AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जालन्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान

जालन्यात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. एकीकडे दुष्काळग्रस्त मराठवाड्यात मान्सून बरसल्याने पावसाच्या प्रतिक्षेत असलेला बळीराजा सुखावला आहे. तर, दुसरीकडे या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसानही झालं आहे.  

जालन्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान
| Updated on: Jun 23, 2019 | 7:30 PM
Share

जालना : जालन्यात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. एकीकडे दुष्काळग्रस्त मराठवाड्यात मान्सून बरसल्याने पावसाच्या प्रतिक्षेत असलेला बळीराजा सुखावला आहे. तर, दुसरीकडे या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसानही झालं आहे.

जालन्यातील अनेक गावांमध्ये आज मान्सूनने हजेरी लावली. जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. मात्र, या घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे गावातील आणि शेतातील झाडे उन्मळून पडली. तर रस्त्यावरील विजेचे खांबही कोसळले. वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरील आणि शेतातील शेडवरील पत्रे उडून गेली. यामध्ये काही जण जखमीही झाले. तसेच, घराचे आणि घरगुती समानाचेही नुकसान झाले. मात्र, यामध्ये सुदैवाने कोणतिही जीवितहानी झालेली नाही. घनसावंगी तालुक्यातील शिंदे वडगाव आणि पाणेवाडी परिसरात ही घटना घडली.

घनसावंगी तालुक्यातच वीज पडून दहा शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरु झाला. त्यामुळे शेतात चरायला गेलेल्या शेळ्यांना मेंढपाळाने एका झाडाखाली थांबवलं. मात्र, तिथे त्यांच्या त्यांच्यावर वीज कोसळली. यामध्ये दहा शेळ्यांचा मृत्यू झाला.

मराठवाड्यात मान्सून बरसल्याने पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा सुखावला. जालना जिल्ह्यात मान्सूनचा दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारध, पिंपळगाव रेणुकाई, शेलुद, सुरगळी, धावडा, जळगाव, सपकाळ, वालसावगी, आव्हाना, करजगाव, कल्याणी, भायडी, वरुडसह जिल्ह्यातील अनेक गावांत पाऊस झाला.

पहिलाच पाऊस जोरदार झाल्यामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दोन दिवस पेरणी करता येणार नाही. गेल्या वर्षी एवढा पाऊस पूर्ण पावसाळ्यात झाला नव्हता. यावर्षी सुरुवातीला चांगला पाऊस झाला असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.

पाहा व्हिडीओ :

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.