AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वादळी वाऱ्यामुळे मंडप कोसळला, 14 जणांचा जागीच मृत्यू

वादळी वाऱ्यामुळे मंडप कोसळल्याने तब्बल 14 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 45 लोक जखमी झाल्याचे समोर येत आहे. राजस्थानच्या बाडमेरमध्ये ही घटना घडली आहे.

वादळी वाऱ्यामुळे मंडप कोसळला, 14 जणांचा जागीच मृत्यू
| Updated on: Jun 23, 2019 | 6:46 PM
Share

राजस्थान : वादळी वाऱ्यामुळे मंडप कोसळल्याने तब्बल 14 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 45 लोक जखमी झाल्याचे समोर येत आहे. राजस्थानच्या बाडमेरमध्ये ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाडमेर जिल्ह्यातील जसोल गावातील एका शाळेतील मैदाना रामकथेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी मैदानात जवळपास 200 फूट उंच मंडप बांधण्यात आले होते. यात जवळपास 1 हजार पेक्षा अधिक श्रद्धाळू भाविक सहभागी झाले होते.

मात्र दुपारच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्यामुळे रामकथेच्या कार्यक्रमासाठी लावलेले मंडप कोसळले. यामुळे नागरिकांची पळापळ सुरु झाली. तसेच मंडपात अनेक ठिकाणी वीजेची उपकरण लावली होती. मंडप कोसळल्याने त्या उपकरणातून विजेचा करंट सर्वत्र पसरला. त्यामुळे 14 लोकांचा मृत्यू झाला. तर अनेक लोक जखमी झाले. डीएम हिमांशू गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मंडपात वयस्कर व्यक्तींचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.

या घटनेनंतर स्थानिक लोकांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. दरम्यान सध्या जखमींवर उपचार सुरु असून, मृतांचा संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.