rickshaw Accident)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.