दिसपूर : आसाममधील पूरस्थिती अधिक गंभीर होताना दिसत आहे (Assam floods). आतापर्यंत आसाममध्ये 23 जिल्ह्यांमधील 26 लाख लोकांना याचा फटका बसला आहे (Latest Updates of Assam Flood). लाखो लोकांना पुरामुळे विस्थापित करुन सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. राज्यात रविवारी आणखी 5 नागरिकांचा पुरामुळे मृत्यू झाला. आसामध्ये पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 128 जणांचा मृत्यू झाला आहे.
आसाम राज्य आपत्ती निवारण विभागाने (ASDMA) दिलेल्या पूरस्थितीच्या माहितीवरुन बारपेटा आणि कोकराझार जिल्ह्यांमध्ये रविवारी प्रत्येकी दोन नागरिकांचा मृत्यू झाला. याशिवाय मोरीगाव जिल्ह्यात देखील एकाचा मृत्यू झाला. आसाममध्ये पूर आणि इतर पुराशी संबंधित कारणांमुळे 102 तर भूस्खलनामुळे 26 जणांचा मृत्यू झाला.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
आसाममध्ये आतापर्यंत 24.76 लाखपेक्षा अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. सर्वाधिक फटका गोलपाडा भागाला बसला आहे. येथे जवळपास 4.7 लाखांपेक्षा अधिक लोकांना विस्थापित करावं लागलं. राज्यात 101 बचाव होड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मागील 24 तासात जिल्हा प्रशासनाने आणि स्थानिक लोकांनी 188 जणांना वाचवले आहे. शनिवारपर्यंत (25 जुलै) 27 जिल्ह्यांमधील 26.37 लाखांपेक्षा अधिक जणांना पुराचा फटका बसला आहे.
दरम्यान, आसाममधील पुरग्रस्तांसाठी मदतकार्य सुरु आहे. देशभरातून पुरग्रस्तांविषयी काळजी व्यक्त केली जात आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आसामधील पुराची स्थिती जाणून घेतली आहे.
हेही वाचा :
कोरोना संपवण्यासाठी राम मंदिर भूमिपूजनापर्यंत रोज हनुमान चालिसा म्हणा : प्रज्ञासिंह ठाकूर
‘भाभीजी पापड’ खा आणि कोरोनामुक्त व्हा, केंद्रीय राज्यमंत्र्यांचा दावा
Latest Updates of Assam Floods