AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; रामदास आठवले गृहमंत्र्यांची भेट घेणार

राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेच्या यंत्रणेवर जनतेचा विश्वास राहिला नाही, असे रामदास आठवले यांनी म्हटले. | Ramdas Athawale

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; रामदास आठवले गृहमंत्र्यांची भेट घेणार
रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: Mar 21, 2021 | 3:50 PM
Share

मुंबई: माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.महाराष्ट्राच्या गृह विभागावर कलंक लागला गेला आहे.त्यामुळे नैतिकेच्यादृष्टीने अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी तात्काळ गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली आहे. (Ramdas Athawale take a dig on HM Anil Deshmukh)

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके असलेल्या गाडीच्या प्रकरणात पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयए ने अटक केली आहे.अशा गंभीर प्रकरणात पोलीसांची नावे येणे आणि आता थेट माजी पोलीस आयुक्तांनी राज्याच्या गृहामंत्र्यांवरच वसुलीच्या टार्गेटचे केलेले गंभीर आरोप पाहता महाराष्ट्र राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेच्या यंत्रणेवर जनतेचा विश्वास राहिला नाही, असे रामदास आठवले यांनी म्हटले.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आणा: आठवले

राज्य सरकार बरखास्त करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी या मागणीचे पत्र उद्या सोमवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन आपण देणार असल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली.

सचिन वाझे सारख्या पोलीस अधिकाऱ्याची शिवसेनेने अनेकदा बाजू घेतली आहे. शिवसेनेशी सचिन वाझे यांचे जवळचे संबंध राहिले आहेत. वाझे सारख्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव एन आय ए च्या चौकशीत दोषी म्हणून आले आहे.त्यांना वाचविण्यासाठी वाझे ला पाठीशी घालण्याचा प्रयत्न शिवसेने ने केला आहे. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवण्याच्या गंभीर प्रकरा मागे मोठे षडयंत्र असण्याची शक्यता आहे.या मागे कोण बडे लोक आहेत त्याचा उलगडा होण्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी रामदास आठवले यांनी केली.

गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवाईमध्ये पोलीस अधिकाऱ्याचे नाव येणे हा गंभीर प्रकार आहे. कायदा आणि सुव्यवस्थेवरून जनतेचा विश्वास उडविणारा प्रकार आहे. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवणे या मागे कुणाचे षडयंत्र आहे त्याचा शोध घेतला पाहिजे. त्या घटनेनंतर घडलेल्या घटनाक्रमात राज्याचा गृह विभाग कलंकित झाला असून गृहमंत्री अनिल देशमुख यांना पदावर राहण्याचा अधिकार राहिला नाही. त्यांनी नैतिकेच्या दृष्टीने तात्काळ राजीनामा दिला पाहिजे तसेच राज्यात ढासळलेल्या कायदा आणि सुव्यस्थेला राज्याचे प्रमुख म्हणुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा जबाबदार असल्याने राज्य सरकार बरखास्त करावे असे पत्र मी उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना देणार असल्याचे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या:

‘लेटरबॉम्ब’प्रकरणाची ज्युलिओ रिबेरो सारख्या अधिकाऱ्यामार्फत चौकशी व्हावी: शरद पवार

सचिन वाझेंना पोलीस दलात घेण्याचा निर्णय परमबीर सिंग यांचाच : शरद पवार

Raj Thackeray | राज ठाकरेंच्या ‘त्या’ 10 सवालांचं उत्तर देणार का उद्धव ठाकरे सरकार? वाचा ते सवाल

(Ramdas Athawale take a dig on HM Anil Deshmukh)

Follow Us
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...