AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यातील धरणांमध्ये फक्त 38 टक्केच पाणीसाठा, मराठवाड्यात भीषण स्थिती

नागपूर : हिवाळा जवळपास संपत आलाय आणि उन्हाळ्याची चाहूल लागलीय. पण उन्हाळ्याची चाहूलच राज्यात पाणीटंचाई घेऊन आल्याची स्थिती सध्या महाराष्ट्रात आहे. राज्यातील धरणांमध्ये सध्या 38 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातील धरणांमध्ये अवघा 19 टक्केच, तर औरंगाबाद विभागात अवघा 11 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. या पाण्यावर साडेपाच महिने राज्याची तहान कशी भागणार हा […]

राज्यातील धरणांमध्ये फक्त 38 टक्केच पाणीसाठा, मराठवाड्यात भीषण स्थिती
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM
Share

नागपूर : हिवाळा जवळपास संपत आलाय आणि उन्हाळ्याची चाहूल लागलीय. पण उन्हाळ्याची चाहूलच राज्यात पाणीटंचाई घेऊन आल्याची स्थिती सध्या महाराष्ट्रात आहे. राज्यातील धरणांमध्ये सध्या 38 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातील धरणांमध्ये अवघा 19 टक्केच, तर औरंगाबाद विभागात अवघा 11 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. या पाण्यावर साडेपाच महिने राज्याची तहान कशी भागणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

राज्यातील जनतेला आणि सरकारलाही चिंता करायला लावणारी ही जलसंपदा विभागाची आकडेवारी… सध्या राज्यातील धरणात अवघा 38 टक्केच पाणीसाठा उरलाय. या पाण्यात पुढील साडेपाच महिने राज्यातील जनतेची तहान कशी भागणार? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. राज्यात यंदा भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे धरणांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत 16 टक्के कमी पाणी आहे.

राज्यातील धरणांमधील विभागवार पाणीसाठा

विभाग         पाणीसाठा       गेल्यावर्षीचा पाणीसाठा

अमरावती       36 टक्के           27 टक्के

औरंगाबाद       11 टक्के           48 टक्के

नागपूर          19 टक्के          25 टक्के

नाशिक          35 टक्के          58 टक्के

पुणे             53 टक्के          68 टक्के

कोकण          61 टक्के           67 टक्के

एकूण            38 टक्के           54 टक्के

नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात सध्या अवघा 11 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात अवघा 34 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. राज्याची उपराजधानीत सध्या रोज 650 दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. 30 लाख लोकांची तहान भागवण्यासाठी नागपूरला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातही कमी पाणीसाठा आहे. त्यामुळेच जपून पाणी वापरण्याचा सल्ला दिला जातोय.

सध्या राज्याच्या अनेक भागात भीषण पाणीटंचाई आहे. विदर्भातील यवतमाळ, अकोला, वर्धा आणि नागपूरच्या काही भागातही पाणीटंचाईची सुरुवात झाली आहे. मराठवाड्यात तर परिस्थिती भीषण आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेनुसार हे जलसंकट आणखी तीव्र होणार आहे. त्यामुळे पाणीसंकटामुळे लोकांच्या डोळ्यात पाणी येण्याआधी प्रशासनाचं पाणी तहानलेल्यांपर्यंत पोहोचण्याची खरी गरज आहे.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.