AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वेमध्ये दोन लांखापेक्षा अधिक जागांसाठी भरती

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने गेल्यावर्षी एक लाखांपेक्षा अधिक पदांवर भरती काढली होती. मात्र यावेळी भारतीय रेल्वे दोन लाखांपेक्षा अधिक पदावर भरती काढण्याच्या तयारीत आहे. रेल्वे मंत्रालयाने नुकतेच याबद्दल माहिती दिली. ज्यामध्ये दोन लाख 30 हजार पदांसाठी भरती काढण्यात येणार असल्याचे सांगितले. सरकारने लोकसभेत 10 टक्के सवर्ण आरक्षण लागू केल्यानंतर या भरतीची घोषणा केली. रेल्वे […]

रेल्वेमध्ये दोन लांखापेक्षा अधिक जागांसाठी भरती
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:27 PM
Share

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने गेल्यावर्षी एक लाखांपेक्षा अधिक पदांवर भरती काढली होती. मात्र यावेळी भारतीय रेल्वे दोन लाखांपेक्षा अधिक पदावर भरती काढण्याच्या तयारीत आहे. रेल्वे मंत्रालयाने नुकतेच याबद्दल माहिती दिली. ज्यामध्ये दोन लाख 30 हजार पदांसाठी भरती काढण्यात येणार असल्याचे सांगितले. सरकारने लोकसभेत 10 टक्के सवर्ण आरक्षण लागू केल्यानंतर या भरतीची घोषणा केली.

रेल्वे मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, सरकार आरक्षणाच्या नियमानुसार या भरतीमध्ये उमेदवारांची निवड प्रक्रिया दोन टप्प्यात करणार आहे. या दोन्ही टप्प्यांची वेळ आणि पदांची संख्या वेगळी आहे.

पहिला टप्पा

पहिला टप्पा फेब्रुवारी-मार्च 2019 ते एप्रिल 2020 पर्यंत पूर्ण होणार आहे. पहिल्या टप्प्यात 1 लाख 31 हजार 428 पदांचा समावेश असेल. यामध्ये निवड प्रक्रियेद्वारे उमेदवाराची निवड केली जाईल.

दुसरा टप्पा

दुसरा टप्पा मे-जून 2020 ते जुलै-ऑगस्ट 2021 मध्ये पूर्ण होईल. या टप्प्यात 99 हजार पदांचा समावेश असेल. एससीसाठी 34 हजार, एसटीसाठी 17 हजार आणि ओबीसीसाठी 62 हजार पदं आरक्षित आहेत. तसेच यामध्ये आर्थिक परिस्थितीने गरीब असलेल्या सामान्य वर्गासाठी 23 हजार जागा आरक्षित आहेत.

भारतीय रेल्वे नवीन योजनांसाठी आवश्यक कर्माचारी आणि रेल्वे नेटवर्कची दक्षता वाढवण्यासाठी आपली कर्मचारी संख्या वाढवत आहे. कर्मचारी संख्या वाढल्यावर कर्मचाऱ्यांना ओव्हरटाईम काम करावा लागणार नाही, तसेच इतर प्रोजेक्ट पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ कमी होईल. भारतीय रेल्वेमध्ये एकूण 15,06,598 पदं आहेत. यामध्ये 12,23,622 कर्मचारी कार्यरत आहेत आणि 2,82,976 पदं अजून खाली आहेत. सध्या 1,51,548 पदांसाठी भरती करण्यात येत आहे. मात्र 1,31,428 पदं अजूनही खाली आहेत.

भारतीय रेल्वेमध्ये कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर रेल्वेमध्ये एकूण 1,31,428 पदं खाली असतील आणि यामुळे पुढील दोन वर्षात अंदाजे 2,30,000 पदं खाली होणार आहेत.

कोण करु शकतात अर्ज

या भरती प्रक्रियेमध्ये अनेक पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधून इंजीनिअरिंगमध्ये डिप्लोमा किंवा कोणत्याही विषयात पदवीधर झालेले उमेदवार अर्ज करु शकतात.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?