AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तहानलेला ससा, रोज मानवी वस्तीत येतो, पाणी पितो, निघून जातो!

सांगली : सांगली जिल्ह्यातील सहा तालुक्यात दुष्काळ आहे. त्यात उन्हाच्या झळा वाढत आहेत. पाण्याच्या शोधात रानातील ससे, मोर, चिमण्या, पोपट यासारखे पशूपक्षी व्याकूळ आहेत. निसर्गाशी नाळ जोडलेला शेतकरीच या पशू पक्षांची व्याकूळता जाणू शकतो. तासगाव तालुक्यातील  गौरगाव येथील आर पी खराडे यांनी रानातील पक्षांसाठी पाणवठा तयार केला आहे. भांड्यात पाणी भरुन ते घराबाहेर ठेवतात. मोर, […]

तहानलेला ससा, रोज मानवी वस्तीत येतो, पाणी पितो, निघून जातो!
| Updated on: Jul 05, 2019 | 3:46 PM
Share

सांगली : सांगली जिल्ह्यातील सहा तालुक्यात दुष्काळ आहे. त्यात उन्हाच्या झळा वाढत आहेत. पाण्याच्या शोधात रानातील ससे, मोर, चिमण्या, पोपट यासारखे पशूपक्षी व्याकूळ आहेत. निसर्गाशी नाळ जोडलेला शेतकरीच या पशू पक्षांची व्याकूळता जाणू शकतो. तासगाव तालुक्यातील  गौरगाव येथील आर पी खराडे यांनी रानातील पक्षांसाठी पाणवठा तयार केला आहे. भांड्यात पाणी भरुन ते घराबाहेर ठेवतात. मोर, चिमण्या कावळे यासारखे पक्षी पाण्यासाठी येऊ लागले आहेत. पक्षी येत असताना सशासारखा सस्तन प्राणीही पाण्याच्या शोधात रानातून मानवी वस्तीत येत आहे. सशाचं एक लहान पिल्लू पाण्याच्या शोधात चक्क मानवी वस्तीत असलेल्या खराडे यांच्या अंगणात नित्य नियमाने गेले चार दिवस येत आहे.

तासगाव तालुक्यातील गौरगाव हे दुष्काळी गाव, सांगली जिल्ह्यातील साडे तीन लाख लोकांना 173 टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. हे पाणी कमी पडत असल्याने लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.  पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ केवळ माणसांनाच नाही तर डोंगर दऱ्यातील प्राण्यांवरही आहे.

गौरगाव येथील आर पी खराडे या शेतकऱ्याने आपल्या अंगणात ठेवलेले पाणी पिण्यासाठी एक ससा नेमाने  येत आहे. गेल्या चार दिवसापासून हा ससा चांगलाच रुळला आहे. न घबरता तो पाणी पिण्यासाठी जंगलातून चक्क मानवी वस्तीत येऊ लागला आहे.

गौरगावाच्या कडेला डोंगर आहे आणि येथील जंगलात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे  पाण्याच्या शोधात राणातील  ससे, मोर, चिमण्या, पोपट यासारखे पशुपक्षी व्याकूळ झाले आहेत.

ससा, मोर यासारखे पशूपक्षी माणसापासून दूर पळतात,पण कडक उन्हाने पाण्याच्या शोधत त्यांना मनुष्यवस्तीत यावं लागत आहे. तहान भागवण्यासाठी जंगली प्राणी आता जीवाचीही पर्वा करेनासे झाले आहेत.

संबंधित बातम्या 

दुष्काळ झळा… नाशिकमध्ये 40 मोरांचा तडफडून मृत्यू  

Follow Us
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव.
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी.
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका.
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न.
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध.
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.