AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आकाशातून आलेली वीज थेट गवताच्या वखारीवर..राज्यात अवकाळीचा धुमाकूळ,बुलढाण्यात वीज पडून 16 मेंढ्यांचा मृत्यू

पालघर तालुक्यात आकाशातून पडलेली वीज थेट गवताच्या वखारीवर पडली. उन्हाने सुकलेल्या या वखारीने लगेच पेट घेतला आणि भीषण आग लागली.

आकाशातून आलेली वीज थेट गवताच्या वखारीवर..राज्यात अवकाळीचा धुमाकूळ,बुलढाण्यात वीज पडून 16 मेंढ्यांचा मृत्यू
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 06, 2023 | 11:42 AM
Share

मुंबई : राज्यात कालपासून अवकाळी पावसाला (Unseasonal rain) सुरुवात झाली आहे. 8 मार्चपर्यंत विदर्भ, मराठवाड्यातील अनेक भागात वीजेच्या कडकडाटासह गारपीटीची शक्यता हवामान विभागार्फे वर्तवण्यात आली होती. 7 मार्च रोजी रात्रीपासूनच राज्यातील अनेक भागात बदललेल्या हवामानाचा फटका बसला. काल सकाळपासूनच अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होतं. तर रात्रीतून काही ठिकाणी वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. पालघर तालुक्यात आकाशातून पडलेली वीज थेट गवताच्या वखारीवर पडली. उन्हाने सुकलेल्या या वखारीने लगेच पेट घेतला आणि भीषण आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाडी घटनास्थळी दाखल झाली आहे.

कुठे घडली घटना?

पालघर तालुक्यातील सफाळे पूर्व भागात असलेल्या साखरे येथील गवताच्या वखाऱ्याला पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारात वीज पडून वखार जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल होऊन आग विजवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी वखार मालकाचे लाखो रुपयांचं नुकसान झाले आहे.

बुलढाण्यात मेंढ्या दगावल्या

बुलढाणा जिल्ह्यात मध्यरात्रीपासून वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी पाऊस बरसला. तर काही ठिकाणी विजा पडण्याच्याही घटना घडल्या. बुलढाण्याच्या शेजारी असलेले साखळी नावाच्या गावात वीज पडून मेंढपाळाच्या तब्बल 16 मेंढ्या दगावलेल्या आहेत. तर पाच ते सहा मेंढ्या जखमी झाल्या आहेत. महसूल विभागाकडून सदर घटनेचा पंचनामा सुरू आहे .. मात्र मेंढपाळांचं मोठं नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे.

नाशिकमध्ये द्राक्ष, भाज्यांचं नुकसान

नाशिक शहर आणि जिल्ह्यात रात्रभर जोरदार अवकाळी पाऊस झाला. शहरात मध्यरात्री 2 वाजता विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. मात्र या अवकाळी पावसाने आता पुन्हा एकदा शेतकरी चिंतेत आले असून, ग्रामीण भागात कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, द्राक्षे आणि कोबी या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच आजच्या होळीच्या उत्सवावर देखील पावसाचे सावट आहे. आज आणि उद्या हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

अहमदनगरमध्ये गारपीट

अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागात रविवारी रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.. काही ठिकाणी गाराही पडल्या तर अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता.. या अवकाळी पावसाने शेती पिकांचे नुकसान होणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे…आज सकाळी देखील जिल्ह्यात ढगाळ वातावरण बघायला मिळतय…

धुळ्यात 400 एकर पिकांचं नुकसानीचा अंदाज

धुळे जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे सुमारे चारशे एकर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. दोन तालुक्यात सुमारे साठ लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. काल झालेल्या वादळी पावसामुळे जिल्ह्यातील शिरपूर आणि शिदखेडा या दोन्ही तालुक्यात रब्बी पिकांना त्याचा फटका बसला आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.