AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात दिवसभरात तब्बल 583 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 10,498 वर

महाराष्ट्रात आज (30 एप्रिल) दिवसभरात तब्बल 583 नवे रुग्ण आढळले आहेत (Maharashtra Corona Update). त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजार 498 वर पोहोचला आहे.

राज्यात दिवसभरात तब्बल 583 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 10,498 वर
| Updated on: Apr 30, 2020 | 11:57 PM
Share

मुंबई : महाराष्ट्रात आज (30 एप्रिल) दिवसभरात तब्बल 583 नवे रुग्ण आढळले आहेत (Maharashtra Corona Update). त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजार 498 वर पोहोचला आहे. विशेष म्हणजे एकट्या मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 7 हजारांच्या पार गेला आहे. तर पुण्यातील रुग्णांची संख्यादेखील तब्बल 1200 च्या पार गेली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे (Maharashtra Corona Update).

कोरोनाचे रुग्ण वाढत असताना बरे होणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील हळूहळू वाढू लागली आहे. महाराष्ट्रात आज 180 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत 1 हजार 773 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

राज्यात कोरोनामुळे आज दिवसभरात 27 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मुंबईचे 20, तर पुणे शहरातील 3 आणि ठाणे शहरातील 2 रुग्ण आहेत. याशिवाय नागपूर शहर आणि रायगड येथील प्रत्येकी 1 रुग्णाचा यात समावेश आहे. राज्यात आतापर्यंत 459 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यातील कल्याण-डोबिंवली, मीरा भाईंदर, वसई विरार, मालेगाव, औरंगाबाद, नागपूर, सोलापूर या शहरांमधील कोरोनाबाधितांचा आकडा 100 च्या पार गेला आहे. त्यापाठोपाठ यवतमाळमध्येदेखील कोरोनाचा आकडा 79 वर पोहोचला आहे. याशिवाय राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येदेखील कोरोनाचा प्रदुर्भाव हळूहळू वाढू लागला आहे. त्यामुळे प्रशासनापुढे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचं मोठं आव्हान आहे.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि प्रशासन प्रचंड मेहनत घेत आहे. कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला परिसर प्रशासनाकडून पूर्णपणे सील करण्यात येत आहे. संशयित रुग्णांना क्वारंटाईन केलं जात आहे. तसेच नवे कोरोनाबाधित आढळलेले रुग्ण किती व्यक्तींच्या संपर्कात आले याचादेखील शोध प्रशासन घेत आहे. यामध्ये कुणी संशयित आढळलं तर त्याची तपासणी केली जात आहे आणि क्वारंटाईन केलं जात आहे.

राज्यात आतापर्यंत 1 लाख 45 हजार 798 लोकांची तपासणी करण्यात आली आहे. याशिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या 10 हजार 92 पथकांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं.

राज्यात कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

जिल्हा रुग्ण बरे मृत्यू
मुंबई 7061 374 290
पुणे (शहर+ग्रामीण) 1120 125 85
पिंपरी चिंचवड मनपा 72 3
ठाणे (शहर+ग्रामीण) 460 36 8
नवी मुंबई मनपा 174 3
कल्याण डोंबिवली मनपा 163 3
उल्हासनगर मनपा 3
भिवंडी निजामपूर मनपा 17
मीरा भाईंदर मनपा 126 2
पालघर 41 1 1
वसई विरार मनपा 128 3
रायगड 24 5 1
पनवेल मनपा 47 2
नाशिक (शहर +ग्रामीण) 26 2
मालेगाव मनपा 171 12
अहमदनगर (शहर+ग्रामीण) 42 16 2
धुळे 25 3
जळगाव 40 1 9
नंदूरबार 11 1
सोलापूर 99 6
सातारा 32 3 2
कोल्हापूर 14 2
सांगली 29 27 1
सिंधुदुर्ग 2 1
रत्नागिरी 8 2 1
औरंगाबाद 131 14 7
जालना 2
हिंगोली 15 1
परभणी 2
लातूर 12 8 1
उस्मानाबाद 3 3
बीड 1
नांदेड 3
अकोला 39 1 1
अमरावती 28 7
यवतमाळ 79 8
बुलडाणा 21 8 1
वाशिम 2
नागपूर 139 12 2
भंडारा 1
गोंदिया 1 1
चंद्रपूर 2 1
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) 26 2
एकूण 10498 1773 459

संबंधित बातम्या :

देशातील 8,324 रुग्ण कोरोनामुक्त, बाधितांची संख्या 33 हजारांवर : आरोग्य मंत्रालय

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.