AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलिसाचा ऑन ड्युटी नैसर्गिक मृत्यू झाल्यास कुटुंबाला तात्काळ 50 हजार, पोलीस महासंचालकांचा मोठा निर्णय

ज्या पोलीस कर्मचाऱ्याचा ड्युटीवर असताना नैसर्गिकरित्या मृत्यू होईल (Police Dies On Duty), त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ 50 हजार रुपये अनुदान मिळेल

पोलिसाचा ऑन ड्युटी नैसर्गिक मृत्यू झाल्यास कुटुंबाला तात्काळ 50 हजार, पोलीस महासंचालकांचा मोठा निर्णय
राज्यात माजी पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल
| Updated on: Dec 23, 2019 | 9:37 PM
Share

मुंबई : राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जैस्वाल यांनी पोलीस खात्यातील कर्मचारी यांच्यासाठी महत्वाची घोषणा केली आहे (Maharashtra Police). ज्या पोलीस कर्मचाऱ्याचा ड्युटीवर असताना नैसर्गिकरित्या मृत्यू होईल (Police Dies On Duty), त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ 50 हजार रुपये अनुदान मिळेल, अशी घोषणा महासंचालक सुबोधकुमार जैस्वाल यांनी केली. यापूर्वी अशा परिस्थितीत केवळ पाच हजार रुपये मिळत होते (Director General of Police Subodh Kumar Jaiswal).

राज्यात सुमारे दोन लाख पोलीस कर्मचारी आहेत. पोलिसांची नोकरी म्हणजे सतत ताणतणावाची असते. ड्युटीची वेळ नाही, बारा-बारा तास तर कधी सतत एक-दोन दिवसही ड्युटी करावी लागते. कधी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात, तर कधी आरोपीचा माग काढत दिवसेंदिवस अनेक ठिकाणी फिरावं लागतं. या परिस्थितीत जेवणाचे हाल होतात. यामुळे मग अनेक आजार पोलीस कर्मच्यांना जडतात. यातून मग पोलीस कर्मचाऱ्यांना अकाली मृत्यू येतो. एवढं सर्व पोलीस दलासाठी केल्यावर पोलीस दलाकडून सन्मान होतो का? तर तो नाहीच्या बरोबर. मात्र, आता राज्याच्या पोलीस महासंचालकांनी त्यांचा सन्मान करायचा निर्णय घेतला आहे (DGP Subodh Kumar Jaiswal).

पोलीस कर्मचारी घातपात, नक्षलींच्या हल्ल्यातही शहीद होतात. अशा परिस्थितीत जीव गमावलेल्या पोलिसांना अनेक प्रकारे भरघोस मदत मिळत असते. सरकार कडून, पोलीस खात्यातून त्यांना मदत मिळत असते. दुसरीकडे, ज्या कर्मचाऱ्यांचा ड्युटीवर असताना नैसर्गिकरित्या मृत्यू होतो, त्यांना मात्र एवढी मदत मिळत नाही. अशा पोलिसांना पोलीस कल्याण निधीतून तुटपुंजी मदत मिळत होती. मात्र,आता महासंचालक जैस्वाल यांनी घेतलेल्या निर्णयानंतर पोलिसांना समाधानकारक मदत मिळणार आहे. जैस्वाल यांनी अत्यंत चांगला निर्णय घेतल्याचं मत माजी पोलीस कर्मचाऱ्यांची व्यक्त केलं आहे.

राज्याच्या पोलीस महासंचालकानी चांगला निर्णय घेतला आहे. पोलीस दलात कर्तव्य बजावताना नैसर्गिकरित्या मृत्यू झालेल्या पोलिसांच्या कुयूंबियांचे ही अनेक प्रश्न आहेत. ते सोडवण्यासाठीही पुढाकार घ्यावा, अशी मागणीही पोलीस कर्मचाऱ्यांची केली आहे.

50 thousand rupees help to family of police after natural death

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.