AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EXCLUSIVE: वर्ध्यातील पुलगाव स्फोटातील केवळ 6 जवानांनाच शहीद दर्जा

वर्धा : पुलगाव येथील केंद्रीय दारुगोळा भंडारात 31 मे 2016 रोजी झालेल्या स्फोटात 19 जवानांना प्राण गमवावे लागले होते. या 19 पैकी केवळ 6 जवानांनाच शहिदाचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे उर्वरित 13 जवानांचे कुटुंबीय शहिदांचा दर्जा मिळावा या मागणीसाठी 25 फेब्रुवारीला दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर उपोषण करणार आहेत. विशेष म्हणजे हे परिवार त्यांना मिळालेले सर्व पुरस्कार, राष्ट्रपती पुरस्कार आणि […]

EXCLUSIVE: वर्ध्यातील पुलगाव स्फोटातील केवळ 6 जवानांनाच शहीद दर्जा
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM
Share

वर्धा : पुलगाव येथील केंद्रीय दारुगोळा भंडारात 31 मे 2016 रोजी झालेल्या स्फोटात 19 जवानांना प्राण गमवावे लागले होते. या 19 पैकी केवळ 6 जवानांनाच शहिदाचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे उर्वरित 13 जवानांचे कुटुंबीय शहिदांचा दर्जा मिळावा या मागणीसाठी 25 फेब्रुवारीला दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर उपोषण करणार आहेत. विशेष म्हणजे हे परिवार त्यांना मिळालेले सर्व पुरस्कार, राष्ट्रपती पुरस्कार आणि पदक सरकारला परत करणार आहेत.

प्राण गमावलेल्या 19  जवनांपैकी 6 जवनांना सरकारने शहीद घोषित केले, मात्र इतर 13 जवानांना शहिदांचा दर्जा मिळाला नाही.  आग विझविताना ज्या आगीने कवेत घेतले, त्या आगीनेही आग विझविणारा सैनिक आहे  की फायरमन दर्जाचा कर्मचारी आहे हे पाहिलं नाही. मग हे सरकार असं सावत्रपणे का वागतंय असा प्रश्न प्राण गमावलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांनी केला आहे .

या 13 जवानांच्या कुटुंबीयांनी अनेकदा पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहिले, भेटण्याची वेळ मागितली, विनंत्या केल्या, मात्र काही फायदा झाला नाही.

संमतीशिवाय चिटपाखरुही शिरु न शकणाऱ्या पुलगाव दारुगोळा भंडारात आर्मीचे जवान वेगळे आणि सिविलीयन वेगळे असा फरक केला आहे. प्राण गमावलेल्या  13 फायरमन दर्जाच्या सैनिकांना सिविलीयन म्हणून दर्जा देण्यास नकार दिला असल्याचा आरोप शहिदांच्या कुटुंबियांकडून करण्यात आला आहे.

देशाची सुरक्षा यंत्रणा संभाळतांना सैनिकासोबतच फायरमनची जबाबदारीही तितकीच मोलाची आहे, हे नाकारुन चालणार नाही. ज्या सैन्याला अतिशय महत्वाचा असलेला दारुगोळा लागतो, ती रसद जतन करुन ठेवताना, आग विझवताना, फायरमनची भूमिकाही तितकीच महत्वाची वाटते. आता स्फोटात प्राणाची आहुती देणाऱ्यांना  ‘शहीद’ दर्जा मिळावा यासाठी हे कुटुंबीय पंतप्रधान कार्यालयाशी पत्रव्यवहार करीत आहेत. पण त्याचा काही फायदा होताना दिसत नाही. त्यामुळेच या 13 कुटुंबीयांनी 25 फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या जंतरमंतरवर उपोषण करण्याची तयारी केली आहे.

2016 च्या पुलगाव बॉम्बस्फोटात शहिदांचा दर्जा न मिळालेले जवान

1) लीलाधर चोपडे , पुलगाव

2) बाळू पाखरे , पुलगाव

3) अमित दांडेकर , पुलगाव

4) अमोल येसनकर , पुलगाव

5) अमित पुनिया , पानिपत, हरियाणा

6) धर्मेंद्रकुमार यादव , उत्तर प्रदेश

7) अरविंद सिंग , हरियाणा

8) कृष्णकुमार ,हरियाणा

9) कुलदीप सिंग ,हरियाणा

10 नवज्योत सिंग , हरियाणा

11) शेखर गंगाधर बाळसकर, आर्वी

12) प्रमोद मेश्राम , यवतमाळ

13) धनराज मेश्राम , नागपूर

निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ.
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?.
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज.
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.