AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“हे कोल्हापूर आहे, एकदा ठरलं की ठरलं, आता पुन्हा एकदा आमचं ठरलंय!” ऋतुराज पाटील यांच्या कानपिचक्या

"त्याला काय हुतंय?" हा शब्दप्रयोग वापरत ऋतुराज पाटील यांनी कोरोनासंबंधी सूचना न पाळणाऱ्या व्यक्तींना कानपिचक्या दिल्या आहेत.

हे कोल्हापूर आहे, एकदा ठरलं की ठरलं, आता पुन्हा एकदा आमचं ठरलंय! ऋतुराज पाटील यांच्या कानपिचक्या
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Aug 18, 2020 | 5:45 PM
Share

कोल्हापूर : कोल्हापुरात ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा प्रशासनासोबत आता कोल्हापूरच्या जनतेनेही ‘कोविड योद्धा’ म्हणून जबाबदारी पार पाडावी, असं आवाहन काँग्रेसचे युवा आमदार ऋतुराज पाटील यांनी केलं आहे. “हे कोल्हापूर आहे, एकदा ठरलं की ठरलं, आता पुन्हा एकदा आमचं ठरलंय!” असा व्हिडीओ शेअर करत ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूरच्या जनतेला आवाहन केलं आहे. “त्याला काय हुतंय?” हा शब्दप्रयोग वापरत ऋतुराज यांनी कानपिचक्या दिल्या आहेत. (Kolhapur Congress MLA Ruturaj Patil appeals to follow guidelines to prevent Corona)

“कोरोनाच्या संकटाशी गेले पाच महिने आपण सामना करत आहोत. सुरुवातीला परदेशात, मुंबई, पुण्यात असणारा कोरोना आपल्या शहरात, गावात, गल्लीत नाही, तर दारात येऊन पोहचला आहे. शासन, प्रशासन, आरोग्य यंत्रणा, पोलीस, एनजीओ आपल्या संरक्षणासाठी काम करत आहेत, रात्रीचा दिवस करत आहेत. परंतु सध्या कम्युनिटी स्प्रेड झाल्यासारखी स्थिती आहे. एकीकडे बरे होणारे रुग्ण आहेत, तर कोरोनाबाधितांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे आपण स्वत:ची काळजी घ्यायला हवीच, पण कुटुंब आणि इतरांची काळजी घेण्याचीही वेळ आली आहे. आपणच कोरोना योद्धा व्हायचं आहे. आपल्या जीवापेक्षा काहीही महत्त्वाचं नाही.” असे ऋतुराज पाटील म्हणाले.

“रस्ते, मार्केट, मेडिकल शॉप, दुकाने, बेकरी अशा अनेक ठिकाणी आजही गर्दी असल्याचं चित्र आहे. आपण मास्क, सोशल डिस्टन्सिंग पाळतो का? मित्रांसोबत एकत्र बसतो. वाटतं आपलेच तर मित्र आहेत. त्याला काय हुतंय? ऑफिसमध्ये गर्दी करुन एकत्र जेवायला बसतो. त्याला काय हुतंय? गल्लीच्या कोपऱ्यावर तासंतास गप्पा मारत बसतो आणि म्हणतो हे काय लांबचे आहेत का? त्याला काय हुतंय? आपल्या माता भगिनी दारात बसतात, ओपन मैदाने आणि ओपन जिमची परवानगी मिळाल्याने एकत्र जमून खेळतो. त्याला काय हुतंय? हे ठरलेले वाक्य.” असे म्हणत ऋतुराज पाटील यांनी कान टोचले आहेत. “हे कोल्हापूर आहे, एकदा ठरलं की ठरलं, आता पुन्हा एकदा आमचं ठरलंय, कोरोनाला तटवायचंच” असा नाराही त्यांनी दिला. (Kolhapur Congress MLA Ruturaj Patil appeals to follow guidelines to prevent Corona)

संबंधित बातमी :

युवा आमदार ऋतुराज पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसमध्ये मोठी जबाबदारी

(Kolhapur Congress MLA Ruturaj Patil appeals to follow guidelines to prevent Corona)

Follow Us
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील दौऱ्यापूर्वीच उद्धव ठाकरेंचे विधान
अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फो
Supriya Sule | अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फोटो
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये..
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये...
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?