EXCLUSIVE: वर्ध्यातील पुलगाव स्फोटातील केवळ 6 जवानांनाच शहीद दर्जा

वर्धा : पुलगाव येथील केंद्रीय दारुगोळा भंडारात 31 मे 2016 रोजी झालेल्या स्फोटात 19 जवानांना प्राण गमवावे लागले होते. या 19 पैकी केवळ 6 जवानांनाच शहिदाचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे उर्वरित 13 जवानांचे कुटुंबीय शहिदांचा दर्जा मिळावा या मागणीसाठी 25 फेब्रुवारीला दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर उपोषण करणार आहेत. विशेष म्हणजे हे परिवार त्यांना मिळालेले सर्व पुरस्कार, राष्ट्रपती पुरस्कार आणि […]

EXCLUSIVE: वर्ध्यातील पुलगाव स्फोटातील केवळ 6 जवानांनाच शहीद दर्जा
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

वर्धा : पुलगाव येथील केंद्रीय दारुगोळा भंडारात 31 मे 2016 रोजी झालेल्या स्फोटात 19 जवानांना प्राण गमवावे लागले होते. या 19 पैकी केवळ 6 जवानांनाच शहिदाचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे उर्वरित 13 जवानांचे कुटुंबीय शहिदांचा दर्जा मिळावा या मागणीसाठी 25 फेब्रुवारीला दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर उपोषण करणार आहेत. विशेष म्हणजे हे परिवार त्यांना मिळालेले सर्व पुरस्कार, राष्ट्रपती पुरस्कार आणि पदक सरकारला परत करणार आहेत.

प्राण गमावलेल्या 19  जवनांपैकी 6 जवनांना सरकारने शहीद घोषित केले, मात्र इतर 13 जवानांना शहिदांचा दर्जा मिळाला नाही.  आग विझविताना ज्या आगीने कवेत घेतले, त्या आगीनेही आग विझविणारा सैनिक आहे  की फायरमन दर्जाचा कर्मचारी आहे हे पाहिलं नाही. मग हे सरकार असं सावत्रपणे का वागतंय असा प्रश्न प्राण गमावलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांनी केला आहे .

या 13 जवानांच्या कुटुंबीयांनी अनेकदा पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहिले, भेटण्याची वेळ मागितली, विनंत्या केल्या, मात्र काही फायदा झाला नाही.

संमतीशिवाय चिटपाखरुही शिरु न शकणाऱ्या पुलगाव दारुगोळा भंडारात आर्मीचे जवान वेगळे आणि सिविलीयन वेगळे असा फरक केला आहे. प्राण गमावलेल्या  13 फायरमन दर्जाच्या सैनिकांना सिविलीयन म्हणून दर्जा देण्यास नकार दिला असल्याचा आरोप शहिदांच्या कुटुंबियांकडून करण्यात आला आहे.

देशाची सुरक्षा यंत्रणा संभाळतांना सैनिकासोबतच फायरमनची जबाबदारीही तितकीच मोलाची आहे, हे नाकारुन चालणार नाही. ज्या सैन्याला अतिशय महत्वाचा असलेला दारुगोळा लागतो, ती रसद जतन करुन ठेवताना, आग विझवताना, फायरमनची भूमिकाही तितकीच महत्वाची वाटते. आता स्फोटात प्राणाची आहुती देणाऱ्यांना  ‘शहीद’ दर्जा मिळावा यासाठी हे कुटुंबीय पंतप्रधान कार्यालयाशी पत्रव्यवहार करीत आहेत. पण त्याचा काही फायदा होताना दिसत नाही. त्यामुळेच या 13 कुटुंबीयांनी 25 फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या जंतरमंतरवर उपोषण करण्याची तयारी केली आहे.

2016 च्या पुलगाव बॉम्बस्फोटात शहिदांचा दर्जा न मिळालेले जवान

1) लीलाधर चोपडे , पुलगाव

2) बाळू पाखरे , पुलगाव

3) अमित दांडेकर , पुलगाव

4) अमोल येसनकर , पुलगाव

5) अमित पुनिया , पानिपत, हरियाणा

6) धर्मेंद्रकुमार यादव , उत्तर प्रदेश

7) अरविंद सिंग , हरियाणा

8) कृष्णकुमार ,हरियाणा

9) कुलदीप सिंग ,हरियाणा

10 नवज्योत सिंग , हरियाणा

11) शेखर गंगाधर बाळसकर, आर्वी

12) प्रमोद मेश्राम , यवतमाळ

13) धनराज मेश्राम , नागपूर

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.