AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Corona | तुकाराम मुंढेंच्या निर्णयामुळे नागपुरात मोठा धोका टळला

क्वारंटाईन केलेल्यांपैकी तब्बल 43 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या कठोर निर्णयांमुळे या 43 जणांपासून इतरांना संसर्ग (Nagpur Corona Virus Threat) होण्यापासून टळलं.

Nagpur Corona | तुकाराम मुंढेंच्या निर्णयामुळे नागपुरात मोठा धोका टळला
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: May 07, 2020 | 6:52 PM
Share

नागपूर : नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे (IAS Tukaram Mundhe) यांच्या निर्णयाने (Nagpur Corona Virus Threat) नागपूरवरील मोठं संकट टळलं आहे. तुकाराम मुंढे यांनी विरोध होत असतानाही नागपुरातील मोमीनपुरा आणि सतरंजीपुरा परिसरातील अनेकांना क्वारंटाईन केलं. या क्वारंटाईन केलेल्यांपैकी तब्बल 43 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या कठोर निर्णयांमुळे या 43 जणांपासून इतरांना संसर्ग (Nagpur Corona Virus Threat) होण्यापासून टळलं.

नागपुरातील कोरोना हॉटस्पॉट असलेल्या मोमीनपुरा आणि सतरंजीपुरा परिसरातील 43 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या सर्वांना आधीच क्वारंटाईन करण्यात आलेलं होतं. क्वारंटाईन असल्यामुळे या 43 जणांपासून अनेकांना कोरोनाचा संसर्ग टळला आहे. नागपुरातील मोमीनपुऱ्यातून पाच दिवसांत तब्बल 600 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं होतं. तर, सतरंजीपुरा परीसरातून यापूर्वीच जवळपास 1700 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं होतं. या दोन्ही परिसरातील एकूण 2300 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. संसर्गाचा धोका दिसताच आणखी काही लोकांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतला आहे.

नागपुरातील सतरंजीपुरा परिसर मध्य भारतातील ‘कोरोना’ साखळीचं सर्वात मोठं केंद्रबिंदू ठरत आहे. एकट्या सतरंजीपुरा परिसरात कोरोना रुग्णांनी शंभरी गाठली आहे. या परिसरातील क्वारंटाईन करण्यात आलेल्या 43 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे नागपुरात कोरोना बाधितांचा आकडा 182 वर पोहोचला आहे.

मध्य भारतात एकाच परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळणारं सतरंजीपुरा हे एकमेव ठिकाण आहे. या परिसरातील कोरोना साखळी खंडीत करण्यासाठी नागपूर महानगरपालिका युद्धपातळीवर उपाययोजना करत आहे.

68 वर्षीय कोरोनाबाधित मृतकाच्या संपर्कात आल्याने सतरंजीपुरा परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढत गेला. या एका व्यक्तीच्या संपर्कात आल्याने 60 पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली (Nagpur Corona Virus Threat). त्यानंतर इथली कोरोना रुग्णांची संख्या वाढत गेली.

सतरंजीपुरा परिसरात कोरोना साखळी खंडीत करण्यासाठी मनपाकडून युद्धपातळीवर उपाययोजना सुरु आहे. या भागातील साधारण 1700 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. इथल्या नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. या भागातली सर्व गल्ल्या सील करण्यात आल्या आहेत.

मिशन सतरंजीपुरा मास्टर प्लॅनमधील उपाययोजना

  • सतरंजीपुरामधील 1700 च्या जवळ लोकांना करण्यात आलं क्वारंटाईन
  • टीबी पेशंट शोधून त्यांच्यावर उपचार
  • गरोदर मातांची तपासणी
  • हाय रिस्क असणाऱ्यांची कडक तपासणी
  • सतरंजीपुरा परिसरात सीआरपीएफ आणि जीआरपीचे 200 जवान तैनात

सतरंजीपुरा हा भाग दाटीवाटीचा आणि मोठ्या लोकसंख्येचा आहे. त्यामुळे प्रशासनाने तयार केलेल्या मास्टर प्लॅननुसार या भागाला सील करत नागरिकांना क्वारंटाईन (Nagpur Corona Virus Threat) करण्यात आले.

VIDEO : 

संबंधित बातम्या :

लॉकडाऊनदरम्यान लवकरच Zomato कडून घरपोच दारुची डिलिव्हरी

नागपुरात कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच, 24 तासात 63 जणांना कोरोनाची लागण

राज्यात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा 531 वर, दोन दिवसात 74 पोलीस कोरोनाग्रस्त

नागपुरात एका दिवसातील सर्वाधिक रुग्ण, 11 दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट

Follow Us
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा.

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर.

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?.

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?