AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bharti Singh | कपिल शर्मानंतर कृष्णा अभिषेक भारतीच्या समर्थनार्थ पुढे, टीका करणाऱ्या राजू श्रीवास्तवांना फटकारले!

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी ड्रग्ज प्रकरणावर भाष्य करताना, भारतीवर टीका केली होती. यावर आता कृष्णा अभिषेकने पलटवार करत, प्रत्युत्तर दिले आहे.

Bharti Singh | कपिल शर्मानंतर कृष्णा अभिषेक भारतीच्या समर्थनार्थ पुढे, टीका करणाऱ्या राजू श्रीवास्तवांना फटकारले!
| Updated on: Nov 30, 2020 | 11:23 AM
Share

मुंबई : बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री भारती सिंहचे (Bharti Singh) नाव समोर आल्यानंतर, तिला अटकही करण्यात आली होती. या सगळ्याचा परिणाम आता तिच्या करिअरवर देखील झाला आहे. भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांची सोनी टीव्हीच्या ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमातून हकालपट्टी झाल्याचे कळते आहे. या सगळ्या प्रकारानंतर कपिल शर्माने भारतीची बाजू घेत तिला कार्यक्रमातून काढू नये, अशी विनंती केली होती. आता अभिनेता, कॉमेडियन कृष्णा अभिषेकदेखील (Krushna Abhishek) भारतीच्या समर्थनार्थ पुढे आला आहे (Krushna Abhishek Slams Raju Srivastava over bharti singh drugs case).

कृष्णा अभिषेकने भारतीची बाजू घेत, तिच्यावर टीका करणाऱ्यांना फटकारले आहे. यात अग्रस्थानी आहेत कॉमेडियन राजू श्रीवास्तव. कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी ड्रग्ज प्रकरणावर भाष्य करताना, भारतीवर टीका केली होती. यावर आता कृष्णा अभिषेकने पलटवार करत, प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले राजू श्रीवास्तव?

ड्रग्ज प्रकरणात भारतीला अटक झाल्यानंतर अभिनेता, कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले, ‘लाखो लोक तुला त्यांची आयडियल मानतात. तुझे फोटो त्यांच्या फोनमध्ये असतात. त्यांना तुझ्यासारखे व्हावे, असे वाटते. असे असतानाही तुला ड्रग्ज घेण्याची गरज का भासली?, ड्रग्ज घेतल्याने कुठलीही ताकद मिळत नाही. त्याने कुठलीही प्रसिद्धी मिळणार नाही.’

त्याने सगळ्यांसोबतचे नाते खराब केले…

कृष्णा अभिषेक यांनी आता राजू यांच्या या प्रतिक्रियेला सणसणीत उत्तर दिले आहे. कृष्णा म्हणतो, ‘प्रतिक्रिया सगळ्यांनीच दिल्या. परंतु, राजू श्रीवास्तव यांची टीका अतिशय हीन दर्जाची होती. त्यांनी भारतीबद्दल जे काही म्हटले ते अतिशय वाईट आणि धक्कादायक होते. यामुळे त्यांनी सगळ्यांसोबतचे नाते खराब केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे आमच्या संपूर्ण टीमला वाईट वाटले आहे. एकाच क्षेत्रात काम करत असताना, त्यांनी भारतीबद्दल असे बोलणे चुकीचे आहे (Krushna Abhishek Slams Raju Srivastava over bharti singh drugs case).

कामाची नशा करा : सुनील पाल

कॉमेडियन सुनील पाल यांनी देखील या प्रकरणावर भाष्य केले होते. ‘या क्षणी मला भारतीचा राग येतो आहे. मला तिला ओरडायचे आहे. आमच्या कॉमेडीचा भरती अभिमान होती. पूर्वी महिला कॉमेडी करत नव्हत्या. पण, भारतीमुळे अनेक स्त्रियांना कॉमेडी करण्याची प्रेरणा मिळाली. आज या प्रकारामुळे लोक सगळ्या कॉमेडियन्सकडे त्याच नजरेने पाहत आहेत. पण तरीही एनसीबीने केलेल्या कारवाईचे मी स्वागत करतो’, असे सुनील यांनी म्हटले होते.

पुढे, भारती यांना सल्ला देताना सुनील पाल म्हणाले, ‘कामाची नशा करा, अमली पदार्थांची नाही. आई सरस्वतीने तुम्हाला या ठिकाणापर्यंत पोहचवले आहे. वास्तविक हा आई सरस्वतीचा अपमान आहे.’

(Krushna Abhishek Slams Raju Srivastava over bharti singh drugs case)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.