‘अहंकाराची खुर्ची सोडा आणि शेतकऱ्यांना त्यांचा हक्क द्या’, कृषी कायद्यांवरुन राहुल गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

शेतकरी आंदोलनाबाबत 'जागे व्हा, अहंकाराच्या खुर्चीवरुन खाली उतरा आणि शेतकऱ्यांचा त्यांचा हक्क आणि अधिकार द्या', अशी खोचक टिप्पणी राहुल गांधी यांनी केली आहे. यापूर्वीही राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनावर आपली भूमिका मांडली होती.

'अहंकाराची खुर्ची सोडा आणि शेतकऱ्यांना त्यांचा हक्क द्या', कृषी कायद्यांवरुन राहुल गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
Follow us
| Updated on: Dec 01, 2020 | 1:09 PM

नवी दिल्ली: केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांविरुद्ध दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी आंदोलनावर बसले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सरकारने अहंकाराची खुर्ची सोडून शेतकऱ्यांना त्यांचा हक्क आणि अधिकार द्यायला हवा, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. दिल्लीच्या सीमेवर गेल्या 6 दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरु आहे. (Rahul Gandhi criticize PM Narendra Modi on farmers agitation)

आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनात राहुल गांधी यांनी ट्वीट केलंय. ‘अन्नदाता रस्ते-मैदानावर धरणं देत आहे आणि ‘खोटे’ टीव्हीवर भाषण. शेतकऱ्यांच्या मेहनतीचं ऋण आपल्यावर आहे. हे ऋण त्यांना न्याय आणि त्यांचे अधिकार देऊनच उतरवलं जाईल. त्यांच्यावर लाठीमार करुन, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून ते ऋण उतरलं जाणार नाही’, अशा शब्दात राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि पर्यायानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

‘जागे व्हा, अहंकाराच्या खुर्चीवरुन खाली उतरा आणि शेतकऱ्यांचा त्यांचा हक्क आणि अधिकार द्या’, अशी खोचक टिप्पणीही राहुल गांधी यांनी केली आहे. यापूर्वीही राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनावर आपली भूमिका मांडली होती. काँग्रेस आणि सामान्य जनतेनं सत्य आणि असत्याच्या या युद्धात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, असं आवाहन राहुल गांधी यांनी केलं होतं.

काँग्रेसची #SpeakupForFarmers मोहीम

केंद्राच्या कृषी कायद्यांविरुद्ध काँग्रेसनं #SpeakupForFarmers ही मोहीम हाती घेतली आहे. त्यात आंदोलक शेतकऱ्यांना समर्थन देताना केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांविरुद्ध मत मांडण्याचं आवाहन काँग्रेसकडून करण्यात आलं आहे. ‘मोदी सरकारने शेतकऱ्यांवर अत्याचार केला. पहिल्यांचा काळा कायदा आणि आता लाठीमार. पण ते विसरले की जेव्हा शेतकरी आवाज उठवतो तेव्हा त्याचा आवाज संपूर्ण देशात घुमतो’, अशा शब्दात राहुल गांधी यांनी #SpeakupForFarmers या मोहीमेत सहभागी होण्यायं आवाहन केलं आहे.

शेतकऱ्यांची शंका राजनाथ दूर करणार- शाह

गेल्या 6 दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनानंतर आज अखेर केंद्र सरकारकडून महत्वाचं पाऊल उचलण्यात येत आहे. दुपारी शेतकरी संघटना आणि सरकारच्या मंत्र्यांमध्ये चर्चा होणार आहे. सरकारकडून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे या बैठकीचं नेतृत्व करणार आहेत. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमरही उपस्थित असतील. दरम्यान, सरकार नव्या कृषी कायद्यांवर ठाम राहणार असल्याचं कळतंय. सरकारकडून शेतकऱ्यांच्या मनातील शंका दूर करण्याचं काम केलं जाईल. त्यांना MSP अर्थात किमान आधारभूत किमतीबाबत विश्वास दिला जाईल, असं शाह यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या:

कृषी कायद्यावरुन शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचं काम, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल, शेतकऱ्यांना विश्वास देण्याचा प्रयत्न

Farmer Protest | कायद्यांना नाव शेतकऱ्यांचे पण फायदा अब्जाधीश मित्रांचा, प्रियांका गांधींचे मोदी सरकारवर टीकास्त्र

इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटर भारतातील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मैदानात, सरकारला विचारला जाब

Rahul Gandhi criticize PM Narendra Modi on farmers agitation

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.